शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पेणमधील ३५ ग्रामीण रस्त्यांची पुराने दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:33 IST

शासनाकडे निधीची मागणी : जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचा ६५० कोटींचा प्रस्ताव

दत्ता म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कपेण : पेणमध्ये आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुराने ग्रामीण रस्त्यांच्या डोक्यावरून पाच फूट पाणी वाहून गेल्याने तब्बल ३५ रस्ते बाधित झाले. या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी ९४ लाख रुपये निधीची गरज आहे. तर त्या रस्त्याचे कायमस्वरूपी नूतनीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी ६५० कोटी रुपये विकासनिधीचा प्रस्ताव पेणमधील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागीय कार्यालयाने शासनाकडे सादर केली आहे, असे उपविभागीय कार्यालयीन अभियंता विनायक तेलंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पेणमध्ये पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर अतिशय भयानक चित्र होते. त्यामध्ये शेती, खारभूमी संरक्षक बंधारे, ग्रामीण रस्ते व अन्य साधनसामग्रीची झालेली पडझड याचे मोजमाप करण्याचे काम सध्या शासकीय यंत्रणेने हाती घेतलेले आहे. पेणमधील ३५ ग्रामीण रस्त्यांची वाताहत झाली असून जागोजागी रस्ते खचलेले आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या रस्त्याचा भराव, पूल, मोऱ्या, साकव व रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे हे चित्र विदारक असून, येत्या गणपती उत्सवापूर्वी रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी ९४ लाख रुपयांच्या विकासनिधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तयार करून तो शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये कणे-बोर्झे रस्ता, मोहाडी, वेळवडे, भोरकस, आदिवासीवाडी, सापोलीबडी, बोरी फाटा ते शिर्की चाळ नं.२ या रस्त्यावर महापुराचा मोठा आघात झाला आहे. इतर रस्त्यांची अशीच अवस्था असून या रस्त्यांच्या कायमस्वरूपी नूतनीकरणासाठी ६५० कोटी रुपयांच्या विकासनिधीची आवश्यकता असून, त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे, असे बांधकामसूत्रांनी माहिती देताना सांगितले.रस्त्यावरील पूल, मोºया, साकव यांनासुद्धा या महापुराचा तडाखा बसलेला आहे. पेण शहराला जोडणारा भोगावती नदीवरील भुंडा पुलाला पाण्याच्या प्रवाहाचा आघात बसून कमकुवत झाला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार हा पूल वाहतुकीसाठी सोयीस्कर असल्याने या पुलाची दुरुस्ती व नूतनीकरण करणे गरजेचे आहे. सध्या सर्वच ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची देखभाल दुरुस्ती करून वाहतुकीसाठी हे रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत.

येणाºया गणपती उत्सवात नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी बांधकाम विभाग पूर्णपणे प्रत्येक ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेऊन रस्ता वाहतुकीयोग्य करण्याकडे बांधकाम विभाग लक्ष देत असल्याचे उपविभागीय कार्यालयीन अभियंता विनायक तेलंग म्हणाले. शासनाने या परिस्थितीचा विचार करून ग्रामीण दळणवळण मार्गांचे बळकटीकरण व मजबुतीकरणासाठी विकासनिधी उपलब्ध करावा, अशा पद्धतीने आम्ही शासनाकडे या बाबतचे प्रस्ताव तातडीने पाठविले आहेत.