शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

By admin | Updated: May 2, 2016 01:10 IST

उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खालापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाड्या व गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. आमदार सुरेश लाड यांनी नुकताच तालुक्यातील

खोपोली : उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खालापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाड्या व गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. आमदार सुरेश लाड यांनी नुकताच तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी बैठक घेवून संबंधित विभागाला पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाण्याचे कसे नियोजन करावे याचे निर्देश दिले आहेत. मात्र तीव्र उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा सामना करताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत असून हंडाभर पाणी मिळविण्यासाठी तालुक्यातील काही भागांमध्ये महिलांना वणवण करावी लागत आहे. पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने पुढील काही दिवसात खालापूरमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. खालापूर तालुक्यातील बोरगाव, कुंभिवली, टेंभरी व शिरवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वीरगाव ठाकूरवाडी, कुंभिवली कातकरवाडी, खरसुंडी कातकरवाडी, खरसुंडी बौद्धवाडी, कुंभिवली बौद्धवाडी, आंबेमाळवाडी, ढेबेवाडी, बर्गेवाडी आदी ठिकाणी सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. रानसई आदिवासीवाडी, चिंबोडा ठाकूरवाडी, वावर्ले कातकरवाडी, तीनघर ठाकूरवाडी, बोरगाव सोंडेवाडी, पौद कातकरवाडी या ठिकाणी पाणीटंचाई असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. खालापूर तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असून पुढील महिन्यात पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी डोक्यावर हंडे घेवून लांबून महिलांना पाणी आणावे लागत आहे. प्यायला पाणी नसल्याने कपडे धुण्यासाठीही काही किमीची पायपीट करून महिलांना कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे. गुरांचेही पाणी नसल्याने हाल होत आहेत. प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी दुर्गम भागातील वाड्या व गावांमध्ये मात्र यंत्रणा पोहचली नसल्याचे चित्र आहे. टंचाईग्रस्त वाड्या व गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही पुढील काही दिवसात भीषण पाणीटंचाईचा सामना खालापूरकरांना करावा लागण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)