शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

उद्योगांसाठी आवश्यक पर्यावरण मंजुरीसाठी ऑनलाइन जनसुनावणीला घेतली हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 00:11 IST

लॉकडाऊन असल्याने गावात प्रत्यक्ष जनसुनावणी घेता येत नाही. त्यामुळे मंडळाने झूम अ‍ॅपच्या माध्यमातून निवडक लोकांना एकित्रत करून जनसुनावणी घेणे सुरू केले आहे.

अलिबाग : जिल्ह्यात नवीन उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या पर्यावरण मंजुरीसाठी झूम अ‍ॅपच्या माध्यमातून आॅनलाइन जनसुनावणीच्या निर्णयाला रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी हरकत घेतली आहे. जिल्ह्यातील उद्योगांसाठी घेण्यात येणाºया आॅनलाइन सुनावणीमध्ये प्रकल्पामुळे बाधित होणारे शेकडो शेतकरी, मच्छीमार, खेड्यातील नागरिक आॅनलाइन उपस्थित राहू शकत नसल्याने आॅनलाइन सुनावणी रद्द करून ज्या वेळी कोरोनाचे संकट दूर होईल तेव्हाच प्रत्यक्ष लोकांच्या उपस्थितीमध्ये जनसुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.लॉकडाऊन असल्याने गावात प्रत्यक्ष जनसुनावणी घेता येत नाही. त्यामुळे मंडळाने झूम अ‍ॅपच्या माध्यमातून निवडक लोकांना एकित्रत करून जनसुनावणी घेणे सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील नानावली येथील व्हेरीटास पॉलीकेम प्रा.लि. यांच्या प्रस्तावित पॉली विनाईल क्लोराईड (पीव्हीसी) प्लांट, पॉलीमर मॉडीफाइड बिटुमेन (पीएमबी) प्लांट, गॅस स्टोरेज टर्मिनल, एलपीजी बॉटलिंग प्लांट, गॅस बेस्ड कॅप्टीव्ह पॉवर प्लांट, सी वॉटर डिसेलीनेशन प्लांट, (आरओ प्रक्रि या) यांचा समावेश असलेल्या एकात्मिक प्रकल्पाची आॅनलाइन जनसुनावणी २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील नानावली येथील गट क्र . ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५६, ६१, ६३, ६६ व ७५-अ या दिघी बंदर विकास क्षेत्रामध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे. आॅनलाइन सुनावणीमुळे नानावली गाव व परिसरातील तसेच श्रीवर्धन तालुक्यातील इच्छुक लोकांना या आॅनलाइन सुनावणीमध्ये सामील होणे शक्य होणार नाही, असे मत अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये व्यक्त केले आहे.पर्यावरणीय मंजुरी देण्याच्या प्रक्रि येपासून लोकसहभाग कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्याची तरतूद नवीन पर्यावरण मसुद्यात (ईआयए २०२०) असल्याने हा मसुदा रद्द करण्यासाठी काँग्रेसतर्फे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण मधुकर ठाकूर यांनी यापूर्वीच केंद्र शासनाकडे हरकत दाखल केली आहे. नवीन मुसद्यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. तसेच तज्ज्ञांच्या मतास अधिक वजन दिले आहे. जरी उल्लंघनासंदर्भात कुणी तक्रार केली तरी प्रकल्पाचा सार्वजनिक अहवाल देणेदेखील मंत्रालयावर बंधनकारक असेलच असे नाही. त्यामुळे सरकार उद्योगपतींना पाठीशी घालण्यासाठी हे बदल करीत असल्याचा आक्षेप स्थानिक शेतकरी व पर्यावरण विषयात काम करणाºया कार्यकर्त्यांनी घेतला होता. आॅनलाइन जनसुनावणी हा लोकांच्या मतांचा प्रकल्पामध्ये सहभाग कमी करण्याचा एक प्रयत्न असू शकतो; म्हणून रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित प्रकल्पांच्या जनसुनावण्या आॅनलाइन न घेता कोरोना संकट दूर झाल्यावर प्रत्यक्ष बाधित लोकांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड