शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पालीकारांना प्यावे लागते गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 23:16 IST

आरोग्याचा प्रश्न गंभीर : पाणी उकळून पिण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन

पाली : अष्टविनायक देवस्थानापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत वर्षानुवर्षे शुद्ध पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा येथील अंबा नदीचे पाणी आणखीनच गढूळ व दूषित झाले आहे. संपूर्ण पाणी मातकट रंगाचे झाले आहे. त्यामुळे पाणी उकळून व गळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. ग्रामपंचायतीमार्फत गुरुवार, १० आॅक्टोबर रोजी जॅकवेलजवळील गॅलरीमधील गाळ काढण्याचे काम सुरू झाले, तसेच साठवण टाक्यांमध्ये गाळ साठला असल्यास तोदेखील साफ करून काढला जाईल, अशी माहिती पाली सरपंच गणेश बाळके यांनी दिली.

पालीकरांना येथील अंबा नदीच्या पाण्याचा नळाद्वारे पुरवठा करण्यात येतो. वितरित होणाऱ्या या पाण्यावर कोणतेही शुद्धिकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायकाचे क्षेत्र आहे. येथे रोज असंख्य भाविक येत असतात. पालीची लोकसंख्यादेखील पंधरा हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे लागत आहे. आतापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, शिंपले, मासे आणि किडे अनेक वेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.

पालीकरांसाठी जवळपास १२ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लालफितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रसारमाध्यमांनी मागील चार-पाच वर्षांपासून हा विषय वारंवार मांडला आहे. मात्र, अजूनही प्रशासन व राजकारण्यांकडून याकडे लक्ष दिले जात नाही.

निवडणुकीत भांडवलाचा मुद्दाच्पालीतील शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना मागील १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनदेखील आजतायागत ही योजना कार्यान्वित झालेली नाही. सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या पुढाऱ्यांनी या योजनेचे निवडणुकीपुरते भांडवल के ले आणिश्रेयही घेतात. मात्र, एकदा निवडणुका संपल्या की, त्यांना या गोष्टीचा विसर पडतो.गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे गावाला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यावर उपाययोजना सुरू आहे. तरी गावातील नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने पाणी उकळून व गाळून प्यावे.- गणेश बाळके, सरपंच, ग्रामपंचायत पाली