शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:31 IST

शेतकरी चिंतातुर : महाड तालुक्याला मोठा फटका

- सिकंदर अनवारे

दासगाव : गेली काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने बुधवारी अचानक हजेरी लावली. या पावसामुळे कापणीसाठी आलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. दासगावमध्ये भातशेतात पाणी साचल्याने उभे पीक आडवे झाले आहे, तर अनेक ठिकाणी कापलेल्या भात पिकावर पावसाचे पाणी पडल्याने भात कुजण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून आॅक्टोबर हीटमुळे नागरिक हैराण होते. मात्र, ऐन दसºयाच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आॅक्टोबरच्या उष्णतेमध्ये भात पीक कापणीयोग्य झाले आहे.तालुक्यात काही भागात भाताची रोपे कापून उडवी देखील रचली गेली आहेत. काही भागात भात पीक कापणी सुरू झाली आहे. याच दरम्यान पाऊस पडल्याने भात पिकाचे नुकसान झाले आहे.दासगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे कापलेल्या आणि उभ्या भात पिकावर पावसाचे पाणी पडल्याने नुकसान होणार आहे. भात पिकाची मळणी करून उरलेल्या भागाचा पेंढा गुरांचे खाद्य म्हणून वापरला जातो. मात्र, हा पेंढा देखील भिजल्याने यामध्ये बुरशी किंवा कुजण्याची शक्यता आहे. भाताचे धान भिजल्याने त्यातून बाहेर पडणारा तांदूळ देखील खराब होण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. रचलेल्या उडव्यांमध्ये असलेला भात कुजण्याआधी शेतकºयांना पुन्हा बाहेर काढून उन्हात सुकवावा लागणार आहे. तालुक्यातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने भात पीक कापणीला देखील अडथळा निर्माण झाला आहे.भात कुजण्याची, गळण्याची भीतीमहाड तालुक्यात दासगावप्रमाणेच रायगड, विन्हेरे, बिरवाडी आदी परिसरात देखील पाऊस पडला. या भागात रिमझिम पाऊस पडला असला तरी या पावसाने या परिसरातील देखील भात पीक खराब होणार आहे. या भागात देखील भात पीकच घेतले जात असल्याने या पिकावर पडलेल्या पावसाने भात गळून पडण्याची शक्यता आहे.या परिसरात देखील भाताच्या लोंब्या शेताच्या पाण्यात आल्याने या लोंब्याचे नुकसान होणार आहे. महाड तालुक्यातील पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग आणि महसूलकडून होणे गरजेचे आहे. शासनाच्या कृषी विमा योजनेतून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड