शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

दोन महिने मासेमारी बंद; बोटी किनाऱ्यावर शाकारल्या

By निखिल म्हात्रे | Updated: June 7, 2024 09:08 IST

अलिबागसह जिल्ह्यातील अनेक बंदरांवर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : जिल्ह्यातील काही ठिकाणी मान्सून दाखल झाल्याने मासेमारी हंगाम १ जून ते ३१ जुलै असा दोन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील मासळीचे लिलाव बंद होऊन कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. आता कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनारी आणून शाकारणी केली आहे. अलिबागसह जिल्ह्यातील अनेक बंदरांवर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यामध्ये पाच हजारांहून अधिक मासेमारी नौका आहेत. त्यामध्ये काही नौका यांत्रिकी, तर काही बिगर यांत्रिकी आहेत. ३१ मे हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस होता. आता पुढील दोन महिने या बोटी किनाऱ्यावर विसावल्या आहेत. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. दहा महिने मासेमारी व्यवसाय चालतो. मासेमारीतून मच्छिमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.अलिबाग, आक्षी, बोर्ली, रेवदंडा, नवगाव आदी बंदरांवर मासळीचा मोठ्या प्रमाणात लिलाव होतो. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. परंतु, अनेकवेळा बदलते हवामान, सांडपाण्यामुळे समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण, जेली फिश अशा अनेक समस्यांमुळे मासेमारीवर परिणाम होतो. त्यामुळे मासळीच्या उत्पादनात घट होते. तरीदेखील जिल्ह्यातील मच्छिमार सर्व संकटांवर मात करत मासेमारीचा व्यवसाय करत आहेत.

जून महिन्यात पावसामुळे उधाणाबरोबरच वारा, वादळ मोठ्या प्रमाणात येते. मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अडकून पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. तसेच पावसाळ्यात मासळी प्रजनोत्पादन कालावधी असतो. त्यामुळे दोन महिने मासेमारीवर शासनाकडून बंदी घातली जाते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मासेमारी बंदीमुळे मच्छिमारांनी नौका किनारी लावण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील काही बंदरांवर बोटी नांगरण्यात आल्या असून, काही ठिकाणी नांगरण्याचे काम आजही सुरू आहे.जिल्ह्यातील किनाऱ्यांवर मोठ्या होड्या एक महिना अगोदर उभ्या केल्या आहेत. लहान होड्या बंदर किनारी नांगरण्यास आठवड्यापासून सुरूवात झाली आहे. सध्या बोटींवर प्लास्टिक आवरण टाकण्याचे काम सुरू आहे. - विजय गिदी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, मुंबई

टॅग्स :monsoonमोसमी पाऊस