शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
5
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
6
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
7
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
8
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
9
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
10
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
11
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
12
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
13
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
14
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
15
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
16
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
17
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
18
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
19
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
20
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप

रंगभूषेत रंगले अवघे कुटुंब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 23:53 IST

सावंत कुटुंबीयांनी गाजवली हिंदी मालिका, सीनेसृष्टी : ‘रामायण’फेम गोपाळ सावंत होते मेरूमणी

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : अवघे कुटुंबच एखाद्या कलेला वाहून घेत असल्याची अनेक उदाहरणे आढळतात. रंगभूषा या पडद्याआडच्या महत्त्वपूर्ण कलेसाठी एका कुटुंबाने पिढ्यानपिढ्या योगदान दिले आहे. ते कुटुंब म्हणजे, सध्या दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिकेच्या माध्यमातून पुन्हा प्रकाशझोतात आलेले प्रख्यात रंगभूषाकार दिवंगत गोपाळ सावंत यांचे होय. त्यांचे सुपुत्र सूर्यकांत सावंत व उत्तम सावंत यांनी मेकअपमन म्हणून, तर कन्या मंगला जाधव यांनी केशभूषाकार म्हणून लौकिक मिळवित हा वारसा पुढे नेला.‘लोकमत’शी बोलताना सूर्यकांत सावंत म्हणाले, रायगड जिल्ह्यातील महाडमधील विनेर हे सावंत कुटुंबाचे मूळ स्थान. हे कुटुंब मुंबईत रवाना झाले. १९६0च्या दशकापासून हिंदीतील रंगभूषेच्या क्षेत्रात गोपाळ सावंत यांनी आपले स्वत:चे स्थान निर्माण केले. तत्पूर्वी त्यांनी नाट्यक्षेत्रातही मुशाफिरी केली. त्यांचे बंधू सखाराम व रामचंद्र अनुक्रमे माला सिन्हा व रेखा यांचे पर्सनल मेकअपमन म्हणून कार्यरत होते. सखाराम यांच्यासोबत १६९३पासून गोपाळ सावंत यांनी सहरंगभूषाकार म्हणून काम सुरू केले. पारसमणी (१९६३), सरस्वतीचंद्र (१९६८), सच्चाझुठा (१९७0), ललकार (१९७२) हे चित्रपट करत असताना ‘हारजीत’ चित्रपटासाठी प्रमुख रंगभूषाकार म्हणून पदार्पण केले. रामानंद सागर यांच्या ‘गीत’ चित्रपटासाठी या तिन्ही भावांनी एकत्र काम केले. १९७५मध्ये राधा सलुजा या अभिनेत्रीसोबत त्यांनी पर्सनल मेकअपमन म्हणून काम सुरू केले.१९८0मध्ये ज्येष्ठ सुपुत्र सूर्यकांत यांना त्यांनी रंगभूषा क्षेत्रात आणले. १९८४मध्ये रामानंद सागर यांनी गोपाळ सावंत यांना बोलावणे पाठविले. सागर यांच्या बंगल्यावर ‘रामायण’साठी कलाकारांची निवड होत होती. त्यात कलाकारांच्या ‘लुक टेस्ट’साठी महत्त्वपूर्ण जबाबदारी गोपाळ सावंत यांनी पार पाडली. १९८६मध्ये नटराज स्टुडिओचा सेट लावून ‘रामायण’चा मुहूर्त करण्यात आला. मात्र जागेअभावी उंबरगाव येथील वृंदावन स्टुडिओत शुटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिथे गोपाळ सावंत यांनी आपल्या हातातील जादूची अदाकारी दाखवून दिली. वानरसेनेतील विरांचे मुखवटे व रंगभूषा करण्याचे किचकट काम ते लिलया करत असत. ‘रामायण’चा ‘चेहरा’ म्हणून गोपाळ सावंत यांच्याकडे बघितले जाई.पुढे उत्तर रामायण, श्रीकृष्ण मालिकेसाठी त्यांनी काम केले. बडोदा येथील लक्ष्मी स्टुडिओमध्ये अलिफ लैला, सिंदबाद, जय गंगामैया या मालिकांसाठी त्यांनी काम केले. १९९५ मध्ये गोपाळ सावंत यांचे निधन झाले व हिंदी सिने, मालिका क्षेत्रातील एक तारा निखळला.पुढे सागर आर्ट कंपनीत प्रमुख रंगभूषाकार म्हणून त्यांचे सुपुत्र सूर्यकांत सावंत रुजू झाले. आँखे, हातीम, पृथ्वीराज चौहान, धरमवीर, झी टीव्हीवरील साईबाबा, रामायण, स्वामी नारायण या मालिकांसाठी त्यांनी काम केले. उत्तर रामायण, श्रीकृष्ण मालिकांमध्ये गोपाळ सावंत यांची कन्या मंगला जाधव यांनी केशभूषाकार म्हणून काम केले. दुसरा मुलगा उत्तम सावंत यांनीही श्रीकृष्ण मालिकेपासून सहरंगभूषाकार म्हणून काम केले.सिने क्षेत्रात अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या क्षेत्रांच्या तुलनेत रंगभूषा हा प्रांत तसा दुर्लक्षित राहिला आहे. मात्र ‘रामायण’च्या निमित्ताने या क्षेत्रासाठी वाहून घेणा-या सावंत कुटुंबीयांचा परिचय रसिकांना झाला.

टॅग्स :bollywoodबॉलिवूड