शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित औषध निर्माण प्रकल्पाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 00:29 IST

रोहा तालुक्यात सरकारविरोधात झ‌ळकले निषेधाचे फलक, स्थानिकांना अंधारात ठेवल्याने रोष

मिलिंद अष्टीवकररोहा : मुरुड आणि राेहा तालुक्यातील तब्बल २० गावांमध्ये औषध निर्माण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. संबंधित प्रकल्पाबाबत स्थानिकांना काहीच माहिती नसल्याने सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये असंतोष खदखदत आहे. रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी निषेधाचे फलक झळकावत आपला विराेध प्रकट केला.

रोहा तालुक्यातील सात आणि मुरुड तालुक्यातील १३ गावांमध्ये औषध निर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. त्या अनुषंगाने एमआयडीसी कायद्यान्वये प्रशासनामार्फत भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राेहा तालुक्यातील खुटल, न्हावे, नवखार, सोनखार, दिव, बेलखार, पारंगखार या सात गावांतील जमीन संपादित हाेणार आहे. न्हावे, नवखार, साेनखार गावातील शेतकऱ्यांनी एकीची माेट बांधत सरकारला इशारा  दिला आहे.सरकारला प्रकल्प राबवायचा असेल तर आधी नेमका काेणता प्रकल्प येणार आहे, जमिनीला किती दर देण्यात येणार आहे, पुनर्वसन करणार का, जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या राेजगाराचे काय करणार, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. या विभागामध्ये शेतीसह मासेमारी हा व्यवसाय केला जाताे. त्यामुळे मासेमारी समाजासाठी काेणता ठाेस निर्णय घेणार, भविष्यात प्रदूषणाची समस्या झाल्यास त्याला जबाबदार काेण, असे सवाल स्थानिकांनी उपस्थित करीत सरकार आणि प्रशासनाला आता धारेवर धरायला सुरुवात केली आहे.काहीच दिवसांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रकल्पाला विराेध नसल्याचे स्पष्ट केले हाेते. मात्र प्रकल्प उभारताना स्थानिकांना विश्वासात घ्या, त्यांच्या जमिनींचे संपादन करताना सिडकाेचे नियम लावा, प्रकल्पात ज्यांच्या जमिनी जातील त्यांना साडेबावीस टक्के विकसित भूखंड दिला पाहिजे, स्थानिकांना प्रकल्पामध्ये स्थान दिले पाहिजे तसेच प्रकल्पामध्ये आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासाठी आधीपासूनच स्थानिकांना प्रशिक्षित करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली हाेती. राेहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तर थेट प्रकल्पाला विराेध केला आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबत दाेन विभिन्न विचार मांडले जात असल्याचेही दिसून येते.

टॅग्स :Raigadरायगड