शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांचा कानाडोळा, आमचे प्रश्न कोण सोडवणार? मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषणाचा निर्धार

By निखिल म्हात्रे | Updated: December 13, 2023 18:48 IST

पेण तालुक्यातील खऊसावाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ, तांबडी या वाड्यांतील आदिवासींनी तर मागील ७५ वर्षांत एकदाही मतदान केले नव्हते.

अलिबाग : आदिवासींना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून रस्ता, पाणी, स्मशानभूमी आणि समाजमंदिर अशा विविध मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेने बुधवारपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जिल्ह्यातील आदिवासींना रस्ता, वीज, पाणी यांच्यासह त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत, ही अतिशय खेदाची बाब आहे. अशाच मूलभूत सुविधांपासून वंचित आदिवासी वाड्यांच्या समस्या प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचविल्यानंतरही संबंधित अधिकारी त्याकडेही दुर्लक्ष करत असतील तर या आदिवासींनी जावे तरी कुठे? आणि खरंच शासन आपल्या दारी आहे का? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पेणमधील वाड्या आजही तहानलेल्याचपेण तालुक्यातील खऊसावाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ, तांबडी या वाड्यांतील आदिवासींनी तर मागील ७५ वर्षांत एकदाही मतदान केले नव्हते. त्यांना स्वतःच्या हक्काची ग्रामपंचायतही नव्हती. याबाबत ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था व सर्व आदिवासींनी मोर्चे, आंदोलन केल्यानंतर त्याचे पडसाद मागील वर्षी तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अगदी तत्काळ वृत्तपत्रांना प्रेस नोट देऊन पाचही वाड्यांमध्ये विकासाची गंगा वाहेल, अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित केल्या. जलजीवन मिशन आणि रस्त्यांसाठीचा निधी मंजूर करून आदेशही दिले. परंतु, या पाचही वाड्या आजही रस्ता, पाण्याविना आहेत. खऊसावाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ, तांबडी या पाचही वाड्यांच्या मंजूर कामांचे कार्यादेश घेऊनही काम न करणाऱ्या ठेकेदारांवर व ठेकेदारांकडून काम करून न घेणाऱ्या अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि पाचही वाड्यांना रस्ते बनवून सर्व रस्ते डांबरी किंवा काॅंक्रीटचे करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

‘जलजीवन’च्या ठेकेदार, उपअभियंत्यावर कारवाई करापेण तालुक्यातील वरील पाचही वाड्यांच्या जलजीवन मिशन योजनेतून मंजूर कामाचे कार्यारंभ आदेश घेऊन निकृष्ट काम करणाऱ्या व एक वर्ष पूर्ण होऊनही ३० टक्केही काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदार व रा. जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. खालापूरमधील करंबेली ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा, नावांढे आदिवासीवाडी, पनवेलमधील कोरळवाडी, टोकाचीवाडी, घेरावाडी तर व पेण तालुक्यामधील वडमालवाडी, खैरासवाडी अशा अनेक आदिवासी वाड्यांनी मोर्चे, आंदोलने एवढेच नव्हे तर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय होऊनही या आदिवासींचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचत नाही, अशी नाराजीही व्यक्त केली. दगडखाणीतील स्फोटांमुळे घरांना भेगापेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी-खारापाडा हद्दीतील खैरासवाडी येथील बेकायदा खडी क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे आदिवासींच्या घरांना तडे गेल्याने अनेक घरे मोडकळीस आली आहेत. क्रशरच्या धुळीमुळे लहान बालकांसह वाडीतील आदिवासींना श्वसनासह इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत संबंधित पेण तहसीलदार व जिल्हा खनिकर्म विभागाला कळवूनदेखील कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधित बेकायदेशीर क्रशर्सवर कारवाई करावी. बाधित आदिवासींना नुकसानभरपाई द्यावी. खारापाडा-सावरोर्ली रोड ते खैरासवाडी रस्ता या स्टोन क्रशर्समुळे अतिशय दयनीय परिस्थितीत आहे. हा रस्ता तत्काळ काँक्रीटचा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढत उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार, आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदिवासी वाड्यांना भेट देऊन काही वाड्यांवर रात्रीचा निवास करावा. या मागण्यांसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. तसेच उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. - संतोष ठाकूर, अध्यक्ष, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग