शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

कोरोनाचा कहर; रायगड जिल्ह्यातील बाधितांनी ओलांडला १० हजारांचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:55 IST

प्रशासन आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव

- आविष्कार देसाई रायगड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. २४ तासांमध्ये किमान तीन मृतांची नोंद होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असताना, सरकार आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव तर नाही ना, असा संशय व्यक्त होत आहे. प्रशासन आणि सरकार जनतेच्या रक्षणासाठी कोणत्या उपाययोजना करत आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर२८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३,६७४ कोरोनाबाधित आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था मनुष्यबळाअभावी आधीच कमकुवत स्थितीमध्ये आहे. जिल्हा कोविड सेंटर, कोविड हॉस्पिटल अशा नव्याने उपाययोजना करून, त्या ठिकाणी बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र, बेडची संख्या वाढवल्याने रुग्णसंख्या कमी होणार नाही. यासाठी डोर टू डोर स्कॅनिक, कोम्बिंग आॅपरेशन, मास्कचा वापर करण्यावर भर देणे, सामाजिक अंतर राखण्याबाबत जागृती करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, आॅक्सिजन बेडची संख्या वाढवणे, सरकारी रुग्णालयामध्ये पुरेशा सुविधा देतानाच मनुुष्यबळ पुरवणे, खासगी डॉक्टरांची सेवा घेणे, अशा विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्यामध्ये खरच समन्वय आहे का? असा सवाल जिल्ह्यातील परिस्थितीवरून दिसत असल्याचे चित्र आहे. १६ ते २६ जुलै या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र, काही व्यापाऱ्यांच्या आग्रहाखातर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सकाळी ६ ते सकाळी ११ वाजेपर्यंत त्यामध्ये सवलत दिली. त्यामुळे आता बाजारांमध्ये कमालीची गर्दी होताना दिसत आहे. लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्यासाठी एकमेव पर्याय नक्कीच नाही. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे, असे अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सामान्य माणसांना घरी बसायला सांगायचे आणि कोविडचा फैलाव करणाºया कंपन्यांना मोकाट सोडायचे, अशी दुटप्पी भूमिका खपवून घेतली जाणार नाही, असा काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांनी संताप व्यक्त करून सरकार आणि जिल्हा प्रशासनावर थेट हल्ला केला होता. अशा विविध कारणांनी कोविडचा प्रभाव रोखण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे. प्रशासनाने आणि सरकारने यामधून वेळीच धडा घेण्याची गरज आहे, अन्यथा कोरोना होण्याचे आणि कोरोनामुळे मरण्याचे हे सत्र असेच सुरू राहील.

जिल्ह्यात भयावह परिस्थिती

च्कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनामुळे आधी आजार असलेल्यांचाच मृत्यू होतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी नेहमीच सांगतात. मात्र, ज्यांच्या घरातील व्यक्ती कोरोनामुळे मृत पावते, त्यांचे दु:ख कोण जाणणार.च्आमच्या घरातील व्यक्ती वयस्कर, आजारी असू दे, परंतु ती कोरोनामुळे आमच्यातून निघून जात आहे, याची जाणीव कोण ठेवणार, असाही प्रश्न मृतांच्या नातेवाइकांच्या मनात आहे. एकूणच जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे.

जिल्ह्यात भयावह परिस्थिती

च्कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनामुळे आधी आजार असलेल्यांचाच मृत्यू होतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी नेहमीच सांगतात. मात्र, ज्यांच्या घरातील व्यक्ती कोरोनामुळे मृत पावते, त्यांचे दु:ख कोण जाणणार.च्आमच्या घरातील व्यक्ती वयस्कर, आजारी असू दे, परंतु ती कोरोनामुळे आमच्यातून निघून जात आहे, याची जाणीव कोण ठेवणार, असाही प्रश्न मृतांच्या नातेवाइकांच्या मनात आहे. एकूणच जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे.

आमच्यात समन्वय आहे. आम्ही चाचण्या, ट्रेसिंग उपचारावर भर देत आहोत. सुरुवातीला ४०० चाचण्या घेतल्या जात होत्या. आता ती संख्या १,२००च्या वर गेली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयात प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यावर चाचण्यांची संख्या वाढणार आहे. कोविड केअर सेंटरसाठी नवीन रुग्णालयांवर भर देत आहोत.- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड