शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पालीकारांना प्यावे लागते गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 23:16 IST

आरोग्याचा प्रश्न गंभीर : पाणी उकळून पिण्याचे ग्रामपंचायतीचे आवाहन

पाली : अष्टविनायक देवस्थानापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत वर्षानुवर्षे शुद्ध पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा येथील अंबा नदीचे पाणी आणखीनच गढूळ व दूषित झाले आहे. संपूर्ण पाणी मातकट रंगाचे झाले आहे. त्यामुळे पाणी उकळून व गळून पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. ग्रामपंचायतीमार्फत गुरुवार, १० आॅक्टोबर रोजी जॅकवेलजवळील गॅलरीमधील गाळ काढण्याचे काम सुरू झाले, तसेच साठवण टाक्यांमध्ये गाळ साठला असल्यास तोदेखील साफ करून काढला जाईल, अशी माहिती पाली सरपंच गणेश बाळके यांनी दिली.

पालीकरांना येथील अंबा नदीच्या पाण्याचा नळाद्वारे पुरवठा करण्यात येतो. वितरित होणाऱ्या या पाण्यावर कोणतेही शुद्धिकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायकाचे क्षेत्र आहे. येथे रोज असंख्य भाविक येत असतात. पालीची लोकसंख्यादेखील पंधरा हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे लागत आहे. आतापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, शिंपले, मासे आणि किडे अनेक वेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.

पालीकरांसाठी जवळपास १२ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लालफितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रसारमाध्यमांनी मागील चार-पाच वर्षांपासून हा विषय वारंवार मांडला आहे. मात्र, अजूनही प्रशासन व राजकारण्यांकडून याकडे लक्ष दिले जात नाही.

निवडणुकीत भांडवलाचा मुद्दाच्पालीतील शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना मागील १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनदेखील आजतायागत ही योजना कार्यान्वित झालेली नाही. सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या पुढाऱ्यांनी या योजनेचे निवडणुकीपुरते भांडवल के ले आणिश्रेयही घेतात. मात्र, एकदा निवडणुका संपल्या की, त्यांना या गोष्टीचा विसर पडतो.गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे गावाला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यावर उपाययोजना सुरू आहे. तरी गावातील नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने पाणी उकळून व गाळून प्यावे.- गणेश बाळके, सरपंच, ग्रामपंचायत पाली