शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रंगभूषेत रंगले अवघे कुटुंब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 23:53 IST

सावंत कुटुंबीयांनी गाजवली हिंदी मालिका, सीनेसृष्टी : ‘रामायण’फेम गोपाळ सावंत होते मेरूमणी

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : अवघे कुटुंबच एखाद्या कलेला वाहून घेत असल्याची अनेक उदाहरणे आढळतात. रंगभूषा या पडद्याआडच्या महत्त्वपूर्ण कलेसाठी एका कुटुंबाने पिढ्यानपिढ्या योगदान दिले आहे. ते कुटुंब म्हणजे, सध्या दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिकेच्या माध्यमातून पुन्हा प्रकाशझोतात आलेले प्रख्यात रंगभूषाकार दिवंगत गोपाळ सावंत यांचे होय. त्यांचे सुपुत्र सूर्यकांत सावंत व उत्तम सावंत यांनी मेकअपमन म्हणून, तर कन्या मंगला जाधव यांनी केशभूषाकार म्हणून लौकिक मिळवित हा वारसा पुढे नेला.‘लोकमत’शी बोलताना सूर्यकांत सावंत म्हणाले, रायगड जिल्ह्यातील महाडमधील विनेर हे सावंत कुटुंबाचे मूळ स्थान. हे कुटुंब मुंबईत रवाना झाले. १९६0च्या दशकापासून हिंदीतील रंगभूषेच्या क्षेत्रात गोपाळ सावंत यांनी आपले स्वत:चे स्थान निर्माण केले. तत्पूर्वी त्यांनी नाट्यक्षेत्रातही मुशाफिरी केली. त्यांचे बंधू सखाराम व रामचंद्र अनुक्रमे माला सिन्हा व रेखा यांचे पर्सनल मेकअपमन म्हणून कार्यरत होते. सखाराम यांच्यासोबत १६९३पासून गोपाळ सावंत यांनी सहरंगभूषाकार म्हणून काम सुरू केले. पारसमणी (१९६३), सरस्वतीचंद्र (१९६८), सच्चाझुठा (१९७0), ललकार (१९७२) हे चित्रपट करत असताना ‘हारजीत’ चित्रपटासाठी प्रमुख रंगभूषाकार म्हणून पदार्पण केले. रामानंद सागर यांच्या ‘गीत’ चित्रपटासाठी या तिन्ही भावांनी एकत्र काम केले. १९७५मध्ये राधा सलुजा या अभिनेत्रीसोबत त्यांनी पर्सनल मेकअपमन म्हणून काम सुरू केले.१९८0मध्ये ज्येष्ठ सुपुत्र सूर्यकांत यांना त्यांनी रंगभूषा क्षेत्रात आणले. १९८४मध्ये रामानंद सागर यांनी गोपाळ सावंत यांना बोलावणे पाठविले. सागर यांच्या बंगल्यावर ‘रामायण’साठी कलाकारांची निवड होत होती. त्यात कलाकारांच्या ‘लुक टेस्ट’साठी महत्त्वपूर्ण जबाबदारी गोपाळ सावंत यांनी पार पाडली. १९८६मध्ये नटराज स्टुडिओचा सेट लावून ‘रामायण’चा मुहूर्त करण्यात आला. मात्र जागेअभावी उंबरगाव येथील वृंदावन स्टुडिओत शुटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिथे गोपाळ सावंत यांनी आपल्या हातातील जादूची अदाकारी दाखवून दिली. वानरसेनेतील विरांचे मुखवटे व रंगभूषा करण्याचे किचकट काम ते लिलया करत असत. ‘रामायण’चा ‘चेहरा’ म्हणून गोपाळ सावंत यांच्याकडे बघितले जाई.पुढे उत्तर रामायण, श्रीकृष्ण मालिकेसाठी त्यांनी काम केले. बडोदा येथील लक्ष्मी स्टुडिओमध्ये अलिफ लैला, सिंदबाद, जय गंगामैया या मालिकांसाठी त्यांनी काम केले. १९९५ मध्ये गोपाळ सावंत यांचे निधन झाले व हिंदी सिने, मालिका क्षेत्रातील एक तारा निखळला.पुढे सागर आर्ट कंपनीत प्रमुख रंगभूषाकार म्हणून त्यांचे सुपुत्र सूर्यकांत सावंत रुजू झाले. आँखे, हातीम, पृथ्वीराज चौहान, धरमवीर, झी टीव्हीवरील साईबाबा, रामायण, स्वामी नारायण या मालिकांसाठी त्यांनी काम केले. उत्तर रामायण, श्रीकृष्ण मालिकांमध्ये गोपाळ सावंत यांची कन्या मंगला जाधव यांनी केशभूषाकार म्हणून काम केले. दुसरा मुलगा उत्तम सावंत यांनीही श्रीकृष्ण मालिकेपासून सहरंगभूषाकार म्हणून काम केले.सिने क्षेत्रात अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या क्षेत्रांच्या तुलनेत रंगभूषा हा प्रांत तसा दुर्लक्षित राहिला आहे. मात्र ‘रामायण’च्या निमित्ताने या क्षेत्रासाठी वाहून घेणा-या सावंत कुटुंबीयांचा परिचय रसिकांना झाला.

टॅग्स :bollywoodबॉलिवूड