शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

By admin | Updated: December 15, 2015 00:54 IST

सेंद्रिय शेतीचा बोलबाला आता सर्वत्र व्हायला लागला आहे. तरीही अजून बरेच शेतकरी रासायनिक खताचा वापर करून विषारी पिकांचे उत्पादन करीत आहेत. हेच उत्पादन मानवी शरीरात

- जयंत धुळप,  अलिबागसेंद्रिय शेतीचा बोलबाला आता सर्वत्र व्हायला लागला आहे. तरीही अजून बरेच शेतकरी रासायनिक खताचा वापर करून विषारी पिकांचे उत्पादन करीत आहेत. हेच उत्पादन मानवी शरीरात गेल्याने मानवीशरीर अनेक रोगांचे माहेरघर बनत आहे. पनवेल तालुक्यातील गुळसुंदा येथील मिनेश गाडगीळ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रायोगिक संशोधनाद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे. वनस्पतीजन्य व काही प्राणिजन्य पदार्थ तसेच काही नैसर्गिक घटक यांचा उपयोग करुन या सेंद्रिय खताची निर्मिती होते. या संशोधनासाठी ‘भारत सरकारने’ पेटंट देऊन गाडगीळ यांना गौरविले आहे .ही सेंद्रिय खत निर्मिती पूर्णत: देशी-बनावटीची, विषविरहित शेतीमाल उत्पन्न करणारी असून त्याचा योग्य वापर केल्यास,शेती उत्पादनात १५ टक्के ते ५० टक्के उत्पादन वाढ घडवून यश प्राप्त झाले आहे. उत्पादित शेतीमाल शुध्द,सकस होऊन त्याचा आकार व वजन देखील वाढते. याचा उपयोग आजवर सर्व प्रकारची धान्ये, कडधान्ये, फळझाडे, भाज्या-पालेभाज्या, औषधी वनस्पती, फुलझाडे, कापसासारखी इतर पिके यावर अत्यंत यशस्वी झाला असून, प्रगतिशील उत्पादक शेतकरी आणि बागायतदार यांनी त्याचा नियमित वापर सुरु केला असल्याचे गाडगीळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सेंद्रिय खतात ‘भूसुधारक’ व ‘वृक्षसुधारक’ असे दोन विशेष प्रकार असून दोहोंच्या नियमित वापराने किडींचा प्रादुर्भाव शंभर टक्के रोखला जातो. जमिनीचा पोत सुधारतो आणि वनस्पतींची रोग प्रतिकारकशक्ती वाढून उत्पादनात वाढ होते. हे खत घन व द्रव अशा स्वरूपात असून जमिनीत तसेच फवारणी स्वरूपात दिले जाते. या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे घटक असून ते वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचा निष्कर्ष प्राप्त झाल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.सर्व मूलद्रव्ये नैसर्गिक घटकांपासून निर्माणया खतामध्ये मॅग्नेशियम, सोडियम, झिंक, कॅल्शियम, आर्यन व आॅरगॅनिक कार्बन सिलिका इत्यादी मूलद्रव्ये असल्याने उत्पादित धान्य ,फळे, फुले यांची प्रत सुधारते. कार्बोहायड्रेट, फॅट प्रोटीन व फॅटी अ‍ॅसिड यासारख्या घटकांमुळे वनस्पतीची वाढ उत्तम होऊन निर्माण होणारा शेतीमाल उत्तम दर्जाचा होतो. ही सर्व मूलद्रव्ये नैसर्गिक घटकांपासून निर्माण केलेली आहेत. जमिनीतून आणि फवारणीद्वारे दिले जाणारे हे सेंद्रिय पध्दतीचे खत आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा दावा संशोधक गाडगीळ यांनी केला आहे.