शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

नागोठण्यात पुन्हा एकदा पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 02:26 IST

जनजीवन विस्कळीत : चिकणी गावच्या हद्दीत अडकलेले दाम्पत्य बचावले

नागोठणे : मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने आपले पात्र सोडून शहरात प्रवेश केल्याने नागोठण्यात बुधवारी दुपारपर्यंत गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामपंचायत तसेच पोलीस आणि महसूल यंत्रणा पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून असून पूराच्या पाण्याने नागोठणे बाजारपेठ तसेच कोळीवाडा, बंगलेआळी, शिवाजी चौक व्यापून गेला होता.

मंगळवारी सायंकाळपासून पावसाने उग्र रूप धारण केल्याने अंबा नदीने मध्यरात्रीच्या दरम्यान पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने पहाटे एसटी बसस्थानक, शिवाजी चौक, कोळीवाडा भागात पुराचे पाणी चढण्यास प्रारंभ झाला होता. पावसाचा जोर कायमच राहिल्याने पुराचे पाणी आणखी वेगाने भरण्यास सुरुवात झाल्याने घर तसेच दुकानातील सामानाची हलवाहलवी करण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती. चिकणी गावच्या हद्दीत हॉटेल गुलमोहरमागे २०० मीटर पाण्यात भगवान जाधव (३०) आणि भारती भगवान जाधव (२०) दोन्ही रा. धोबेवाडी (पाच्छापूर) ता. सुधागड हे दाम्पत्य अडकले असल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक ग्रामस्थ साई मोहन राठोड, लोकेश शिवा नायक, चिकणी यांनी पोहत जाऊन रबरी ट्यूबच्या सहाय्याने सुरक्षित पुराच्या पाण्यातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.कोळीवाड्यात अनेक घरांमध्ये गणपती विराजमान झाले असल्याने अनेकांची धावपळ उडाली. या भागात पाण्याची पातळी दहा फूट इतकी असल्याने ग्रामपंचायतीने सर्वांना सुरक्षितस्थळी हलविण्याने गणपतीची मूर्ती घरात ठेऊनच त्यांना घराबाहेर पडलावे लागले होते. तर, घराबाहेर पडण्यापूर्वी काहींनी पाण्यात उभे राहूनच आपल्या घरातील बाप्पांची आरती केली. तेथील सुभाष जामकर यांच्या मूर्तीला पुराचे पाणी लागल्याने त्यांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार कविता जाधव यांनी दुपारी स्थानिक महसूल यंत्रणेसह पुराची पाहणी केली. पूरग्रस्तांसाठी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, सदस्य शैलेंद्र देशपांडे, ज्ञानेश्वर साळुंके यांच्या पुढाकारातून नागोठणे ग्रामपंचायतीकडून मोफत भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. सकाळी पुराचे पाणी चढत असल्याचे कळल्यानंतर येथील पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार नितीश पाटील आणि महिला पोलीस प्रतीक्षा गायकवाड यांनी विशेष सहकार्य केल्याने शासकीय यंत्रणांना वेळीच उपाययोजना करण्यात यश मिळाले होते. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरण्यास प्रारंभ झाला होता. दरम्यान, हवामान खात्याच्या सूचनेनुसार मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन सरपंचडॉ. मिलिंद धात्रक यांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडMumbaiमुंबई