शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

पाथरज येथील बंधारा गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:11 IST

तालुक्यातील पाथरज येथील डोंगरपाडा भागात जून २०१७मध्ये वळण बंधारा कर्जत कृषी विभागाने बांधला होता. त्या ठिकाणी कामे नित्कृष्ट होत असल्याचे ग्रामस्थ सांगत असतानादेखील कृषी विभागाने नेमलेल्या

कर्जत : तालुक्यातील पाथरज येथील डोंगरपाडा भागात जून २०१७मध्ये वळण बंधारा कर्जत कृषी विभागाने बांधला होता. त्या ठिकाणी कामे नित्कृष्ट होत असल्याचे ग्रामस्थ सांगत असतानादेखील कृषी विभागाने नेमलेल्या ठेकेदाराकडून वळण बंधाºयाचे काम करताना दर्जा राखण्याचा प्रयत्न केला नाही. पाच लाख रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानात बांधलेला वळण बंधारा वाहून गेला असून, त्याखाली असलेल्या शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी विभाग या कामाची चौकशी करणार का? याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.पाथरज या महसुली गावात कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या महसुली गावातील डोंगरपाडा भागात एक वळण बंधारा आदिवासी आश्रमशाळेच्या मागे जून २०१७मध्ये बांधला होता. त्या भागात शेतकरी फार कमी प्रमाणात असल्याची तक्र ार स्थानिक पातळीवर वळण बंधारा मंजूर केला त्या वेळी शेतकरी करीत होते. मात्र, कृषी विभागाकडे शेतकºयांच्या वळण बंधाºयांच्या नित्कृष्ट कामाबद्दल मोठ्या प्रमाणात तक्र ारी केल्या होत्या; परंतु कृषी विभागाने कोणत्याहीतक्र ारीकडे लक्ष दिले नसल्याने शेवटी तो वळण बंधारा वाहून जाण्याचा प्रसंग ओढवला आहे.कृषी विभागाने त्या ठिकाणी कामे करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला वाचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक तक्रारी होऊनदेखील कृषी विभाग करीत असलेल्या दुर्लक्षामुळे पाच लाख खर्चून बांधलेला वळण बंधारा वाहून जाऊन नुकसान झाले.डोंगरपाडा आदिवासी आश्रमशाळेच्या मागे असलेल्या जमिनीमधील शेतात पाणी वळवून घेण्यासाठी बांधलेला वळण बंधारा वादाचा भोवºयात सापडला आहे. कारण तो वळण बंधारा नित्कृष्ट कामामुळे पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्या वळण बंधाºयामधून सुरुवातीला पाणीगळती होत होती आणि त्यामुळे आजूबाजूच्या शेतकºयांनी वळण बंधाºयामधील पाणी त्या ठिकाणी पाणी वळण्यासाठी बांधलेल्या दरवाजातून वळून शेतात जाण्याची शक्यता कमी होती. त्याकडे कृषी विभागाने लक्ष दिले नाही, त्यामुळे तो वळण बंधारा गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेला.सुरुवातीला त्या वळण बंधाºयाच्या तळाशी ज्या ठिकाणी पाणीगळती होत होती, त्या ठिकाणी पहिले भगदाड पडले आणि आता तर त्या ठिकाणी किमान १० मीटर लांबीचा नाला तयार झाला आहे. त्या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेले सिमेंट बांधकाम तोडून टाकले तर पाच लाख खर्चून वळण बंधारा बांधला होता का? हा प्रश्न निर्माण होईल. त्या वळण बंधाºयाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले सिमेंट, रेती, दगड हे खालील भागात असलेल्या शेतात वाहून गेले असून त्यामुळे त्या भागातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट लागले आहे.