शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सागरीमार्गासाठी ६४६ कोटींची गरज

By admin | Updated: October 28, 2015 00:59 IST

सागरी महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील १९५ किमी रस्त्यापैकी १७९ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १६ किमी रस्ता आणि आवश्यक चार पुलांचे बांधकाम याकरिता

जयंत धुळप, अलिबागसागरी महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील १९५ किमी रस्त्यापैकी १७९ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १६ किमी रस्ता आणि आवश्यक चार पुलांचे बांधकाम याकरिता ६४६ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याची माहिती सन २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या कपात सूचनेच्या लेखी उत्तरात राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला दिली असल्याची माहिती अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.हा संपूर्ण सागरी महामार्ग केवळ सागरी महामार्ग नाही, तर तो या देशाच्या सीमेवरील महत्त्वाचा महामार्ग असल्याने तो राष्ट्रीय सीमा महामार्ग या सदरात केंद्र सरकारच्या माध्यमातून होणे अत्यावश्यक असल्याने तशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. १९९३ मध्ये शेखाडी-श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी आरडीएक्स ही अतिसंहारक स्फोटके बेकायदा उतरवून पुढे ती देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रचंड मोठा संहार घडून आला. त्यानंतरही सागरीमार्गेच अतिरेकी मुंबईत पोहोचले. यातून शहाणपण शिकून कोकण किनारपट्टीतील हा महामार्ग राष्ट्रीय सीमा महामार्ग म्हणूनच केला पाहिजे या मागणीकरिता पाठपुरावा करणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यातील उरण, पेण, अलिबाग, मुरुड व श्रीवर्धन हे तालुके समुद्र व खाडीलगत आहेत. या तालुक्यातील पर्यटन, शेती व मत्स्य व्यवसाय यांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून समुद्रखाडीलगत प्र.रा.मा.क्र. ४ दर्जाच्या सागरी महामार्गाचा वापर होऊ शकतो, हे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले. रायगड जिल्ह्यातील या रस्त्याच्या एकूण १९५ कि.मी. लांबीपैकी १७९ कि.मी. इतक्या लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नव्याने बांधकाम करावयाच्या १६ कि.मी लांबीपैकी १२.५० कि.मी. लांबीच्या रस्त्यास अपेक्षित जमिनीच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. या रस्त्याच्या बांधकामासाठी ४६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे नमूद केले.