शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

जिल्ह्यात ३ हजार ३६ घरांना आॅनलाइन मंजुरी

By admin | Updated: October 11, 2016 03:18 IST

निराधार आणि घर नसलेल्यांकरिता देशात अमलात आणण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये रायगड जिल्ह्यात ३ हजार ३६ ग्रामस्थांच्या

जयंत धुळप / अलिबागनिराधार आणि घर नसलेल्यांकरिता देशात अमलात आणण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१५-१६ मध्ये रायगड जिल्ह्यात ३ हजार ३६ ग्रामस्थांच्या घरांना आॅनलाइन मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार २६५ ग्रामस्थांना वित्त साह्याचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे, तर १ हजार ६७ जणांना घरांसाठी दुसरा हप्ता देखील देण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही प्रत्येक भारतीयासाठी स्वत:चे हक्काचे घर असावे यासाठी केलेली महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेअंतर्गत सन २०२२ पर्यंत शहरी गरिबांसाठी २ कोटी घरे बांधण्यात येणार आहेत. यात ९५ टक्के लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बलस्तरातील असतील. तर महत्त्वाचे म्हणजे देशात अतिशय अल्प काळात ६ लाख घरांच्या बांधकामास प्रारंभ देखील झालेला आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात ३ लाख ५ हजार ०२४ लाभधारक सहभागी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. १ जून २०१५ पासून संपूर्ण देशभर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली. भारतातील गरिबांसाठी सामाजिक सुरक्षेचे कवच असलेली, जन सुरक्षा असलेली ही लाभदायक अशी योजना आहे. देशपातळीवर या योजनेमध्ये १३ मे २०१६ अखेर ९ कोटी ४३ लाख लोकांची नोंदणी झाली आहे. केवळ १२ रु पये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक अपघात विमा योजना आहे. दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असणाऱ्या या योजनेची बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या अंमलबजावणी करण्यात येत आहे.१८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकते. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीला आधार क्र मांकाद्वारे योजनेत सहभागी होता येईल. विमा हप्ता बँक खात्यात परस्पर टाकला जाईल. पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मेपर्यंत देणे आवश्यक राहील. या योजनेत विमा संरक्षण हे ३0 जून ते ३१ मे अशा एक वर्षाच्या काळासाठी लागू असते.