शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

दोन महिने मासेमारी बंद; बोटी किनाऱ्यावर शाकारल्या

By निखिल म्हात्रे | Updated: June 7, 2024 09:08 IST

अलिबागसह जिल्ह्यातील अनेक बंदरांवर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : जिल्ह्यातील काही ठिकाणी मान्सून दाखल झाल्याने मासेमारी हंगाम १ जून ते ३१ जुलै असा दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील मासळीचे लिलाव बंद होऊन कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. आता कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनारी आणून शाकारणी केली आहे. अलिबागसह जिल्ह्यातील अनेक बंदरांवर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यामध्ये पाच हजारांहून अधिक मासेमारी नौका आहेत. त्यामध्ये काही नौका यांत्रिकी, तर काही बिगर यांत्रिकी आहेत. ३१ मे हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस होता. आता पुढील दोन महिने या बोटी किनाऱ्यावर विसावल्या आहेत. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. दहा महिने मासेमारी व्यवसाय चालतो. मासेमारीतून मच्छिमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.अलिबाग, आक्षी, बोर्ली, रेवदंडा, नवगाव आदी बंदरांवर मासळीचा मोठ्या प्रमाणात लिलाव होतो. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. परंतु, अनेकवेळा बदलते हवामान, सांडपाण्यामुळे समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण, जेली फिश अशा अनेक समस्यांमुळे मासेमारीवर परिणाम होतो. त्यामुळे मासळीच्या उत्पादनात घट होते. तरीदेखील जिल्ह्यातील मच्छिमार सर्व संकटांवर मात करत मासेमारीचा व्यवसाय करत आहेत.

जून महिन्यात पावसामुळे उधाणाबरोबरच वारा, वादळ मोठ्या प्रमाणात येते. मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अडकून पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. तसेच पावसाळ्यात मासळी प्रजनोत्पादन कालावधी असतो. त्यामुळे दोन महिने मासेमारीवर शासनाकडून बंदी घातली जाते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मासेमारी बंदीमुळे मच्छिमारांनी नौका किनारी लावण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील काही बंदरांवर बोटी नांगरण्यात आल्या असून, काही ठिकाणी नांगरण्याचे काम आजही सुरू आहे.जिल्ह्यातील किनाऱ्यांवर मोठ्या होड्या एक महिना अगोदर उभ्या केल्या आहेत. लहान होड्या बंदर किनारी नांगरण्यास आठवड्यापासून सुरूवात झाली आहे. सध्या बोटींवर प्लास्टिक आवरण टाकण्याचे काम सुरू आहे. - विजय गिदी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, मुंबई

टॅग्स :monsoonमोसमी पाऊस