शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

ऑक्सिजन प्रणाली, अग्निसुरक्षेचे ऑडिट, रुग्ण सुरक्षेला प्राधान्य द्या - पालकमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:01 IST

जिल्ह्यात काेराेनाचा कहर काही केल्या थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आराेग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : नाशिकला झालेल्या ऑक्सिजनच्या गळतीपाठाेपाठ विरारमधील रुग्णालयात घडलेल्या आगीच्या गंभीर दुर्घटनेमुळे सर्वांचाच थरकाप उडाला आहे. रायगड जिल्ह्यातील ऑक्सिजन आणि आगीच्या व्यवस्थापनाचे तातडीने ऑडिट करण्याचे आदेश रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. नाशिक आणि विरारसारखी दुर्घटना आपल्या जिल्ह्यात हाेऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.जिल्ह्यात काेराेनाचा कहर काही केल्या थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आराेग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. बहुतांश रुग्णालये खचाखच भरून गेली आहेत. रुग्णांचा आकडा वाढत असताना मृतांच्या आकड्यानेही आता उसळी घेतली आहे. रुग्णांवर उपचार करण्याचे शिवधनुष्य आराेग्य विभाग जेमतेम पेलत आहे. त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेची दमछाक हाेताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णालयांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याची फार माेठी किंमत माेजावी लागू शकते. याची जाणीव सरकार आणि प्रशासनाला आहे. त्याचाच भाग म्हणून अलिबाग, पनवेल, माणगाव आणि महाड येथील रुग्णालयातील ऑक्सिजन प्रणालीचे ऑडिट करण्यात येत असल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी 'लाेकमत'ला सांगितले. त्याचप्रमाणे विरारसारखी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये. यासाठी जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण भागातील जिल्हा रुग्णालय, कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणांपासून तातडीने अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्याच्या सूचना आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पाेलीस यंत्रणेनेही याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी असे स्पष्ट केले.रायगडच्या जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त हे या निर्देशाचे पालन करतील; तसेच सर्व संबंधितांना आवश्यक ते आदेश जारी करतील, असेही तटकरे यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत शक्य तितकी सावधगिरी बाळगून नागरिकांच्या आणि रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा हाेरपळून मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासन सर्तक झाले आहे. जिल्हा सरकारी रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आराेग्य केंद्र येथील फायर आॅडीट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,    - निधी चाैधरी, जिल्हाधिकारी  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या