शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सरकारी कर्मचाऱ्यांचे एक तास 'वॉक आउट' आणि निदर्शने

By निखिल म्हात्रे | Updated: February 16, 2024 16:07 IST

केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगार-कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद नाही. 

अलिबाग : जुनी पेन्शन व अन्य मागण्या, तसेच केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात रायगड जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी एक तासाचे ‘वॉक आउट’ व निदर्शने केली. यावेळी आपल्या विविध ११ मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना दिले. केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगार-कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद नाही. 

कंत्राटीकरण व खासगीकरणाच्या अतिरेकी धोरणामुळे बेरोजगारीचा प्रश्न अधिक जटील झाला आहे. केंद्र शासनाच्या कर्मचारी, कामगार व शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व इतर जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील ६० लाख राज्य सरकारी कर्मचारी, तसेच शेतकरी, कामगार, श्रमिक, मजदूर, आयटक, इंटक, अशा देशभरातील ११ प्रमुख संघटना एकत्रित येऊन भारत बंद आणि संप पुकारला आहे; परंतु महाराष्ट्र राज्यात प्रत्यक्ष संप न करता त्या संपास पाठिंबा आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी सकाळी वॉक आउट करून जोरदार निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ या संघटना अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाशी संलग्न आहेत. वर्षभरात सात दिवसांचा व एक दिवसाचा संप आंदोलनानंतर आजच्या स्थितीत संपासारखे आंदोलन करून शासनाबरोबर असलेला प्रागतिक चर्चेत खंड न पाडणे ही आजच्या काळाची गरज आहे; परंतु महासंघाने उपरोक्त संप आंदोलनाद्वारे जे जिव्हाळ्याचे मुद्दे उपस्थित केले आहेत, ते कर्मचारी व सामान्य जनता यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत.

त्यामुळे महासंघाने पुकारलेल्या आंदोलनापासून वेगळे न राहता या आंदोलनाला कर्तव्य सहभाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील, तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासमोर आज वॉक आउट व निदर्शने करण्यात आली.

काय आहेत मागण्या?केंद्र शासनाने सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन लागू करावी, (१९८२च्या नियमानुसार परिभाषित पेन्शन योजना ओपीएस), पीएफआरडीए कायदा रद्द करावा. कामगार कर्मचारीविरोधी धोरण रद्द करा, कामगार कायद्यात करण्यात आलेल्या कामगारविरोधी सुधारणा रद्द करा. आठवा वेतन आयोगाचे गठन करा, दर पाच वर्षांनी वेतन सुधारणा करा. सर्व विभागातील रिक्त पदे कायमस्वरूपी भरा. बेरोजगारांना काम द्या.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करा. त्यांना किमान वेतन व सेवेची हमी मिळावी. खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, सरकारी उद्योग व उपक्रमाचे खासगीकरण करण्यात येऊ नये. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, शिक्षणाचे छुपे खासगीकरण रद्द करा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाअट करा. सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घ्या. महागाई कमी करा, या मागण्यांकरिता हे वॉक आउट आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगड