शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने भातपिकाचे नुकसान

By admin | Updated: October 5, 2015 00:33 IST

हस्त नक्षत्रातील पाऊस हा सर्व शेतकऱ्यांसाठी नेहमी संकट घेवून येत असतो. त्याप्रमाणे यावर्षी देखील सध्या सुरू असलेले हस्त नक्षत्र आपले रूप दाखवून बळीराजाची चिंता

नेरळ : हस्त नक्षत्रातील पाऊस हा सर्व शेतकऱ्यांसाठी नेहमी संकट घेवून येत असतो. त्याप्रमाणे यावर्षी देखील सध्या सुरू असलेले हस्त नक्षत्र आपले रूप दाखवून बळीराजाची चिंता आणखी वाढवत आहे. वादळी वाऱ्यासह येत असलेल्या सोसाट्याच्या पावसाने शेतातील भाताची रोपे पडत आहेत. कर्जत तालुक्यातील किमान अर्धी भाताची रोपे शेतात कोसळली असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या संकटात आणखी भर म्हणजे सध्या सुरु असलेला पाऊस ७ आॅक्टोबरपर्यंत थांबणार नाही असे वेधशाळा सांगत असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे.शेतकऱ्यांच्या नशिबी पावसाचे बदललेले रूप आता अधिक धोकादायक स्वरूप धारण करताना दिसत आहे. आधीच बळीराजा पावसाच्या लहरीपणामुळे चिंतेत असतो, त्यात आता आणखी भर पडत आहे. यंदा चार महिन्यात पाऊस कमी आणि सूर्यप्रकाश जास्त अशी स्थिती पावसाळा असून देखील पहायला मिळाली होती. त्यानंतर गणपती येण्याआधी पडलेल्या पावसामुळे किमान भाताचे पीक हाती येईल अशी शक्यता निर्माण झाली. पूर्वी हस्त नक्षत्रातील पाऊस हा सलग सर्व भागात दररोज लागून राहत नसे, जिकडे होईल तिकडे नुकसान करण्याचा हस्त नक्षत्राचा नेहमीचा दिनक्र म यावेळी नवीन पायंडा घालताना दिसत आहे. यावेळी २७ सप्टेंबरला सुरूझालेले हस्त नक्षत्र आपले रंग सर्व भागांना दाखवताना दिसत आहे. त्याने येतानाच वादळी वाऱ्याची सोबत घेतली असून विजांचा कडकडाट ही सोबतीला आहेत.कर्जत तालुक्यातील भाताचे पीक हस्त नक्षत्रातील पावसामुळे धोक्यात येताना दिसत आहे. भाताच्या शेतात उभे असलेले रोप हे भाताच्या लोंब्यामुळे अधिक वजनदार झाले आहे. त्यामुळे साधा वारा आला तरीही ते खाली कोसळण्याची भीती असते. मात्र वादळी वाऱ्यांसह आलेल्या या पावसामुळे तालुक्यातील अर्धे अधिक भाताची रोपे जमिनीवर कोसळली आहेत. त्यानंतर पावसाने आपली संततधार कायम ठेवल्याने शेतकऱ्याच्या मनात अधिक भीती निर्माण झाली आहे. पाऊस आणखी आठ दिवस असाच कोसळत राहिल्यास शेतात पडलेल्या भाताला पुन्हा नवीन कोंब फुटू शकतात. त्यामुळे हाती येणारे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात दहा हजार हेक्टर जमिनीवर भाताचे पीक पावसाळ्यात घेतले जाते. (वार्ताहर)