शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

आॅनलाइन सातबाराची शेतकऱ्यांना डोकेदुखी

By admin | Updated: January 1, 2016 23:53 IST

शेतकऱ्यांना आपला सातबारा, फेरफार व ८ अ कधीही मिळावा, सातबारा आॅनलाइन पाहावयास मिळावा, कोणत्याही तऱ्हेचा आपल्या सातबारामध्ये बोगस फेरबदल होत असेल तर त्वरित

दासगाव : शेतकऱ्यांना आपला सातबारा, फेरफार व ८ अ कधीही मिळावा, सातबारा आॅनलाइन पाहावयास मिळावा, कोणत्याही तऱ्हेचा आपल्या सातबारामध्ये बोगस फेरबदल होत असेल तर त्वरित माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आॅनलाइन सातबारा मिळण्याची सुविधा अमलात आणली व हस्तलिखित सातबारा ३ नोव्हेंबर २०१५ पासून देण्यास सरकारने तलाठ्यांना आदेश देऊन बंद केले. सद्य:स्थितीत महाड तालुक्यातील आॅनलाइन सातबारा मिळण्याचा भूलेख सर्व्हर बंद तसेच नेटवर्कचीही समस्या असल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळण्यास दोन-दोन दिवस आॅनलाइन प्रयत्न करावे लागत आहेत. सध्या आॅनलाइन सातबारा ही शेतकऱ्याला डोकेदुखी झाली आहे. घरी बसून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा सातबारा पाहावा, शेतकऱ्याला २४ तास सातबारा मिळण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच बोगस खरेदी, जमीन विक्रीवर आळा बसावा, या दृष्टिकोनातून सरकारने शेतकऱ्यांसाठी आॅनलाइन ई-फेरफार सातबारा मिळण्याची सुविधा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केली. मात्र ही सुविधा सुरू करण्यापूर्वी महाड तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी सहा महिने आॅनलाइन जमिनीचा सर्व डाटा महाभूलेख या सर्व्हरवर जोडण्याचे काम केले. महाराष्ट्राचे महाभूलेख सातबारा व फेरफार आॅनलाइन मिळण्याचे एकच सर्व्हर आहे. याचे सर्व कामकाज जमा व बंदी आयुक्त कार्यालय, पुणे येथे आहे. येथूनच महाराष्ट्राचे आॅनलाइन सातबारा फेरफार डाटा अपडेट केला जातो.महाड तालुक्यात ३३ तलाठी सजा आहेत. त्या सजेमध्ये अनेक गाव त्या ठिकाणच्या वाड्या व खेडे आहेत. तालुक्यातील ८० टक्के भाग हा दुर्गम आहे. या दुर्गम भागात नेटवर्क सुविधा चांगल्या पद्धतीत उपलब्ध नाही. मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या एकाच बाजूचा विचार केला, दुसऱ्या बाजूचा विचार न केल्याने आज शेतकऱ्यांना आॅनलाइन सातबारा मिळणेही मोठी डोकेदुखी झाली आहे. सर्व तलाठ्यांनी लॅपटॉप व प्रिंटर आपल्या स्वत:च्या खर्चाने आणायचे. मात्र लॅपटॉप आहे तर प्रिंटर नाही, अशी स्थिती आहे. यामुळे खेड्यातील शेतकऱ्यांना शहराच्या ठिकाणी येऊन सातबारा घेऊन पुन्हा तलाठ्याची सही घेण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी जावे लागत आहे. (वार्ताहर)सर्व्हर होतोय बंदसातबारा मिळाला तर त्यावर अनेक चुका आढळुन येत आहेत. गेली महिनाभर महाभूलेख सातबारा मिळण्याचा सर्व्हर हा बंद पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सातबारा मिळण्यास उशीर होत आहे. महाड तालुक्यात सहा मंडळाधिकारी कार्यालय आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व नेट सुविधा दिल्या आहेत. मात्र हे कार्यालय गावठिकाणाहून काही अंतरावर असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.