शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

By admin | Updated: December 15, 2015 00:54 IST

सेंद्रिय शेतीचा बोलबाला आता सर्वत्र व्हायला लागला आहे. तरीही अजून बरेच शेतकरी रासायनिक खताचा वापर करून विषारी पिकांचे उत्पादन करीत आहेत. हेच उत्पादन मानवी शरीरात

- जयंत धुळप,  अलिबागसेंद्रिय शेतीचा बोलबाला आता सर्वत्र व्हायला लागला आहे. तरीही अजून बरेच शेतकरी रासायनिक खताचा वापर करून विषारी पिकांचे उत्पादन करीत आहेत. हेच उत्पादन मानवी शरीरात गेल्याने मानवीशरीर अनेक रोगांचे माहेरघर बनत आहे. पनवेल तालुक्यातील गुळसुंदा येथील मिनेश गाडगीळ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रायोगिक संशोधनाद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे. वनस्पतीजन्य व काही प्राणिजन्य पदार्थ तसेच काही नैसर्गिक घटक यांचा उपयोग करुन या सेंद्रिय खताची निर्मिती होते. या संशोधनासाठी ‘भारत सरकारने’ पेटंट देऊन गाडगीळ यांना गौरविले आहे .ही सेंद्रिय खत निर्मिती पूर्णत: देशी-बनावटीची, विषविरहित शेतीमाल उत्पन्न करणारी असून त्याचा योग्य वापर केल्यास,शेती उत्पादनात १५ टक्के ते ५० टक्के उत्पादन वाढ घडवून यश प्राप्त झाले आहे. उत्पादित शेतीमाल शुध्द,सकस होऊन त्याचा आकार व वजन देखील वाढते. याचा उपयोग आजवर सर्व प्रकारची धान्ये, कडधान्ये, फळझाडे, भाज्या-पालेभाज्या, औषधी वनस्पती, फुलझाडे, कापसासारखी इतर पिके यावर अत्यंत यशस्वी झाला असून, प्रगतिशील उत्पादक शेतकरी आणि बागायतदार यांनी त्याचा नियमित वापर सुरु केला असल्याचे गाडगीळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सेंद्रिय खतात ‘भूसुधारक’ व ‘वृक्षसुधारक’ असे दोन विशेष प्रकार असून दोहोंच्या नियमित वापराने किडींचा प्रादुर्भाव शंभर टक्के रोखला जातो. जमिनीचा पोत सुधारतो आणि वनस्पतींची रोग प्रतिकारकशक्ती वाढून उत्पादनात वाढ होते. हे खत घन व द्रव अशा स्वरूपात असून जमिनीत तसेच फवारणी स्वरूपात दिले जाते. या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे घटक असून ते वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचा निष्कर्ष प्राप्त झाल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.सर्व मूलद्रव्ये नैसर्गिक घटकांपासून निर्माणया खतामध्ये मॅग्नेशियम, सोडियम, झिंक, कॅल्शियम, आर्यन व आॅरगॅनिक कार्बन सिलिका इत्यादी मूलद्रव्ये असल्याने उत्पादित धान्य ,फळे, फुले यांची प्रत सुधारते. कार्बोहायड्रेट, फॅट प्रोटीन व फॅटी अ‍ॅसिड यासारख्या घटकांमुळे वनस्पतीची वाढ उत्तम होऊन निर्माण होणारा शेतीमाल उत्तम दर्जाचा होतो. ही सर्व मूलद्रव्ये नैसर्गिक घटकांपासून निर्माण केलेली आहेत. जमिनीतून आणि फवारणीद्वारे दिले जाणारे हे सेंद्रिय पध्दतीचे खत आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा दावा संशोधक गाडगीळ यांनी केला आहे.