शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पेणमधील ३५ ग्रामीण रस्त्यांची पुराने दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:33 IST

शासनाकडे निधीची मागणी : जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचा ६५० कोटींचा प्रस्ताव

दत्ता म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कपेण : पेणमध्ये आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुराने ग्रामीण रस्त्यांच्या डोक्यावरून पाच फूट पाणी वाहून गेल्याने तब्बल ३५ रस्ते बाधित झाले. या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी ९४ लाख रुपये निधीची गरज आहे. तर त्या रस्त्याचे कायमस्वरूपी नूतनीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी ६५० कोटी रुपये विकासनिधीचा प्रस्ताव पेणमधील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागीय कार्यालयाने शासनाकडे सादर केली आहे, असे उपविभागीय कार्यालयीन अभियंता विनायक तेलंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पेणमध्ये पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर अतिशय भयानक चित्र होते. त्यामध्ये शेती, खारभूमी संरक्षक बंधारे, ग्रामीण रस्ते व अन्य साधनसामग्रीची झालेली पडझड याचे मोजमाप करण्याचे काम सध्या शासकीय यंत्रणेने हाती घेतलेले आहे. पेणमधील ३५ ग्रामीण रस्त्यांची वाताहत झाली असून जागोजागी रस्ते खचलेले आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या रस्त्याचा भराव, पूल, मोऱ्या, साकव व रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे हे चित्र विदारक असून, येत्या गणपती उत्सवापूर्वी रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी ९४ लाख रुपयांच्या विकासनिधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तयार करून तो शासनाकडे पाठविला आहे. यामध्ये कणे-बोर्झे रस्ता, मोहाडी, वेळवडे, भोरकस, आदिवासीवाडी, सापोलीबडी, बोरी फाटा ते शिर्की चाळ नं.२ या रस्त्यावर महापुराचा मोठा आघात झाला आहे. इतर रस्त्यांची अशीच अवस्था असून या रस्त्यांच्या कायमस्वरूपी नूतनीकरणासाठी ६५० कोटी रुपयांच्या विकासनिधीची आवश्यकता असून, त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे, असे बांधकामसूत्रांनी माहिती देताना सांगितले.रस्त्यावरील पूल, मोºया, साकव यांनासुद्धा या महापुराचा तडाखा बसलेला आहे. पेण शहराला जोडणारा भोगावती नदीवरील भुंडा पुलाला पाण्याच्या प्रवाहाचा आघात बसून कमकुवत झाला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार हा पूल वाहतुकीसाठी सोयीस्कर असल्याने या पुलाची दुरुस्ती व नूतनीकरण करणे गरजेचे आहे. सध्या सर्वच ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची देखभाल दुरुस्ती करून वाहतुकीसाठी हे रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत.

येणाºया गणपती उत्सवात नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी बांधकाम विभाग पूर्णपणे प्रत्येक ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेऊन रस्ता वाहतुकीयोग्य करण्याकडे बांधकाम विभाग लक्ष देत असल्याचे उपविभागीय कार्यालयीन अभियंता विनायक तेलंग म्हणाले. शासनाने या परिस्थितीचा विचार करून ग्रामीण दळणवळण मार्गांचे बळकटीकरण व मजबुतीकरणासाठी विकासनिधी उपलब्ध करावा, अशा पद्धतीने आम्ही शासनाकडे या बाबतचे प्रस्ताव तातडीने पाठविले आहेत.