शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

‘निर्मल ग्राम’ पुरस्कार रखडला

By admin | Updated: July 8, 2015 22:49 IST

जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्कारासाठी पात्र आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय स्तरावरील पथक परीक्षणासाठी जिल्ह्यात फिरकलेच नाही

आविष्कार देसाई  अलिबागजिल्ह्यातील २५० ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्कारासाठी पात्र आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय स्तरावरील पथक परीक्षणासाठी जिल्ह्यात फिरकलेच नाही. त्याचप्रमाणे २०१३ साली १६ ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार जाहीर होऊनही राष्ट्रपती अथवा राज्यपालांच्या हस्ते होणारा पुरस्कार वितरण समारंभही रखडला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये तीव्र नाराजी आहे.जिल्हा हगणदारीमुक्तीकडे वाटचाल करीत असतानाच दुसरीकडे सरकारकडूनच स्वच्छ भारत मिशनच्या कार्यक्रमाला ब्रेक लावला जात असल्याचे त्यानिमित्ताने समोर आले आहे. रायगड जिल्हा स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून चांगले काम करीत आहेत. वैयक्तिक शौचालये उभारण्याचे ६५ टक्के उद्दिष्ट रायगड जिल्ह्याने गाठले आहे. जिल्ह्यात एकूण ८२४ ग्रामपंचायती आहेत. २००४-०५ ते २०१०-११ सालापर्यंत ४५५ ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे, तर १६ ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून त्या ग्रामपंचायती अद्यापही पुरस्कारापासून वंचित आहेत.