शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

पुन्हा लाॅकडाऊन नको, नियम पालन गरजेचे; नागरिकांनी काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:37 IST

व्यापाऱ्यांची भूमिका, रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ५६ हजार ९८० बाधित आढळले होते.

अलिबाग : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्रिसूत्रीच्या नियमांचे पालन करावे. तरच जिल्ह्यात कोरोना लाट रोखण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र, पुन्हा लाॅकडाऊन न करता नियम व अटी कडक करून त्याची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे, असा सूर व्यापारीवर्गाकडून उमटत आहे.

रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ५६ हजार ९८० बाधित आढळले होते. यापैकी ५४ हजार २०७ कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार ६०३ जणांचा आठ महिन्यांत मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ९७० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येऊ लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आणि थंडीचा हंगाम सुरू झाल्याने विषाणू हवेत जास्त वेळ जिवंत राहतात. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी प्रशासन कोरोनाची लाट रोखण्यासाठी सज्ज आहे. 

रायगड, अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन तयार करणारा जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जागेची पाहणी केंद्राकडून केली जाणार आहे. लवकरच जनरेशन प्लांटही कार्यान्वित केला जाणार आहे. - डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक 

कोरोनावर लस येईपर्यत नागरिकांनी सुरक्षेसाठी शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या नियमांचे पालन नागरिकांनी करावे. - निधी चौधरी, जिल्हाधिकारी 

माणगाव, कर्जत, पेण, श्रीवर्धन या ठिकाणी २ टनचा प्लांट तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर माणगाव येथे २०० टन ऑक्सिजनचा साठाही करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक तेवढे ऑक्सिजन उपलब्ध असून १०० व्हेंटिलेटर बेडची सुविधा केलेली आहे. औषधांचा साठाही मुबलक प्रमाणात ठेवण्यात आला आहे. - आरोग्य विभाग

लाॅकडाऊन कालावधीत किराणा खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या  रांगा लागल्या होत्या. मात्र संचार व टाळेबंदीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने नागरिकांना किराणा खरेदी करणेही अशक्य झाले होते. त्यामुळे सध्या आमचाही व्यवसाय पूर्ववत झाला नाही. - व्यापारी संघटना

काही कारखान्यांमध्ये काॅस्ट कटिंग झाल्याने कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. आता लाॅकडाऊन न करता कोरोनाबाबत खबरदारी घेऊन कामकाज सुरू राहणे गरजेचे  आहे. - कामगार संघटना

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस