शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

एक लाख कोटीचा सुविधा आराखडा

By admin | Updated: September 9, 2015 23:50 IST

येत्या पाच वर्षांत रायगड जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट होणार असून येत्या पाच वर्षांत रायगड जिल्हा राज्यातील क्रमांक एकचा जिल्हा झालेला असेल आणि त्याकरिता एक लाख

अलिबाग : येत्या पाच वर्षांत रायगड जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट होणार असून येत्या पाच वर्षांत रायगड जिल्हा राज्यातील क्रमांक एकचा जिल्हा झालेला असेल आणि त्याकरिता एक लाख कोटी रुपयांचा पायाभूत सुविधा आराखडा राज्य सरकारने तयार केला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी बुधवारी येथे बोलताना दिली आहे.येथील कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयास पालकमंत्री मेहता यांनी भेट देवून पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात पालकमंत्री मेहता बोलत होते.शिवरायांच्या काळातील रायगड पुन्हा उभारण्याची तब्बल १०० कोटी रुपयांची योजना राज्य सरकारने हाती घेतली आहे. नेपथ्यकार व दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारणार असून या योजनेतील पहिल्या टप्प्यातील म्हणजे ५० कोटी रुपयांच्या कामास प्रारंभ झाला आहे. जगभरातील एक अनन्यसाधारण ऐतिहासिक पर्यटनस्थळ रायगड किल्ला होणार असल्याचे पालकमंत्री मेहता यांनी सांगितले. यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा गीतांजली ओक,आमदार प्रशांत ठाकूर, पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक महेश्वर देशमुख, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीष तळपुळे आदी मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)