शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

परवाना हातपाटीचा मात्र उत्खनन सक्शन पंपाद्वारे

By admin | Updated: January 2, 2017 04:14 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळ्या धंद्यांनी मान टाकलेली असताना ताठ मानेने उभा राहिलेला व्यवसाय म्हणजे अवैध गौण खनिज उत्खनन होय. गेल्या पन्नास दिवसांच्या

पेण : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळ्या धंद्यांनी मान टाकलेली असताना ताठ मानेने उभा राहिलेला व्यवसाय म्हणजे अवैध गौण खनिज उत्खनन होय. गेल्या पन्नास दिवसांच्या कालावधीत रात्रीच्या वेळेस सक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उपसा रायगडातील सर्वच प्रमुख खाड्या व नदीपात्रात खुलेआम सुरू असून जिल्हाभरात सुमारे दीडशे ते दोनशे सक्शन पंप अवैध वाळू उपसा करीत असून या प्रमुख खाड्यांमध्ये हातपाटीद्वारे वाळू उपसा करण्यास दिलेली परवानगी आडून या सर्व ठिकाणी सक्शनचा धूमधडाका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ना खाऊंगा, ना खाणे दूंगा या वक्त व्याचा ध्यास घेवून महसूल व वाहतूक पोलीस यंत्रणेने याबाबत धडक कारवाई करावी अशी आम जनतेची मागणी आहे.रायगडला २४० किमीचा समुद्र किनारा लाभला असून प्रमुख नदीपात्रे व खाड्या हे कुबेराचे भांडार आहे. कोणीही गल्लीबोळातला उठतो व रेती व्यवसायाशी संबंध ठेवीत या गौण खनिज उत्खननाची लुटमार करतो. यावर स्थानिक तलाठी, कोतवाल अथवा मंडल अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसते. राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणारे वाळू वाहतुकीचे ट्रक्स, डंपर जप्त करून कारवाई केली जाते. या कारवाईमध्ये हाती लागते नाममात्र रक्कम. मात्र या प्रतितास १३८५ रुपये रॉयल्टी हातपाटी व्यावसायिकांना लावली जाते. मात्र अशा प्रकारे धंदा करणारे जिल्हाभरात १२०० ते १५०० पारंपरिक आहेत. ते ज्या ठिकाणी व्यवसाय करतात त्याच ठिकाणी सक्शन पंपाद्वारे अवैध धंद्याद्वारे रात्रीच्या वेळेत उत्खनन करून प्रति सक्शन पंप ५० ब्रास रेतीचे उत्खनन करतो. केंद्र व राज्य शासनाने सगळीकडे सर्वच क्षेत्रात कडक निर्बंध केले असता, ज्या गौण खनिज उत्खननातून करोडो रुपयांचा शासकीय महसूल बुडवून अवैध मार्गाने राष्ट्राच्या संपत्तीची लूटमार करणारे शेठ म्हणून आज बाजारात क्रेडिट मिळवीत आहे. सामान्य शेतकरी, मजूर, मध्यमवर्गीय कष्ट करून पोटाची खळगी भरत असताना समुद्रमंथनातून अवैध लुटीची माया गोळा करणारे रेतीमाफिया, त्यांना अभय देणारी प्रशासकीय यंत्रणा यांच्यावर निर्बंध लावून चौकशी करण्याची गरज आहे. राष्ट्रनिर्माणासाठी विज्ञान तंत्रज्ञान आहे तर रात्रीच्या वेळी चालणाऱ्या अवैध धंद्यावर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून जिल्हा व तालुका महसूल, पोलीस यंत्रणेला माहिती मिळणारी यंत्रणा उभी करून डिजिटल इंडियाद्वारे राष्ट्राची आर्थिक हानी थांबवावी, अशी सामान्य जनतेची इच्छा आहे. (वार्ताहर)