शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सेवा करण्याची वृत्ती अंगी बाणवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:31 IST

प्रल्हाद पै : जीवन विद्या मिशनच्या कृतज्ञता महोत्सवास सुरुवात

कर्जत : देण्याची वृत्ती म्हणजे सेवा करण्याची वृत्ती, हीच वृत्ती आपण अंगी बाणवण्याची गरज आहे. अनुग्रहापासून अनुभवापर्यंतच्या प्रवासात आनंद वाटायचा व आनंद लुटायचा, असे प्रतिपादन अथांग जनसमुदायासमोर प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवन विद्या ज्ञानपीठ कर्जत येथे केले. निमित्त होते कृतज्ञता दिन सोहळ्याच्या द्वितीय पुष्पाचे.

ज्ञानदान व वैचारिक क्रांतीद्वारे समाजप्रबोधनाचा वसा घेतलेल्या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच जीवन विद्या मिशन आयोजित कृतज्ञता सोहळा किंवा गुरुपौर्णिमा महोत्सव. २१ जुलै ते २६ जुलै दरम्यान या महोत्सवाचे आयोजन जीवन विद्या ज्ञानपीठ कर्जत येथे करण्यात आले आहे. यानिमित्त देश-विदेशातून मोठ्या संख्येने ज्ञानपीठात आलेल्या नामधारकांना सद्गुरूंचे सुपुत्र प्रल्हाद पै मार्गदर्शन करताना म्हणाले, माणूस सर्व मिळवण्याच्या मागे लागल्यामुळे संघर्ष निर्माण होतो व संघर्षातून एकच गोष्ट निर्माण होते ते म्हणजे दु:ख, त्यामुळे आनंद मिळवण्याच्या भानगडीत पडूच नये, देण्याचा विचार करावा. देण्याची इच्छा व्यक्त केली की येण्याची व्यवस्था होतेच. या वेळी ज्येष्ठ प्रबंधक शिवाजी पालव, रत्नागिरी जिल्हा माजी सभापती दत्ता कदम, व्हिनस केकचे सर्वेसर्वा विनायक कारभाटकर, पंचायत समिती सभापती राहुल विशे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर आदी उपस्थित होते.

२१ जुलै ते २६ जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन जीवन विद्या ज्ञानपीठ कर्जत येथे करण्यात आले आहे. यासाठी देश-विदेशातून नामधारक उपस्थित आहेत.