शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे 'कोरोना' अन् गावाला एसटी 'जाईना'; चाकरमानी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:00 IST

चाकरमानी हैराण; धनगरमलई मार्गातील मुंबई गाड्या बंद

गणेश प्रभाळे

दिघी : मागील काही दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन विभागातील एसटी प्रवास कटकटीचा होऊन खिशाला चांगलीच चाट देणारा ठरत आहे. दिवेआगर येथून सकाळी मुंबईला जाणारी एसटी बंद केली आहे. ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी होत असताना त्यामध्ये सायंकाळी सुटणारी श्रीवर्धन-मुंबईदेखील बंद झाल्याने मुंबईहून गावाकडे होळी उत्सवासाठी निघालेल्या प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

एकीकडे ग्रामीण भागाची लाइफलाइन म्हणून एसटीचा आपण मोठ्या अभिमानाने उल्लेख करीत असलो तरी एसटीचा प्रवास म्हणजे अनंत अडचणींचा सामना होय. याचा प्रत्यय सध्या श्रीवर्धन तालुक्यात येत आहे. श्रीवर्धन आगारातून मुंबई, नालासोपारा, भांडुप, तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी बस जातात. मात्र, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात एसटी बस बंद झाल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून शिमगोत्सवासाठी जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील धनगरमलई मार्गावरील एकूण बारा गाव-वाड्यांकडे जाण्यासाठी गाडी नाही. शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे.

दिवेआगर-मुंबई व श्रीवर्धन येथून सुटणारी दांडगुरीहून धनगरमलईमार्गे मुंबईला जाणारी गाडी होळी उत्सव सुरू झाला तरी अद्याप सुरू झाली नाही. मुंबईहून निघणाऱ्या चाकरमान्यांना गाडी बंद असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय गावाकडे येण्यासाठी अर्धवट प्रवास करून लोकल एसटीदेखील उशिराने येत आहेत. मुंबईला जाणाऱ्या बस बंद केल्या जातात. होळी उत्सवातदेखील बस रद्द केल्याची कोणतीच पूर्वकल्पना प्रवाशांना नसल्यामुळे सर्व सामानासह बस स्टॉपवर आलेल्या प्रवाशांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करवा लागतो.

कित्येक वर्षे मुंबई गाडीने आम्ही प्रवास करीत आहोत. मुंबई गाडी बंद झाल्याने मुंबईकडे जाण्यासाठी उलट-सुलट प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून गाडी नसल्याने म्हसळा, माणगाव येथे जाऊन एसटी पकडावी लागते. मात्र, गाडीमध्ये गर्दी होत असल्याने पर्यायी खाजगी वाहनांचा आधार घेत मुंबई प्रवास करणे भाग पडत आहे. - सुनील रिकामे, बोर्लीपंचतन, मुंबई स्थायिक

या मार्गावर १२ गावांना मुंबई एसटी नाहीश्रीवर्धन आगारातून धनगरमलई मार्गावरून मुंबईला जाणाऱ्या दोन गाड्या बंद केल्या आहेत. या मार्गावर वावेपंचतनपासून बोर्ला, देवखोल, नागलोली, सालविंडे या चार गावांना मिळून आजूबाजूला आठ वाड्या आहेत. येथील नागरिक कामानिमित्त मुंबईस्थित आहेत. मात्र, येथील प्रवाशांना मुंबईहून गावी येण्यासाठी एसटीच नाही. श्रीवर्धन तालुक्यातील काही परिसर असा आहे की, एस. टी.ची वाट पाहिल्याशिवाय पर्याय नाही, अशांची फारच गैरसोय होते. त्यामुळे दिवेआगर येथून सकाळी ७ ला सुटणारी मुंबई एसटी व श्रीवर्धन आगारातून सायंकाळी ५ वाजताची मुंबई या दोन साध्या गाड्यांची होळी उत्सवात सुरळीत सेवा मिळावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

कोरोनामुळे मुंबई एसटी बस बंद करण्यात आली होती. नंतर प्रवाशांच्या मागणीनुसार त्या-त्या विभागातील एसटी सुरू करण्यात आली. मागणी होत असेल तर बंद केलेल्या बस पुन्हा सुरू केल्या जातील. - तेजस गायकवाड, श्रीवर्धन आगार प्रमुख