शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:02 IST

कर्जत शहरातील स्वप्ननगरी, नानामास्तर, महावीरपेठमध्ये रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, खांब कोसळणे यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

विजय मांडे।लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : अरबी समुद्रात भयंकर रूप धारण करत कोकणात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी रायगड जिल्ह्याला लक्ष्य केले. यामध्ये कर्जत, नेरळ, माथेरान या शहरांसह ग्रामीण भागाला तडाखा बसला.

कर्जत शहरातील स्वप्ननगरी, नानामास्तर, महावीरपेठमध्ये रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, खांब कोसळणे यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. माथेरानमध्ये राम बाग पॉइंट येथील आशा पार्टे यांच्या घराचे पत्रे उडून भिंतीदेखील बाधित झाल्या आहेत.

माथेरान इंदिरानगरमधील रवी जाबरे यांचे घर कोसळल्याची घटना घडली आहे. तर नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुमापट्टी येथील भाग बाबू आखाडे यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून मागील घरावर जाऊन दोन घरांचे नुकसान झाले. मनोहर पादीर यांच्या घरावरील कौले उडून गेली आहेत तर भाताचा पेंडा संपूर्णत: भिजून गेला आहे. यासह मोहचीवाडी येथील अर्जुन हिलम यांच्यादेखील घरावरील छप्पर उडून गेले आहे.

शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळणे, विद्युत खांब पडणे, विद्युत तारा तुटणे, घरावरील कौल, पत्रे उडून जाण्याच्या घटना घडत असताना नेरळजवळील धामोते गावातदेखील झाडे कोसळणे यासोबत नव्याने बांधलेले गणेश डायरे यांचे मातीचे घरावरील पत्रे उडून भिंती बाधित झाल्या आहेत.

डोळ्यादेखत बांधलेले खोपटे उघडे पडल्याने डायरे कुटुंबाच्या अश्रूंचा बांध फुटला होता. तर जामरुंग, मोग्रज, पाथरज, खांडस, ओलमन, चई येथील गावांसह आदिवासी वाड्या, पाडे या चक्रीवादळामुळे बाधित झाले आहेत. वासराच्या खोंड्यातही खूप नुकसान झाले आहे.कोंकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीच्या छपराचे सुमारे साठ पत्रे उडून गेल्यामुळे खूप नुकसान झाले आहे.वादळानंतर उधाणलेल्या स्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन जीवाचे रान करीत आहे. धाबेवाडी, रजपे वाडी, धोत्रे वाडी आदी भागांत जाऊन तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख हे स्वत: परिस्थितीची पाहणी करून उपाययोजना राबवत आहेत. त्यामुळे त्या भागातील रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत.

महावितरणचेदेखील या वादळात मोठे नुकसान झाले असताना या प्रसंगावर महावितरणचे कर्मचारी अधिकारी हे मात करण्यासाठी वादळ शमल्यापासून अहोरात्र मेहनत घेत आहेत. उपअभियंता योगेश साबळे आणि सूर्यकांत माने यांनी उपलब्ध मोजक्याच कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन खोपोली ते कर्जत अशी पायपीट करून ज्या ज्या ठिकाणी वीज प्रवाहात अडचण होती ती दूर करून अवघ्या ३४ तासांत कर्जत शहरात वीजपुरवठा सुरू केला. 

निसर्ग चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मी स्वत: तालुक्यातील आदिवासी भागात फिरत आहे. शक्य त्या सर्व उपाययोजना आम्ही राबवत आहोत. यासह नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश सर्व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.- विक्रम देशमुख,तहसीलदार, कर्जत

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ