शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

नव्याने जातनिहाय गणना व्हावी

By admin | Updated: October 7, 2015 00:11 IST

योग्य प्रकारे जातनिहाय जणगणना न झाल्याने बौद्धधर्मीयांच्या आरक्षणाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी ती पुन्हा करण्यासाठी राज्य सरकारला शिफारस करून तो प्रस्ताव केंद्राकडे

अलिबाग : योग्य प्रकारे जातनिहाय जणगणना न झाल्याने बौद्धधर्मीयांच्या आरक्षणाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी ती पुन्हा करण्यासाठी राज्य सरकारला शिफारस करून तो प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश खाडे यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील अनुसूचित जातींचे विविध प्रश्न, त्यांच्यासाठी असणाऱ्या योजना, राज्य सरकार केंद्र सरकार यांच्यामार्फत येणारा निधी, त्याचे होणारे वाटप, याबाबतचा आढावा घेण्यासाठी अनुसूचित जाती कल्याण समितीचा दौरा रायगड जिल्ह्यात ५ ते ७ आॅक्टोबर या कालावधीत राज्य सरकारने लावला होता.जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजना ४६ वाड्यांवर अद्याप पोचलेल्या नाहीत. त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यास प्रशासन कमी पडले असल्याचे मतही समितीचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी व्यक्त केले. इतर योजनांमध्ये काम चांगले असून, ते अधिक चांगले होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही जिल्हा प्रशासन आणि रायगड जिल्हा प्रशासनाला केल्या असल्याचे आमदार खाडे यांनी सांगितले.माणगावच्या रायगड शिक्षण संस्थेने साहाय्यक शिक्षक वैशाली शेंडे यांना जातीभेद करीत काढून टाकल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या महिलेला न्याय देण्यासाठी, संस्थेवर कारवाई करण्यासाठी शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालकांना निर्देश देण्यात येणार असल्याचेही खाडे यांनी स्पष्ट केले. माणगाव शिक्षण संस्थाचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाने केलेल्या अन्यायाचा पाढा वैशाली शेंडे यांनी समितीसमोर वाचला. (प्रतिनिधी)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सध्या राजकारण केले जात आहे. काही पक्ष आता श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समितीचे सदस्य तथा आमदार प्रकाश गजभिये यांनी सांगून, ११ आॅक्टोबरला होणाऱ्या भूमिपूजनाआधी स्मारकाचा आराखडा तयार करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. रायगड जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजना ४६ वाड्यांवर अद्याप पोचलेल्या नाहीत.१) जिल्हा नियोजन फंडातील अनुसूचित जातीसाठीच्या उपाययोजनांतून जिल्ह्यातील मुलांसाठी यूपीएस्सी आणि एमपीएस्सीचे ट्रेनिंग देणारे स्पेशल इन्स्टिट्युट उभारावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला समितीने केल्या आहेत.२) जिल्ह्यात अनुसूचित जातींच्या मुलामुलींसाठी शाळा, वसतिगृहही भाड्याने घेतलेली आहेत. ती सरकारने स्वत: बांधावीत, असा प्रस्ताव सरकारला दिला आहे.३) विधानसभेत अनुसूचित जातीचे ८ आमदार आहेत. ते प्रामुख्याने २८ पाहिजे होते, तर ९ खासदार असावयास पाहिजे असताना प्रत्यक्षात पाचच आहेत. ही विषमता चुकीच्या जातनिहाय जनगणनेमुळे निर्माण झाली आहे. विकासकामांसाठी १३ टक्के निधीअभावी ११ टक्केच मिळाला असल्याचे आ. गजभिये यांनी सांगितले.