शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

नेरळ बसस्थानक होणार खड्डेमुक्त

By admin | Updated: July 29, 2016 02:47 IST

नेरळ बस स्थानकात दरवर्षी पावसाचे पाणी अडून बस स्थानकाला तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे हजारो प्रवाशांना पाण्यातून व चिखलातून प्रवास करावा लागतो. यासंदर्भात ‘नेरळ बस

नेरळ : नेरळ बस स्थानकात दरवर्षी पावसाचे पाणी अडून बस स्थानकाला तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे हजारो प्रवाशांना पाण्यातून व चिखलातून प्रवास करावा लागतो. यासंदर्भात ‘नेरळ बस स्थानकात गैरसोय’ असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल घेत कोल्हारे ग्रामपंचायतीने बस स्थानकात खडीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय आता दूर होणार आहे.एसटी परिवहन महामंडळाच्या कर्जत आगाराअंतर्गत हे नेरळ बस स्थानक येते. येथून दररोज अनेक बस फेऱ्या नेरळ परिसरातील गावांमध्ये होत असतात. हजारो प्रवासी या बस स्थानकातून ये -जा करतात. परंतु बस गाड्यांपेक्षा खासगी गाड्यांचाच गराडा येथे पहायला मिळतो. नेरळला रेल्वे स्थानक असल्याने ग्रामीण भागातून हजारो प्रवासी रेल्वे पकडण्यासाठी याच बस स्थानकातून ये -जा करतात. परंतु पावसामुळे या बस स्थानकात गुडघाभर पाण्यातून प्रवाशांना जावे लागते. हळूहळू पाणी कमी झाल्याने येथे चिखल जमा होऊन दुर्गंधी पसरते. परंतु तशाच अवस्थेत प्रवासी येथून जात असतात. आगारप्रमुख डी. एस. देशमुख यांनी आम्ही कर्जत पंचायत समिती, कर्जत तहसीलदार याकडे पत्रव्यवहार केल्याचे सांगितले होते. परंतु संबंधित अधिकारी दखल घेत नसल्याचे सांगितले होते. परंतु नेरळ बस स्थानकाची अवस्था पाहून कोल्हारे ग्रामपंचायतीने अखेर दखल घेतली आहे. काही दिवसांपूर्वी खडी आणि रेती बस स्थानकात टाकण्यात आली होती. परंतु मजूर मिळत नसल्याने हे काम थांबले होते. मात्र गुरु वारी बस स्थानकात खड्ड्यांमध्ये व पाणी जमा होत असलेल्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खडी व त्यावर रेती टाकण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे पाऊस पडला तरीही बस स्थानकात पाणी व चिखल जमा होणार नाही. या कामामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्तके ले आहे.(वार्ताहर)