शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

‘रंग दे महाराष्ट्र’ अभियानांतर्गत रंगवल्या शाळांच्या भिंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:48 IST

रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल, तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झाले तर काहीही साध्य करता येऊ शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे, असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी माणगाव तालुक्यातील मुठवली गावातील ग्रामस्थांमध्ये जागविला आहे. या वेळी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते.ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवडक गावातील कामांची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा या पथकाने केली. सकाळी मुठवली ग्रामस्थांशी सर्व अधिकाºयांनी संवाद साधला. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी ए. आर. देगावकर, तहसीलदार ऊर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर, उपविभागीय कृषी अधिकारी येवले तसेच स्वदेस फाउंडेशचे तुषार इनामदार, ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरु ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम यांनी गावात विविध उद्योग व्यवसाय करणाºया कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना सूर्यवंशी म्हणाले की, ‘गाव करी ते राव न करी’ अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणेच गाव एकत्र आल्यास, हवा तो विकास शक्य आहे. त्यासाठी शासनाची यंत्रणा सहयोग करेल. गावच्या शाळेचा विकास करा. त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्या. हे योगदान आपल्या मुलांच्या विकासासाठी असून भविष्याची मोठी गुंतवणूक ठरेल. गावकºयांनी मिळून गावात नियमित स्वच्छता अभियान राबवावे, जेणेकरून स्वच्छतेची सवय मुलांच्या अंगी बाणावेल.ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी गावकºयांनी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान हे गावकरी आणि शासन यांनी एकत्र येऊन तयार केलेले विकासाचे नवे मॉडेल ठरावे व त्याची सुरु वात रायगड जिल्ह्यात व्हावी, असे चांगले काम करावे, असे आवाहन केले.जिल्हाधिकारी बनले चित्रकारग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर उपस्थितांनी गावातील जि.प. शाळेच्या रंगकामात सहभाग दिला. या वेळी शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सेवाभावी कार्यकर्त व जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे विद्यार्थी गावात आले होते. त्यांच्या मदतीने शाळेचे रंगकाम सुरु होते. ‘रंग दे महाराष्ट्र’या अभियानांतर्गत मुठवली येथील शाळेच्या भिंती शनिवारी रंगवण्यात आल्या. हे रंगकाम एरव्हीच्या रंगकामापेक्षा वेगळे होते. शालेय विद्यार्थ्यांना अधिक आकलन व्हावे, यासाठी भिंतींवर शैक्षणिकचित्रे काढण्यात आली. अभियानात स्वत: जिल्हाधिकारी सूर्यवंशी आणि ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम हे ही सहभागी झाले होते. दुपारनंतर या पथकाने सुधागड तालुक्यातील महागाव व नवघर या गावांतील कामांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवादही साधला.