शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

पेणमध्ये १ लाख कांदळवनाची लागवड

By admin | Updated: April 23, 2017 02:19 IST

स्थानिक महिलांच्या सहकार्याने नर्सरीत कांदळवनांच्या रोपांची निर्मिती करून तब्बल १ लाख ५ हजार ४३५ कांदळवन रोपांची लागवडीचा यशस्वी प्रयोग पेणमधील जेएसडब्ल्यू इस्पात

- जयंत धुळप, अलिबाग स्थानिक महिलांच्या सहकार्याने नर्सरीत कांदळवनांच्या रोपांची निर्मिती करून तब्बल १ लाख ५ हजार ४३५ कांदळवन रोपांची लागवडीचा यशस्वी प्रयोग पेणमधील जेएसडब्ल्यू इस्पात या लोखंडनिर्मिती उद्योगाच्या ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’ आणि पेण तालुक्यांतील पाच गावांतील ३४ महिला स्वयंसहाय्यता गटांनी राबवला आहे. त्यामुळे खाडीकिनाऱ्याजवळील खारपाणी घुसून नापीक झालेल्या शेतात पुन्हा भातशेतीची लागवड करता येणार आहे. कांदळवन लागवडीचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. धरमतर खाडीकिनारचा फुटलेला ५ हजार ९०१ मीटर लांबीचा बंधाराही जेएसडब्ल्यू इस्पातच्या १ कोटी ३३ लाख ७० हजार रुपयांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बांधण्यात आला. त्यामुळे नापिक झालेली १५ गावांतील ५ हजार हेक्टर भातशेती खाऱ्या पाण्यापासून संरक्षित झाली. बंधाऱ्याचे काम सुरू असतानाच, तज्ज्ञ वनस्पती शास्त्रज्ञ आणि किनारी गावांतील जाणकार ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कांदळवनांच्या कोणत्या जातीची रोपे तयार करायची, हे निश्चित करण्यात आले. तसेच रोपे तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यूच्या वनस्पती व फलोत्पाद संशोधन विभागाच्या माध्यमातून रोपवाटिका तयार करण्यात आल्या. या रोपवाटिकांमध्ये स्थानिक महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सुमारे ३४० महिलांनी रोपांची निर्मिती केली.गतवर्षी ८ आॅक्टोबर रोजी ग्रामसमृद्धी संकल्प चमू, जेएसडब्ल्यूचे अधिकारी, जेएसडब्ल्यू इस्पात सामाजिक उत्तरदायित्व निधी विनियोग समितीचे प्रमुख मोहन घाडगे आणि ३४ महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत कांदळवन रोप लागवडीस प्रारंभ करण्यात आला. २५ ते २८ आॅक्टोबर २०१६दरम्यान लागवड करण्यात आलेल्या या सर्व रोपांचे वनस्पती तज्ज्ञांच्या माध्यमातून परीक्षण करण्यात आले. वर्षभरात रोपांनी चांगलाच जोम धरला असून, धरमतर खाडीकिनारच्या नैसर्गिक जैवविविधतेस नव्याने समृद्धी प्राप्त झाल्याचे शनिवारच्या जागतिक वसुंधरा दिनी स्पष्ट झाले आहे.भात लागवड शक्यलागवड करण्यात आलेल्या १ लाख ५ हजार ४३५ कांदळवनांच्या रोपांमुळे नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर उधाणाच्या भरतीच्या लाटांच्या माऱ्याची तीव्रता कमी होईल. शिवाय खाडीकिनारी गावांत यंदाच्या मान्सूनमध्ये पुन्हा एकदा भात लागवडीखाली येऊ शकेल, असा आशावाद धरमतर खाडीकिनारच्या या १५ गावांतील शेतकरी ग्रामस्थांना आहे. आगामी काळात विठ्ठलवाडी ते भाल या किनारी भागातील ५० एकर क्षेत्रांत कांदळवन लागवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती, जेएसडब्ल्यूचे वरिष्ठ व्यवस्थापक अरुण शिर्के यांनी दिली आहे.