शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
2
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
3
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
4
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
5
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
6
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
7
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
8
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
9
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
10
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
11
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
12
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
13
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
14
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
15
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
16
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
17
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
18
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
19
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
20
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:31 IST

शेतकरी चिंतातुर : महाड तालुक्याला मोठा फटका

- सिकंदर अनवारे

दासगाव : गेली काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने बुधवारी अचानक हजेरी लावली. या पावसामुळे कापणीसाठी आलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. दासगावमध्ये भातशेतात पाणी साचल्याने उभे पीक आडवे झाले आहे, तर अनेक ठिकाणी कापलेल्या भात पिकावर पावसाचे पाणी पडल्याने भात कुजण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून आॅक्टोबर हीटमुळे नागरिक हैराण होते. मात्र, ऐन दसºयाच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आॅक्टोबरच्या उष्णतेमध्ये भात पीक कापणीयोग्य झाले आहे.तालुक्यात काही भागात भाताची रोपे कापून उडवी देखील रचली गेली आहेत. काही भागात भात पीक कापणी सुरू झाली आहे. याच दरम्यान पाऊस पडल्याने भात पिकाचे नुकसान झाले आहे.दासगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे कापलेल्या आणि उभ्या भात पिकावर पावसाचे पाणी पडल्याने नुकसान होणार आहे. भात पिकाची मळणी करून उरलेल्या भागाचा पेंढा गुरांचे खाद्य म्हणून वापरला जातो. मात्र, हा पेंढा देखील भिजल्याने यामध्ये बुरशी किंवा कुजण्याची शक्यता आहे. भाताचे धान भिजल्याने त्यातून बाहेर पडणारा तांदूळ देखील खराब होण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. रचलेल्या उडव्यांमध्ये असलेला भात कुजण्याआधी शेतकºयांना पुन्हा बाहेर काढून उन्हात सुकवावा लागणार आहे. तालुक्यातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने भात पीक कापणीला देखील अडथळा निर्माण झाला आहे.भात कुजण्याची, गळण्याची भीतीमहाड तालुक्यात दासगावप्रमाणेच रायगड, विन्हेरे, बिरवाडी आदी परिसरात देखील पाऊस पडला. या भागात रिमझिम पाऊस पडला असला तरी या पावसाने या परिसरातील देखील भात पीक खराब होणार आहे. या भागात देखील भात पीकच घेतले जात असल्याने या पिकावर पडलेल्या पावसाने भात गळून पडण्याची शक्यता आहे.या परिसरात देखील भाताच्या लोंब्या शेताच्या पाण्यात आल्याने या लोंब्याचे नुकसान होणार आहे. महाड तालुक्यातील पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग आणि महसूलकडून होणे गरजेचे आहे. शासनाच्या कृषी विमा योजनेतून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड