शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

‘रंग दे महाराष्ट्र’ अभियानांतर्गत रंगवल्या शाळांच्या भिंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:48 IST

रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल, तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झाले तर काहीही साध्य करता येऊ शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे, असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी माणगाव तालुक्यातील मुठवली गावातील ग्रामस्थांमध्ये जागविला आहे. या वेळी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक उपस्थित होते.ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील निवडक गावातील कामांची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा या पथकाने केली. सकाळी मुठवली ग्रामस्थांशी सर्व अधिकाºयांनी संवाद साधला. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी ए. आर. देगावकर, तहसीलदार ऊर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर, उपविभागीय कृषी अधिकारी येवले तसेच स्वदेस फाउंडेशचे तुषार इनामदार, ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरु ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम यांनी गावात विविध उद्योग व्यवसाय करणाºया कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना सूर्यवंशी म्हणाले की, ‘गाव करी ते राव न करी’ अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणेच गाव एकत्र आल्यास, हवा तो विकास शक्य आहे. त्यासाठी शासनाची यंत्रणा सहयोग करेल. गावच्या शाळेचा विकास करा. त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्या. हे योगदान आपल्या मुलांच्या विकासासाठी असून भविष्याची मोठी गुंतवणूक ठरेल. गावकºयांनी मिळून गावात नियमित स्वच्छता अभियान राबवावे, जेणेकरून स्वच्छतेची सवय मुलांच्या अंगी बाणावेल.ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी गावकºयांनी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान हे गावकरी आणि शासन यांनी एकत्र येऊन तयार केलेले विकासाचे नवे मॉडेल ठरावे व त्याची सुरु वात रायगड जिल्ह्यात व्हावी, असे चांगले काम करावे, असे आवाहन केले.जिल्हाधिकारी बनले चित्रकारग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर उपस्थितांनी गावातील जि.प. शाळेच्या रंगकामात सहभाग दिला. या वेळी शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सेवाभावी कार्यकर्त व जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे विद्यार्थी गावात आले होते. त्यांच्या मदतीने शाळेचे रंगकाम सुरु होते. ‘रंग दे महाराष्ट्र’या अभियानांतर्गत मुठवली येथील शाळेच्या भिंती शनिवारी रंगवण्यात आल्या. हे रंगकाम एरव्हीच्या रंगकामापेक्षा वेगळे होते. शालेय विद्यार्थ्यांना अधिक आकलन व्हावे, यासाठी भिंतींवर शैक्षणिकचित्रे काढण्यात आली. अभियानात स्वत: जिल्हाधिकारी सूर्यवंशी आणि ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम हे ही सहभागी झाले होते. दुपारनंतर या पथकाने सुधागड तालुक्यातील महागाव व नवघर या गावांतील कामांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवादही साधला.