शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

पुन्हा लाॅकडाऊन नको, नियम पालन गरजेचे; नागरिकांनी काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:37 IST

व्यापाऱ्यांची भूमिका, रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ५६ हजार ९८० बाधित आढळले होते.

अलिबाग : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्रिसूत्रीच्या नियमांचे पालन करावे. तरच जिल्ह्यात कोरोना लाट रोखण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र, पुन्हा लाॅकडाऊन न करता नियम व अटी कडक करून त्याची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे, असा सूर व्यापारीवर्गाकडून उमटत आहे.

रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ५६ हजार ९८० बाधित आढळले होते. यापैकी ५४ हजार २०७ कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार ६०३ जणांचा आठ महिन्यांत मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ९७० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येऊ लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आणि थंडीचा हंगाम सुरू झाल्याने विषाणू हवेत जास्त वेळ जिवंत राहतात. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी प्रशासन कोरोनाची लाट रोखण्यासाठी सज्ज आहे. 

रायगड, अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन तयार करणारा जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जागेची पाहणी केंद्राकडून केली जाणार आहे. लवकरच जनरेशन प्लांटही कार्यान्वित केला जाणार आहे. - डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक 

कोरोनावर लस येईपर्यत नागरिकांनी सुरक्षेसाठी शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या नियमांचे पालन नागरिकांनी करावे. - निधी चौधरी, जिल्हाधिकारी 

माणगाव, कर्जत, पेण, श्रीवर्धन या ठिकाणी २ टनचा प्लांट तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर माणगाव येथे २०० टन ऑक्सिजनचा साठाही करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक तेवढे ऑक्सिजन उपलब्ध असून १०० व्हेंटिलेटर बेडची सुविधा केलेली आहे. औषधांचा साठाही मुबलक प्रमाणात ठेवण्यात आला आहे. - आरोग्य विभाग

लाॅकडाऊन कालावधीत किराणा खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या  रांगा लागल्या होत्या. मात्र संचार व टाळेबंदीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने नागरिकांना किराणा खरेदी करणेही अशक्य झाले होते. त्यामुळे सध्या आमचाही व्यवसाय पूर्ववत झाला नाही. - व्यापारी संघटना

काही कारखान्यांमध्ये काॅस्ट कटिंग झाल्याने कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. आता लाॅकडाऊन न करता कोरोनाबाबत खबरदारी घेऊन कामकाज सुरू राहणे गरजेचे  आहे. - कामगार संघटना

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस