शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

नेरूळ-उरण रेल्वे, प्रवासी-कंटेनर वाहतुकीस उपयुक्त ठरणारा जासई उड्डाणपूल कार्यान्वित होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2022 18:36 IST

वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार

मधुकर ठाकूर, उरण: भू-संपादनासाठी प्रकल्पग्रस्तांचा विरोध, कोरोना महामारी आणि इतर काही समस्यांमुळे मागील चार वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेला रेल्वे, प्रवासी आणि  वाहतूकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा जासई उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.१.२ किमी लांबीचा उड्डाणपूल मार्च अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याची माहिती राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यशवंत घोटकर यांनी दिली.

जेएनपीटी -मुंबई रोड कंपनी व राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून जेएनपीए -आम्रमार्ग या मार्गावर चार टप्प्यापैकी तिसऱ्या टप्प्यातील जासई उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.१.२ मीटर लांब व २६ मीटर रुंदीचा उड्डाणपूल ५२ पिल्लवर उभारण्यात येत आहे.उड्डाणपुलाच्या कामाला २०१९ साली सुरुवात करण्यात आली होती.मात्र उड्डाणपूलाच्या उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जागा  भू-संपादन करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा झालेला विरोध, कोरोना महामारीमुळे कामात आलेले विविध अडथळे आणि इतर समस्यांमुळे मागील चार वर्षांपासून जासई उड्डाण पुलाचे काम अडखळत कासवगतीने सुरू होते.मात्र यातील अनेक अडथळे दूर झाल्यानंतर जासई उड्डाण पुलाच्या कामाने वेग घेतला आहे.वेगाने प्रगतीपथावर असलेल्या उड्डाणपुलाचे काम आणखी कोणत्याही समस्या उद्भभवल्या नाहीत तर येत्या मार्च २०२३ अखेरपर्यंत पुर्णत्वास जाऊन वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यशवंत घोटकर यांनी व्यक्त केला आहे.

उरण- नेरूळ रेल्वे मार्गावरील व उरण- पनवेल- नवी मुंबई यांना जोडणारा जासई उड्डाण पुल महत्वाचा दुवा आहे.याच उड्डाणपूलाच्या खालुन उरण- नेरूळ रेल्वे धावणार आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मात्र मार्च २०२३ अखेरीस जासई उड्डाण पुल कार्यान्वित झाल्यानंतर  उरण, जेएनपीए, नवी मुंबई परिसरातील नागरिक, प्रवासी व वाहतूकदारांना सातत्याने सतावणारी वाहतूक कोंडीची समस्या बहुतांशी दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षाही राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यशवंत घोटकर यांनी व्यक्त केली आहे. रायगड, मुंबईतील हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे करंजा मच्छीमार बंदर, उरणकरांना मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षा लागुन असलेला महत्वाकांक्षी २७ किमी लांबीचा  नेरुळ-उरण रेल्वे मार्ग, शिवडी-न्हावा सि-लिंक आणि इतर जासई उड्डाण पुल या महत्त्वाचे प्रकल्प येत्या २०२३ मध्येच कार्यान्वित होणार आहेत. यामुळे उरणकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :uran-acउरणRaigadरायगड