शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांचे एक तास 'वॉक आउट' आणि निदर्शने

By निखिल म्हात्रे | Updated: February 16, 2024 16:07 IST

केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगार-कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद नाही. 

अलिबाग : जुनी पेन्शन व अन्य मागण्या, तसेच केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात रायगड जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी एक तासाचे ‘वॉक आउट’ व निदर्शने केली. यावेळी आपल्या विविध ११ मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना दिले. केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगार-कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद नाही. 

कंत्राटीकरण व खासगीकरणाच्या अतिरेकी धोरणामुळे बेरोजगारीचा प्रश्न अधिक जटील झाला आहे. केंद्र शासनाच्या कर्मचारी, कामगार व शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व इतर जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील ६० लाख राज्य सरकारी कर्मचारी, तसेच शेतकरी, कामगार, श्रमिक, मजदूर, आयटक, इंटक, अशा देशभरातील ११ प्रमुख संघटना एकत्रित येऊन भारत बंद आणि संप पुकारला आहे; परंतु महाराष्ट्र राज्यात प्रत्यक्ष संप न करता त्या संपास पाठिंबा आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी सकाळी वॉक आउट करून जोरदार निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ या संघटना अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाशी संलग्न आहेत. वर्षभरात सात दिवसांचा व एक दिवसाचा संप आंदोलनानंतर आजच्या स्थितीत संपासारखे आंदोलन करून शासनाबरोबर असलेला प्रागतिक चर्चेत खंड न पाडणे ही आजच्या काळाची गरज आहे; परंतु महासंघाने उपरोक्त संप आंदोलनाद्वारे जे जिव्हाळ्याचे मुद्दे उपस्थित केले आहेत, ते कर्मचारी व सामान्य जनता यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत.

त्यामुळे महासंघाने पुकारलेल्या आंदोलनापासून वेगळे न राहता या आंदोलनाला कर्तव्य सहभाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील, तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासमोर आज वॉक आउट व निदर्शने करण्यात आली.

काय आहेत मागण्या?केंद्र शासनाने सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन लागू करावी, (१९८२च्या नियमानुसार परिभाषित पेन्शन योजना ओपीएस), पीएफआरडीए कायदा रद्द करावा. कामगार कर्मचारीविरोधी धोरण रद्द करा, कामगार कायद्यात करण्यात आलेल्या कामगारविरोधी सुधारणा रद्द करा. आठवा वेतन आयोगाचे गठन करा, दर पाच वर्षांनी वेतन सुधारणा करा. सर्व विभागातील रिक्त पदे कायमस्वरूपी भरा. बेरोजगारांना काम द्या.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करा. त्यांना किमान वेतन व सेवेची हमी मिळावी. खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, सरकारी उद्योग व उपक्रमाचे खासगीकरण करण्यात येऊ नये. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, शिक्षणाचे छुपे खासगीकरण रद्द करा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाअट करा. सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घ्या. महागाई कमी करा, या मागण्यांकरिता हे वॉक आउट आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगड