शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

माणगावमध्ये भातशेती झाली आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:55 IST

एवढे मोठे संकट कोसळून कोकणचा बळीराजा किंचितही विचलित झालेला नाही.

माणगाव : सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगडसह कोकणातील शेतकºयांच्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाले असल्याचे चित्र आता लपून राहिलेले नाही. एवढे मोठे संकट कोसळून कोकणचा बळीराजा किंचितही विचलित झालेला नाही. गेल्या महिन्याभरापासून पावसाचे थैमान सुरू आहे. प्रचंड मेहनतीने उभी भातशेती निसर्गाच्या या कोपाने आडवी झाली आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.आता दुबार पेरणी करणे अशक्य आहे. त्यामुळे या वर्षी हाती काहीही उरणार नाही. झालेल्या नुकसानीचे सरकारने मोजमाप करावे, अशी माफक अपेक्षा बळीराजाची आहे. शासनाने शेतकºयांची समस्या लक्षात घेऊन त्या दृष्टिकोनातून संबंधित यंत्रणा जलदगतीने कार्यरत करावी असे चित्र सुस्पष्ट आहे. अतिपावसामुळे डोंगर माथ्यावर असलेली शेती काही प्रमाणात तग धरू शकते; परंतु भात पांढरे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जी शेती उताराच्या सखल भागात आहे, ती पूर्णपणे कोलमडून गेली आहे. सततच्या पाण्यामुळे तीही पूर्णपणे आडवी (झोपली) झाली आहे. या सर्व नुकसानीचे रीतसर पंचनामे करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.