शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोधच; शेकडो भूमिपुत्र धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

By राजेश भोस्तेकर | Updated: November 1, 2022 15:30 IST

सक्तीचे भूसंपादन केल्यास विरोध करणार

लोकमत न्युज नेटवर्क

अलिबाग : रायगड जिल्ह्यात उद्योगासाठी एम आय डी सी मार्फत हजारो एकर जमीन शेतकऱ्याकडून भूसंपदित केली आहे. मात्र शेतकऱ्याच्या जमिनी घेऊनही अनेक प्रकल्प उभे राहिले नाहीत. त्यामुळे ना रोजगार, ना विकास अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवली आहे. अशी परिस्थिती जिल्ह्यात असताना बल्क औषध निर्मित शेतकऱ्यावर लादण्याचा प्रयत्न सरकार कडून केला जात आहे. शेतकऱ्याचा बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध आहे. सक्तीने भूसंपादन केल्यास अधिकाऱ्यांना परिसरात फिरून देणार नाही असा इशारा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते यांनी दिला आहे.

बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने ऍड महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता. अरुणकुमार वैद्य शाळेजवळ मोर्चा आला असता पोलिसांनी अडवला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शेतकरी आणि एड महेश मोहिते यांनी आपली भूमिका भाषणातून मांडली. त्यानंतर एड महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी याना निवेदन दिले. मुरुड, रोहा परिसरातून शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.

बल्क औषध निर्मित प्रकल्प हा रद्द झाला असला तरी राज्य सरकारतर्फे हा प्रकल्प होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. मात्र या प्रकल्पाला येथील भूमिपुत्रांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पात भूमिपुत्र याची घरे, शाळा, मंदिरे, जमीन जात आहे. त्यामुळे भूमिपुत्र देशोधडीला लागणार आहे. जिल्ह्यात एम आय डी सी तर्फे हजारो एकर जागा उद्योगासाठी घेतलेली आहे. मात्र त्यावर अद्यापही प्रकल्प उभे राहिलेले नाही आहेत. एम आय डी सी ही शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचा आरोप एड महेश मोहिते यांनी केला आहे. भूमिपुत्र याचा या प्रकल्पाला कायम विरोध असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. असे मोहिते यांनी म्हटले आहे. 

तर चर्चा करण्यास तयार

उद्योगमंत्री याच्यासोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या चर्चेअंती सुटणार असतील आणि पर्याय मिळत असेल तर ठीक अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे एड महेश मोहिते यांनी म्हटले आहे. 

उद्योगमंत्री आणि पालकमंत्री यांनी पूर्वीच्या प्रकल्पाबाबत अभ्यास करावा

उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शासनामार्फत बल्क औषध निर्मित प्रकल्प उभारला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र जिल्ह्यात अलिबाग, माणगाव तसेच इतर तालुक्यात प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतकऱ्याच्या जमिनी आजही प्रकल्पवीना पडुन आहेत. याबाबतचा अभ्यास पालकमंत्री यांनी आधी करावा असा टोलाही एड महेश मोहिते यांनी मारला आहे.