शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन प्रणाली, अग्निसुरक्षेचे ऑडिट, रुग्ण सुरक्षेला प्राधान्य द्या - पालकमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:01 IST

जिल्ह्यात काेराेनाचा कहर काही केल्या थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आराेग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : नाशिकला झालेल्या ऑक्सिजनच्या गळतीपाठाेपाठ विरारमधील रुग्णालयात घडलेल्या आगीच्या गंभीर दुर्घटनेमुळे सर्वांचाच थरकाप उडाला आहे. रायगड जिल्ह्यातील ऑक्सिजन आणि आगीच्या व्यवस्थापनाचे तातडीने ऑडिट करण्याचे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. नाशिक आणि विरारसारखी दुर्घटना आपल्या जिल्ह्यात हाेऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.जिल्ह्यात काेराेनाचा कहर काही केल्या थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आराेग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. बहुतांश रुग्णालये खचाखच भरून गेली आहेत. रुग्णांचा आकडा वाढत असताना मृतांच्या आकड्यानेही आता उसळी घेतली आहे. रुग्णांवर उपचार करण्याचे शिवधनुष्य आराेग्य विभाग जेमतेम पेलत आहे. त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेची दमछाक हाेताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याची फार माेठी किंमत माेजावी लागू शकते. याची जाणीव सरकार आणि प्रशासनाला आहे. त्याचाच भाग म्हणून अलिबाग, पनवेल, माणगाव आणि महाड येथील रुग्णालयातील ऑक्सिजन प्रणालीचे ऑडिट करण्यात येत असल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी 'लाेकमत'ला सांगितले. त्याचप्रमाणे विरारसारखी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये. यासाठी जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण भागातील जिल्हा रुग्णालय, कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणांपासून तातडीने अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्याच्या सूचना आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पाेलीस यंत्रणेनेही याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी असे स्पष्ट केले.रायगडच्या जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त हे या निर्देशाचे पालन करतील; तसेच सर्व संबंधितांना आवश्यक ते आदेश जारी करतील, असेही तटकरे यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत शक्य तितकी सावधगिरी बाळगून नागरिकांच्या आणि रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा हाेरपळून मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासन सर्तक झाले आहे. जिल्हा सरकारी रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आराेग्य केंद्र येथील फायर आॅडीट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,    - निधी चाैधरी, जिल्हाधिकारी  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या