शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

प्रस्तावित औषध निर्माण प्रकल्पाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 00:29 IST

रोहा तालुक्यात सरकारविरोधात झ‌ळकले निषेधाचे फलक, स्थानिकांना अंधारात ठेवल्याने रोष

मिलिंद अष्टीवकररोहा : मुरुड आणि राेहा तालुक्यातील तब्बल २० गावांमध्ये औषध निर्माण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. संबंधित प्रकल्पाबाबत स्थानिकांना काहीच माहिती नसल्याने सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये असंतोष खदखदत आहे. रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी निषेधाचे फलक झळकावत आपला विराेध प्रकट केला.

रोहा तालुक्यातील सात आणि मुरुड तालुक्यातील १३ गावांमध्ये औषध निर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. त्या अनुषंगाने एमआयडीसी कायद्यान्वये प्रशासनामार्फत भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राेहा तालुक्यातील खुटल, न्हावे, नवखार, सोनखार, दिव, बेलखार, पारंगखार या सात गावांतील जमीन संपादित हाेणार आहे. न्हावे, नवखार, साेनखार गावातील शेतकऱ्यांनी एकीची माेट बांधत सरकारला इशारा  दिला आहे.सरकारला प्रकल्प राबवायचा असेल तर आधी नेमका काेणता प्रकल्प येणार आहे, जमिनीला किती दर देण्यात येणार आहे, पुनर्वसन करणार का, जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या राेजगाराचे काय करणार, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. या विभागामध्ये शेतीसह मासेमारी हा व्यवसाय केला जाताे. त्यामुळे मासेमारी समाजासाठी काेणता ठाेस निर्णय घेणार, भविष्यात प्रदूषणाची समस्या झाल्यास त्याला जबाबदार काेण, असे सवाल स्थानिकांनी उपस्थित करीत सरकार आणि प्रशासनाला आता धारेवर धरायला सुरुवात केली आहे.काहीच दिवसांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रकल्पाला विराेध नसल्याचे स्पष्ट केले हाेते. मात्र प्रकल्प उभारताना स्थानिकांना विश्वासात घ्या, त्यांच्या जमिनींचे संपादन करताना सिडकाेचे नियम लावा, प्रकल्पात ज्यांच्या जमिनी जातील त्यांना साडेबावीस टक्के विकसित भूखंड दिला पाहिजे, स्थानिकांना प्रकल्पामध्ये स्थान दिले पाहिजे तसेच प्रकल्पामध्ये आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासाठी आधीपासूनच स्थानिकांना प्रशिक्षित करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली हाेती. राेहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तर थेट प्रकल्पाला विराेध केला आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबत दाेन विभिन्न विचार मांडले जात असल्याचेही दिसून येते.

टॅग्स :Raigadरायगड