शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

पाथरज येथील बंधारा गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:11 IST

तालुक्यातील पाथरज येथील डोंगरपाडा भागात जून २०१७मध्ये वळण बंधारा कर्जत कृषी विभागाने बांधला होता. त्या ठिकाणी कामे नित्कृष्ट होत असल्याचे ग्रामस्थ सांगत असतानादेखील कृषी विभागाने नेमलेल्या

कर्जत : तालुक्यातील पाथरज येथील डोंगरपाडा भागात जून २०१७मध्ये वळण बंधारा कर्जत कृषी विभागाने बांधला होता. त्या ठिकाणी कामे नित्कृष्ट होत असल्याचे ग्रामस्थ सांगत असतानादेखील कृषी विभागाने नेमलेल्या ठेकेदाराकडून वळण बंधाºयाचे काम करताना दर्जा राखण्याचा प्रयत्न केला नाही. पाच लाख रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानात बांधलेला वळण बंधारा वाहून गेला असून, त्याखाली असलेल्या शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी विभाग या कामाची चौकशी करणार का? याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.पाथरज या महसुली गावात कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या महसुली गावातील डोंगरपाडा भागात एक वळण बंधारा आदिवासी आश्रमशाळेच्या मागे जून २०१७मध्ये बांधला होता. त्या भागात शेतकरी फार कमी प्रमाणात असल्याची तक्र ार स्थानिक पातळीवर वळण बंधारा मंजूर केला त्या वेळी शेतकरी करीत होते. मात्र, कृषी विभागाकडे शेतकºयांच्या वळण बंधाºयांच्या नित्कृष्ट कामाबद्दल मोठ्या प्रमाणात तक्र ारी केल्या होत्या; परंतु कृषी विभागाने कोणत्याहीतक्र ारीकडे लक्ष दिले नसल्याने शेवटी तो वळण बंधारा वाहून जाण्याचा प्रसंग ओढवला आहे.कृषी विभागाने त्या ठिकाणी कामे करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला वाचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक तक्रारी होऊनदेखील कृषी विभाग करीत असलेल्या दुर्लक्षामुळे पाच लाख खर्चून बांधलेला वळण बंधारा वाहून जाऊन नुकसान झाले.डोंगरपाडा आदिवासी आश्रमशाळेच्या मागे असलेल्या जमिनीमधील शेतात पाणी वळवून घेण्यासाठी बांधलेला वळण बंधारा वादाचा भोवºयात सापडला आहे. कारण तो वळण बंधारा नित्कृष्ट कामामुळे पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्या वळण बंधाºयामधून सुरुवातीला पाणीगळती होत होती आणि त्यामुळे आजूबाजूच्या शेतकºयांनी वळण बंधाºयामधील पाणी त्या ठिकाणी पाणी वळण्यासाठी बांधलेल्या दरवाजातून वळून शेतात जाण्याची शक्यता कमी होती. त्याकडे कृषी विभागाने लक्ष दिले नाही, त्यामुळे तो वळण बंधारा गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेला.सुरुवातीला त्या वळण बंधाºयाच्या तळाशी ज्या ठिकाणी पाणीगळती होत होती, त्या ठिकाणी पहिले भगदाड पडले आणि आता तर त्या ठिकाणी किमान १० मीटर लांबीचा नाला तयार झाला आहे. त्या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेले सिमेंट बांधकाम तोडून टाकले तर पाच लाख खर्चून वळण बंधारा बांधला होता का? हा प्रश्न निर्माण होईल. त्या वळण बंधाºयाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले सिमेंट, रेती, दगड हे खालील भागात असलेल्या शेतात वाहून गेले असून त्यामुळे त्या भागातील शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट लागले आहे.