शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

सागरीमार्गासाठी ६४६ कोटींची गरज

By admin | Updated: October 28, 2015 00:59 IST

सागरी महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील १९५ किमी रस्त्यापैकी १७९ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १६ किमी रस्ता आणि आवश्यक चार पुलांचे बांधकाम याकरिता

जयंत धुळप, अलिबागसागरी महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील १९५ किमी रस्त्यापैकी १७९ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १६ किमी रस्ता आणि आवश्यक चार पुलांचे बांधकाम याकरिता ६४६ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याची माहिती सन २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या कपात सूचनेच्या लेखी उत्तरात राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला दिली असल्याची माहिती अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.हा संपूर्ण सागरी महामार्ग केवळ सागरी महामार्ग नाही, तर तो या देशाच्या सीमेवरील महत्त्वाचा महामार्ग असल्याने तो राष्ट्रीय सीमा महामार्ग या सदरात केंद्र सरकारच्या माध्यमातून होणे अत्यावश्यक असल्याने तशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. १९९३ मध्ये शेखाडी-श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी आरडीएक्स ही अतिसंहारक स्फोटके बेकायदा उतरवून पुढे ती देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रचंड मोठा संहार घडून आला. त्यानंतरही सागरीमार्गेच अतिरेकी मुंबईत पोहोचले. यातून शहाणपण शिकून कोकण किनारपट्टीतील हा महामार्ग राष्ट्रीय सीमा महामार्ग म्हणूनच केला पाहिजे या मागणीकरिता पाठपुरावा करणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यातील उरण, पेण, अलिबाग, मुरुड व श्रीवर्धन हे तालुके समुद्र व खाडीलगत आहेत. या तालुक्यातील पर्यटन, शेती व मत्स्य व्यवसाय यांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून समुद्रखाडीलगत प्र.रा.मा.क्र. ४ दर्जाच्या सागरी महामार्गाचा वापर होऊ शकतो, हे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले. रायगड जिल्ह्यातील या रस्त्याच्या एकूण १९५ कि.मी. लांबीपैकी १७९ कि.मी. इतक्या लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नव्याने बांधकाम करावयाच्या १६ कि.मी लांबीपैकी १२.५० कि.मी. लांबीच्या रस्त्यास अपेक्षित जमिनीच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. या रस्त्याच्या बांधकामासाठी ४६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे नमूद केले.