शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

समुद्रकिनाऱ्यावर तेलाचा तवंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:02 IST

दिवसेंदिवस ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणासह नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच आता समुद्रालाही विविध प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

- आविष्कार देसाई अलिबाग : दिवसेंदिवस ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषणासह नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच आता समुद्रालाही विविध प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अलीकडच्या कालावधीत त्यामध्ये वाढ होत असल्याने तो चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रायगडच्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने तेलाचा तवंग आल्याने चिंतेमध्ये भर पडली आहे. या आधी मुंबईमधील कचरा हा अलिबाग तालुक्यातील किहीम, नागाव येथील समुद्रकिनारी आला होता. समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे जलचर प्राणी, वनस्पती यांना धोका निर्माण झालाआहे. मुंबईला जवळ असणारा जिल्हा म्हणून अलिबागची ओळख आहे. मुंबईला खेटूनच उरण तालुक्यामध्ये जेएनपीटी बंदर आहे. या बंदरामधून मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय व्यापार होत असल्याने येथे मोठमोठी जहाजे, बोटी यांची कायमचीच वर्दळ सुरू असते. बंदरामधून प्रवासी वाहतूकही केली जाते.काही मोठमोठ्या जहाजातील वापरून झालेले तेल बिनदिक्कतपणे थेट समुद्राच्या पाण्यात सोडून दिले जाते, तर काही वेळेला जहाज फुटून त्यामधील तेल समुद्राच्या पाण्यामध्ये फेकले गेल्याच्याही घटना घडत असतात. मुंबई आणि उरण परिसरातील कचरा हा समुद्राच्या पाण्यात टाकण्यात येतो. समुद्राला भरती आल्यावर निमुळत्या असणाºया चॅनेलमध्ये तो वाहत जातो. हे निमुळते चॅनेल म्हणजे अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे आहेत. प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, घनकचरा मोठ्या प्रमाणात किहीम, नवगाव, थळ, वरसोली, नागाव यासह अन्य समुद्रकिनारी येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याच्या जोडीला गेल्या दोन दिवसांपासून तेलाचे तवंगच्या तवंग अलिबागच्या समुद्रकिनारी दिसून येत आहेत.अलिबागचे समुद्रकिनारे स्वच्छ आहेत. त्यामुळे येथे पर्यटक तर येतातच, शिवाय मार्निंग वॉक करण्यासाठी सकाळी अलिबागच्या समुद्रकिनारी खूप गर्दी असते. समुद्रावर चालताना तेल पायाला लागत असल्याने त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.खोल समुद्रामध्ये मोठमोठ्या जहाजातून खराब तेल फेकले जाते. समुद्र आपल्या पोटात काहीच ठेवत नसल्याने सर्व कचरा, तेल हे समुद्रकिनारी फेकून देते. अशा घटना सातत्याने घडत असतात, असे येथील स्थानिक मासेमारी करणाºयांनी सांगितले.अलिबाग हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी येत असतात. येथील समुद्रकिनारे त्यांना विशेष करून आवडत असल्याने त्यांना येथे समुद्र स्नानाचा आनंद घ्यायला आवडते. मात्र, समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे पर्यटक पाठ फिरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारित असणारी हॉटेल इंडस्ट्री, तसेच त्यावर अवलंबून असणाºया विविध छोट्या-मोठ्या उद्योगांवर विपरित परिणाम होऊन आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.समुद्रातील प्रदूषण सातत्याने वाढत असल्याने त्याचा विपरित परिणाम समुद्रातील जीवसृष्टीवर होत आहे. जलचर वनस्पती,प्राणी यांचे आरोग्य धोक्यात येऊन अन्न साखळी तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगड