शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

नेरळ-कळंब जिल्हा मार्ग खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:37 IST

रस्त्याला मोठे भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता

नेरळ : नेरळ-कळंब जिल्हा मार्गावरील बिरदोले गावाजवळ बुधवारी सकाळी अचानक रस्ता खचला आहे. या रस्त्याला मोठे भगदाड पडले असून, येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरून जात नसल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सावधानपणे वाहन चालवावे, असे आवाहन स्थानिक व नेरळ पोलिसांकडून करण्यात आले आहे.नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर बिरदोले गावाजवळ असणारी मोरी खचून पूर्ण रस्ता खचल्याने मोठे भगदाड पडले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जमीन खचली असल्याचे बोलले जात आहे. नेरळ वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूककोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत असून, अनेक प्रवाशांना सूचना देत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यावरील हा खचलेला भाग लवकरात लवकर चांगला करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सध्या या रस्त्यावरून दुचाकी जात असल्या तरी चारचाकी वाहने जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मराठा मोर्चामुळे ठेकेदारांनीही काम बंद केले आहे. त्यामुळे हा खड्डा बुजवण्यासाठी माणसे मिळत नाही. त्यामुळे लवकरच या रस्त्यावरील खचलेला भाग भरण्यात येईल आणि रस्ता चांगला करण्यात येईल.- आर. एम. वेलदोडे, शाखाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागनेरळ-कळंब रस्ता बिरदोले गावाजवळ मध्यभागी खचला आहे. त्यामुळे चारचाकी वाहने या रस्त्यावरून जात नाही. त्यामुळे येथे वाहतूककोंडी झाली आहे. हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. आमच्याकडून वाहनचालकांना वाहने सावधानपणे चालवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.- मदन पाटील, वाहतूक पोलीस, नेरळ

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगड