शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कोरोनाचा कहर; रायगड जिल्ह्यातील बाधितांनी ओलांडला १० हजारांचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:55 IST

प्रशासन आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव

- आविष्कार देसाई रायगड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. २४ तासांमध्ये किमान तीन मृतांची नोंद होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असताना, सरकार आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव तर नाही ना, असा संशय व्यक्त होत आहे. प्रशासन आणि सरकार जनतेच्या रक्षणासाठी कोणत्या उपाययोजना करत आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर२८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३,६७४ कोरोनाबाधित आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था मनुष्यबळाअभावी आधीच कमकुवत स्थितीमध्ये आहे. जिल्हा कोविड सेंटर, कोविड हॉस्पिटल अशा नव्याने उपाययोजना करून, त्या ठिकाणी बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र, बेडची संख्या वाढवल्याने रुग्णसंख्या कमी होणार नाही. यासाठी डोर टू डोर स्कॅनिक, कोम्बिंग आॅपरेशन, मास्कचा वापर करण्यावर भर देणे, सामाजिक अंतर राखण्याबाबत जागृती करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, आॅक्सिजन बेडची संख्या वाढवणे, सरकारी रुग्णालयामध्ये पुरेशा सुविधा देतानाच मनुुष्यबळ पुरवणे, खासगी डॉक्टरांची सेवा घेणे, अशा विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्यामध्ये खरच समन्वय आहे का? असा सवाल जिल्ह्यातील परिस्थितीवरून दिसत असल्याचे चित्र आहे. १६ ते २६ जुलै या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र, काही व्यापाऱ्यांच्या आग्रहाखातर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सकाळी ६ ते सकाळी ११ वाजेपर्यंत त्यामध्ये सवलत दिली. त्यामुळे आता बाजारांमध्ये कमालीची गर्दी होताना दिसत आहे. लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्यासाठी एकमेव पर्याय नक्कीच नाही. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे, असे अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सामान्य माणसांना घरी बसायला सांगायचे आणि कोविडचा फैलाव करणाºया कंपन्यांना मोकाट सोडायचे, अशी दुटप्पी भूमिका खपवून घेतली जाणार नाही, असा काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांनी संताप व्यक्त करून सरकार आणि जिल्हा प्रशासनावर थेट हल्ला केला होता. अशा विविध कारणांनी कोविडचा प्रभाव रोखण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे. प्रशासनाने आणि सरकारने यामधून वेळीच धडा घेण्याची गरज आहे, अन्यथा कोरोना होण्याचे आणि कोरोनामुळे मरण्याचे हे सत्र असेच सुरू राहील.

जिल्ह्यात भयावह परिस्थिती

च्कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनामुळे आधी आजार असलेल्यांचाच मृत्यू होतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी नेहमीच सांगतात. मात्र, ज्यांच्या घरातील व्यक्ती कोरोनामुळे मृत पावते, त्यांचे दु:ख कोण जाणणार.च्आमच्या घरातील व्यक्ती वयस्कर, आजारी असू दे, परंतु ती कोरोनामुळे आमच्यातून निघून जात आहे, याची जाणीव कोण ठेवणार, असाही प्रश्न मृतांच्या नातेवाइकांच्या मनात आहे. एकूणच जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे.

जिल्ह्यात भयावह परिस्थिती

च्कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनामुळे आधी आजार असलेल्यांचाच मृत्यू होतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी नेहमीच सांगतात. मात्र, ज्यांच्या घरातील व्यक्ती कोरोनामुळे मृत पावते, त्यांचे दु:ख कोण जाणणार.च्आमच्या घरातील व्यक्ती वयस्कर, आजारी असू दे, परंतु ती कोरोनामुळे आमच्यातून निघून जात आहे, याची जाणीव कोण ठेवणार, असाही प्रश्न मृतांच्या नातेवाइकांच्या मनात आहे. एकूणच जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे.

आमच्यात समन्वय आहे. आम्ही चाचण्या, ट्रेसिंग उपचारावर भर देत आहोत. सुरुवातीला ४०० चाचण्या घेतल्या जात होत्या. आता ती संख्या १,२००च्या वर गेली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयात प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यावर चाचण्यांची संख्या वाढणार आहे. कोविड केअर सेंटरसाठी नवीन रुग्णालयांवर भर देत आहोत.- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड