शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
9
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
12
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
13
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
14
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
15
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
16
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
17
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
18
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
19
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
20
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

By admin | Updated: December 15, 2015 00:54 IST

सेंद्रिय शेतीचा बोलबाला आता सर्वत्र व्हायला लागला आहे. तरीही अजून बरेच शेतकरी रासायनिक खताचा वापर करून विषारी पिकांचे उत्पादन करीत आहेत. हेच उत्पादन मानवी शरीरात

- जयंत धुळप,  अलिबागसेंद्रिय शेतीचा बोलबाला आता सर्वत्र व्हायला लागला आहे. तरीही अजून बरेच शेतकरी रासायनिक खताचा वापर करून विषारी पिकांचे उत्पादन करीत आहेत. हेच उत्पादन मानवी शरीरात गेल्याने मानवीशरीर अनेक रोगांचे माहेरघर बनत आहे. पनवेल तालुक्यातील गुळसुंदा येथील मिनेश गाडगीळ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रायोगिक संशोधनाद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे. वनस्पतीजन्य व काही प्राणिजन्य पदार्थ तसेच काही नैसर्गिक घटक यांचा उपयोग करुन या सेंद्रिय खताची निर्मिती होते. या संशोधनासाठी ‘भारत सरकारने’ पेटंट देऊन गाडगीळ यांना गौरविले आहे .ही सेंद्रिय खत निर्मिती पूर्णत: देशी-बनावटीची, विषविरहित शेतीमाल उत्पन्न करणारी असून त्याचा योग्य वापर केल्यास,शेती उत्पादनात १५ टक्के ते ५० टक्के उत्पादन वाढ घडवून यश प्राप्त झाले आहे. उत्पादित शेतीमाल शुध्द,सकस होऊन त्याचा आकार व वजन देखील वाढते. याचा उपयोग आजवर सर्व प्रकारची धान्ये, कडधान्ये, फळझाडे, भाज्या-पालेभाज्या, औषधी वनस्पती, फुलझाडे, कापसासारखी इतर पिके यावर अत्यंत यशस्वी झाला असून, प्रगतिशील उत्पादक शेतकरी आणि बागायतदार यांनी त्याचा नियमित वापर सुरु केला असल्याचे गाडगीळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सेंद्रिय खतात ‘भूसुधारक’ व ‘वृक्षसुधारक’ असे दोन विशेष प्रकार असून दोहोंच्या नियमित वापराने किडींचा प्रादुर्भाव शंभर टक्के रोखला जातो. जमिनीचा पोत सुधारतो आणि वनस्पतींची रोग प्रतिकारकशक्ती वाढून उत्पादनात वाढ होते. हे खत घन व द्रव अशा स्वरूपात असून जमिनीत तसेच फवारणी स्वरूपात दिले जाते. या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे घटक असून ते वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचा निष्कर्ष प्राप्त झाल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.सर्व मूलद्रव्ये नैसर्गिक घटकांपासून निर्माणया खतामध्ये मॅग्नेशियम, सोडियम, झिंक, कॅल्शियम, आर्यन व आॅरगॅनिक कार्बन सिलिका इत्यादी मूलद्रव्ये असल्याने उत्पादित धान्य ,फळे, फुले यांची प्रत सुधारते. कार्बोहायड्रेट, फॅट प्रोटीन व फॅटी अ‍ॅसिड यासारख्या घटकांमुळे वनस्पतीची वाढ उत्तम होऊन निर्माण होणारा शेतीमाल उत्तम दर्जाचा होतो. ही सर्व मूलद्रव्ये नैसर्गिक घटकांपासून निर्माण केलेली आहेत. जमिनीतून आणि फवारणीद्वारे दिले जाणारे हे सेंद्रिय पध्दतीचे खत आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा दावा संशोधक गाडगीळ यांनी केला आहे.