शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

पेणमधील ३५ ग्रामीण रस्त्यांची पुराने दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:33 IST

शासनाकडे निधीची मागणी : जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचा ६५० कोटींचा प्रस्ताव

दत्ता म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कपेण : पेणमध्ये आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुराने ग्रामीण रस्त्यांच्या डोक्यावरून पाच फूट पाणी वाहून गेल्याने तब्बल ३५ रस्ते बाधित झाले. या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी ९४ लाख रुपये निधीची गरज आहे. तर त्या रस्त्याचे कायमस्वरूपी नूतनीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी ६५० कोटी रुपये विकासनिधीचा प्रस्ताव पेणमधील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागीय कार्यालयाने शासनाकडे सादर केली आहे, असे उपविभागीय कार्यालयीन अभियंता विनायक तेलंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पेणमध्ये पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर अतिशय भयानक चित्र होते. त्यामध्ये शेती, खारभूमी संरक्षक बंधारे, ग्रामीण रस्ते व अन्य साधनसामग्रीची झालेली पडझड याचे मोजमाप करण्याचे काम सध्या शासकीय यंत्रणेने हाती घेतलेले आहे. पेणमधील ३५ ग्रामीण रस्त्यांची वाताहत झाली असून जागोजागी रस्ते खचलेले आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या रस्त्याचा भराव, पूल, मोऱ्या, साकव व रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे हे चित्र विदारक असून, येत्या गणपती उत्सवापूर्वी रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी ९४ लाख रुपयांच्या विकासनिधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तयार करून तो शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये कणे-बोर्झे रस्ता, मोहाडी, वेळवडे, भोरकस, आदिवासीवाडी, सापोलीबडी, बोरी फाटा ते शिर्की चाळ नं.२ या रस्त्यावर महापुराचा मोठा आघात झाला आहे. इतर रस्त्यांची अशीच अवस्था असून या रस्त्यांच्या कायमस्वरूपी नूतनीकरणासाठी ६५० कोटी रुपयांच्या विकासनिधीची आवश्यकता असून, त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे, असे बांधकामसूत्रांनी माहिती देताना सांगितले.रस्त्यावरील पूल, मोºया, साकव यांनासुद्धा या महापुराचा तडाखा बसलेला आहे. पेण शहराला जोडणारा भोगावती नदीवरील भुंडा पुलाला पाण्याच्या प्रवाहाचा आघात बसून कमकुवत झाला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार हा पूल वाहतुकीसाठी सोयीस्कर असल्याने या पुलाची दुरुस्ती व नूतनीकरण करणे गरजेचे आहे. सध्या सर्वच ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची देखभाल दुरुस्ती करून वाहतुकीसाठी हे रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत.

येणाºया गणपती उत्सवात नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी बांधकाम विभाग पूर्णपणे प्रत्येक ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेऊन रस्ता वाहतुकीयोग्य करण्याकडे बांधकाम विभाग लक्ष देत असल्याचे उपविभागीय कार्यालयीन अभियंता विनायक तेलंग म्हणाले. शासनाने या परिस्थितीचा विचार करून ग्रामीण दळणवळण मार्गांचे बळकटीकरण व मजबुतीकरणासाठी विकासनिधी उपलब्ध करावा, अशा पद्धतीने आम्ही शासनाकडे या बाबतचे प्रस्ताव तातडीने पाठविले आहेत.