शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सागरीमार्गासाठी ६४६ कोटींची गरज

By admin | Updated: October 28, 2015 00:59 IST

सागरी महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील १९५ किमी रस्त्यापैकी १७९ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १६ किमी रस्ता आणि आवश्यक चार पुलांचे बांधकाम याकरिता

जयंत धुळप, अलिबागसागरी महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील १९५ किमी रस्त्यापैकी १७९ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १६ किमी रस्ता आणि आवश्यक चार पुलांचे बांधकाम याकरिता ६४६ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याची माहिती सन २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या कपात सूचनेच्या लेखी उत्तरात राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला दिली असल्याची माहिती अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.हा संपूर्ण सागरी महामार्ग केवळ सागरी महामार्ग नाही, तर तो या देशाच्या सीमेवरील महत्त्वाचा महामार्ग असल्याने तो राष्ट्रीय सीमा महामार्ग या सदरात केंद्र सरकारच्या माध्यमातून होणे अत्यावश्यक असल्याने तशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. १९९३ मध्ये शेखाडी-श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी आरडीएक्स ही अतिसंहारक स्फोटके बेकायदा उतरवून पुढे ती देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रचंड मोठा संहार घडून आला. त्यानंतरही सागरीमार्गेच अतिरेकी मुंबईत पोहोचले. यातून शहाणपण शिकून कोकण किनारपट्टीतील हा महामार्ग राष्ट्रीय सीमा महामार्ग म्हणूनच केला पाहिजे या मागणीकरिता पाठपुरावा करणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यातील उरण, पेण, अलिबाग, मुरुड व श्रीवर्धन हे तालुके समुद्र व खाडीलगत आहेत. या तालुक्यातील पर्यटन, शेती व मत्स्य व्यवसाय यांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून समुद्रखाडीलगत प्र.रा.मा.क्र. ४ दर्जाच्या सागरी महामार्गाचा वापर होऊ शकतो, हे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले. रायगड जिल्ह्यातील या रस्त्याच्या एकूण १९५ कि.मी. लांबीपैकी १७९ कि.मी. इतक्या लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नव्याने बांधकाम करावयाच्या १६ कि.मी लांबीपैकी १२.५० कि.मी. लांबीच्या रस्त्यास अपेक्षित जमिनीच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. या रस्त्याच्या बांधकामासाठी ४६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे नमूद केले.