शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

पाथरज येथील बंधारा गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:11 IST

तालुक्यातील पाथरज येथील डोंगरपाडा भागात जून २०१७मध्ये वळण बंधारा कर्जत कृषी विभागाने बांधला होता. त्या ठिकाणी कामे नित्कृष्ट होत असल्याचे ग्रामस्थ सांगत असतानादेखील कृषी विभागाने नेमलेल्या

कर्जत : तालुक्यातील पाथरज येथील डोंगरपाडा भागात जून २०१७मध्ये वळण बंधारा कर्जत कृषी विभागाने बांधला होता. त्या ठिकाणी कामे नित्कृष्ट होत असल्याचे ग्रामस्थ सांगत असतानादेखील कृषी विभागाने नेमलेल्या ठेकेदाराकडून वळण बंधाºयाचे काम करताना दर्जा राखण्याचा प्रयत्न केला नाही. पाच लाख रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानात बांधलेला वळण बंधारा वाहून गेला असून, त्याखाली असलेल्या शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी विभाग या कामाची चौकशी करणार का? याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.पाथरज या महसुली गावात कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या महसुली गावातील डोंगरपाडा भागात एक वळण बंधारा आदिवासी आश्रमशाळेच्या मागे जून २०१७मध्ये बांधला होता. त्या भागात शेतकरी फार कमी प्रमाणात असल्याची तक्र ार स्थानिक पातळीवर वळण बंधारा मंजूर केला त्या वेळी शेतकरी करीत होते. मात्र, कृषी विभागाकडे शेतकºयांच्या वळण बंधाºयांच्या नित्कृष्ट कामाबद्दल मोठ्या प्रमाणात तक्र ारी केल्या होत्या; परंतु कृषी विभागाने कोणत्याहीतक्र ारीकडे लक्ष दिले नसल्याने शेवटी तो वळण बंधारा वाहून जाण्याचा प्रसंग ओढवला आहे.कृषी विभागाने त्या ठिकाणी कामे करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला वाचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक तक्रारी होऊनदेखील कृषी विभाग करीत असलेल्या दुर्लक्षामुळे पाच लाख खर्चून बांधलेला वळण बंधारा वाहून जाऊन नुकसान झाले.डोंगरपाडा आदिवासी आश्रमशाळेच्या मागे असलेल्या जमिनीमधील शेतात पाणी वळवून घेण्यासाठी बांधलेला वळण बंधारा वादाचा भोवºयात सापडला आहे. कारण तो वळण बंधारा नित्कृष्ट कामामुळे पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्या वळण बंधाºयामधून सुरुवातीला पाणीगळती होत होती आणि त्यामुळे आजूबाजूच्या शेतकºयांनी वळण बंधाºयामधील पाणी त्या ठिकाणी पाणी वळण्यासाठी बांधलेल्या दरवाजातून वळून शेतात जाण्याची शक्यता कमी होती. त्याकडे कृषी विभागाने लक्ष दिले नाही, त्यामुळे तो वळण बंधारा गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेला.सुरुवातीला त्या वळण बंधाºयाच्या तळाशी ज्या ठिकाणी पाणीगळती होत होती, त्या ठिकाणी पहिले भगदाड पडले आणि आता तर त्या ठिकाणी किमान १० मीटर लांबीचा नाला तयार झाला आहे. त्या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेले सिमेंट बांधकाम तोडून टाकले तर पाच लाख खर्चून वळण बंधारा बांधला होता का? हा प्रश्न निर्माण होईल. त्या वळण बंधाºयाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले सिमेंट, रेती, दगड हे खालील भागात असलेल्या शेतात वाहून गेले असून त्यामुळे त्या भागातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट लागले आहे.