शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पालीकारांना प्यावे लागते गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 23:16 IST

आरोग्याचा प्रश्न गंभीर : पाणी उकळून पिण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन

पाली : अष्टविनायक देवस्थानापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत वर्षानुवर्षे शुद्ध पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा येथील अंबा नदीचे पाणी आणखीनच गढूळ व दूषित झाले आहे. संपूर्ण पाणी मातकट रंगाचे झाले आहे. त्यामुळे पाणी उकळून व गळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. ग्रामपंचायतीमार्फत गुरुवार, १० आॅक्टोबर रोजी जॅकवेलजवळील गॅलरीमधील गाळ काढण्याचे काम सुरू झाले, तसेच साठवण टाक्यांमध्ये गाळ साठला असल्यास तोदेखील साफ करून काढला जाईल, अशी माहिती पाली सरपंच गणेश बाळके यांनी दिली.

पालीकरांना येथील अंबा नदीच्या पाण्याचा नळाद्वारे पुरवठा करण्यात येतो. वितरित होणाऱ्या या पाण्यावर कोणतेही शुद्धिकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायकाचे क्षेत्र आहे. येथे रोज असंख्य भाविक येत असतात. पालीची लोकसंख्यादेखील पंधरा हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे लागत आहे. आतापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, शिंपले, मासे आणि किडे अनेक वेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.

पालीकरांसाठी जवळपास १२ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लालफितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रसारमाध्यमांनी मागील चार-पाच वर्षांपासून हा विषय वारंवार मांडला आहे. मात्र, अजूनही प्रशासन व राजकारण्यांकडून याकडे लक्ष दिले जात नाही.

निवडणुकीत भांडवलाचा मुद्दाच्पालीतील शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना मागील १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनदेखील आजतायागत ही योजना कार्यान्वित झालेली नाही. सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या पुढाऱ्यांनी या योजनेचे निवडणुकीपुरते भांडवल के ले आणिश्रेयही घेतात. मात्र, एकदा निवडणुका संपल्या की, त्यांना या गोष्टीचा विसर पडतो.गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे गावाला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यावर उपाययोजना सुरू आहे. तरी गावातील नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने पाणी उकळून व गाळून प्यावे.- गणेश बाळके, सरपंच, ग्रामपंचायत पाली