शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली

By admin | Updated: May 2, 2016 01:10 IST

उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खालापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाड्या व गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. आमदार सुरेश लाड यांनी नुकताच तालुक्यातील

खोपोली : उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर खालापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ झाली आहे. अनेक वाड्या व गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. आमदार सुरेश लाड यांनी नुकताच तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी बैठक घेवून संबंधित विभागाला पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पाण्याचे कसे नियोजन करावे याचे निर्देश दिले आहेत. मात्र तीव्र उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा सामना करताना ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत असून हंडाभर पाणी मिळविण्यासाठी तालुक्यातील काही भागांमध्ये महिलांना वणवण करावी लागत आहे. पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने पुढील काही दिवसात खालापूरमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. खालापूर तालुक्यातील बोरगाव, कुंभिवली, टेंभरी व शिरवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वीरगाव ठाकूरवाडी, कुंभिवली कातकरवाडी, खरसुंडी कातकरवाडी, खरसुंडी बौद्धवाडी, कुंभिवली बौद्धवाडी, आंबेमाळवाडी, ढेबेवाडी, बर्गेवाडी आदी ठिकाणी सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. रानसई आदिवासीवाडी, चिंबोडा ठाकूरवाडी, वावर्ले कातकरवाडी, तीनघर ठाकूरवाडी, बोरगाव सोंडेवाडी, पौद कातकरवाडी या ठिकाणी पाणीटंचाई असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. खालापूर तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असून पुढील महिन्यात पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी डोक्यावर हंडे घेवून लांबून महिलांना पाणी आणावे लागत आहे. प्यायला पाणी नसल्याने कपडे धुण्यासाठीही काही किमीची पायपीट करून महिलांना कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे. गुरांचेही पाणी नसल्याने हाल होत आहेत. प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी दुर्गम भागातील वाड्या व गावांमध्ये मात्र यंत्रणा पोहचली नसल्याचे चित्र आहे. टंचाईग्रस्त वाड्या व गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही पुढील काही दिवसात भीषण पाणीटंचाईचा सामना खालापूरकरांना करावा लागण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)