शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

पाथरज येथील बंधारा गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:11 IST

तालुक्यातील पाथरज येथील डोंगरपाडा भागात जून २०१७मध्ये वळण बंधारा कर्जत कृषी विभागाने बांधला होता. त्या ठिकाणी कामे नित्कृष्ट होत असल्याचे ग्रामस्थ सांगत असतानादेखील कृषी विभागाने नेमलेल्या

कर्जत : तालुक्यातील पाथरज येथील डोंगरपाडा भागात जून २०१७मध्ये वळण बंधारा कर्जत कृषी विभागाने बांधला होता. त्या ठिकाणी कामे नित्कृष्ट होत असल्याचे ग्रामस्थ सांगत असतानादेखील कृषी विभागाने नेमलेल्या ठेकेदाराकडून वळण बंधाºयाचे काम करताना दर्जा राखण्याचा प्रयत्न केला नाही. पाच लाख रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानात बांधलेला वळण बंधारा वाहून गेला असून, त्याखाली असलेल्या शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी विभाग या कामाची चौकशी करणार का? याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.पाथरज या महसुली गावात कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या महसुली गावातील डोंगरपाडा भागात एक वळण बंधारा आदिवासी आश्रमशाळेच्या मागे जून २०१७मध्ये बांधला होता. त्या भागात शेतकरी फार कमी प्रमाणात असल्याची तक्र ार स्थानिक पातळीवर वळण बंधारा मंजूर केला त्या वेळी शेतकरी करीत होते. मात्र, कृषी विभागाकडे शेतकºयांच्या वळण बंधाºयांच्या नित्कृष्ट कामाबद्दल मोठ्या प्रमाणात तक्र ारी केल्या होत्या; परंतु कृषी विभागाने कोणत्याहीतक्र ारीकडे लक्ष दिले नसल्याने शेवटी तो वळण बंधारा वाहून जाण्याचा प्रसंग ओढवला आहे.कृषी विभागाने त्या ठिकाणी कामे करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला वाचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक तक्रारी होऊनदेखील कृषी विभाग करीत असलेल्या दुर्लक्षामुळे पाच लाख खर्चून बांधलेला वळण बंधारा वाहून जाऊन नुकसान झाले.डोंगरपाडा आदिवासी आश्रमशाळेच्या मागे असलेल्या जमिनीमधील शेतात पाणी वळवून घेण्यासाठी बांधलेला वळण बंधारा वादाचा भोवºयात सापडला आहे. कारण तो वळण बंधारा नित्कृष्ट कामामुळे पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्या वळण बंधाºयामधून सुरुवातीला पाणीगळती होत होती आणि त्यामुळे आजूबाजूच्या शेतकºयांनी वळण बंधाºयामधील पाणी त्या ठिकाणी पाणी वळण्यासाठी बांधलेल्या दरवाजातून वळून शेतात जाण्याची शक्यता कमी होती. त्याकडे कृषी विभागाने लक्ष दिले नाही, त्यामुळे तो वळण बंधारा गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेला.सुरुवातीला त्या वळण बंधाºयाच्या तळाशी ज्या ठिकाणी पाणीगळती होत होती, त्या ठिकाणी पहिले भगदाड पडले आणि आता तर त्या ठिकाणी किमान १० मीटर लांबीचा नाला तयार झाला आहे. त्या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेले सिमेंट बांधकाम तोडून टाकले तर पाच लाख खर्चून वळण बंधारा बांधला होता का? हा प्रश्न निर्माण होईल. त्या वळण बंधाºयाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले सिमेंट, रेती, दगड हे खालील भागात असलेल्या शेतात वाहून गेले असून त्यामुळे त्या भागातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट लागले आहे.