शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:02 IST

कर्जत शहरातील स्वप्ननगरी, नानामास्तर, महावीरपेठमध्ये रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, खांब कोसळणे यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

विजय मांडे।लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : अरबी समुद्रात भयंकर रूप धारण करत कोकणात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी रायगड जिल्ह्याला लक्ष्य केले. यामध्ये कर्जत, नेरळ, माथेरान या शहरांसह ग्रामीण भागाला तडाखा बसला.

कर्जत शहरातील स्वप्ननगरी, नानामास्तर, महावीरपेठमध्ये रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, खांब कोसळणे यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. माथेरानमध्ये राम बाग पॉइंट येथील आशा पार्टे यांच्या घराचे पत्रे उडून भिंतीदेखील बाधित झाल्या आहेत.

माथेरान इंदिरानगरमधील रवी जाबरे यांचे घर कोसळल्याची घटना घडली आहे. तर नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुमापट्टी येथील भाग बाबू आखाडे यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून मागील घरावर जाऊन दोन घरांचे नुकसान झाले. मनोहर पादीर यांच्या घरावरील कौले उडून गेली आहेत तर भाताचा पेंडा संपूर्णत: भिजून गेला आहे. यासह मोहचीवाडी येथील अर्जुन हिलम यांच्यादेखील घरावरील छप्पर उडून गेले आहे.

शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळणे, विद्युत खांब पडणे, विद्युत तारा तुटणे, घरावरील कौल, पत्रे उडून जाण्याच्या घटना घडत असताना नेरळजवळील धामोते गावातदेखील झाडे कोसळणे यासोबत नव्याने बांधलेले गणेश डायरे यांचे मातीचे घरावरील पत्रे उडून भिंती बाधित झाल्या आहेत.

डोळ्यादेखत बांधलेले खोपटे उघडे पडल्याने डायरे कुटुंबाच्या अश्रूंचा बांध फुटला होता. तर जामरुंग, मोग्रज, पाथरज, खांडस, ओलमन, चई येथील गावांसह आदिवासी वाड्या, पाडे या चक्रीवादळामुळे बाधित झाले आहेत. वासराच्या खोंड्यातही खूप नुकसान झाले आहे.कोंकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीच्या छपराचे सुमारे साठ पत्रे उडून गेल्यामुळे खूप नुकसान झाले आहे.वादळानंतर उधाणलेल्या स्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन जीवाचे रान करीत आहे. धाबेवाडी, रजपे वाडी, धोत्रे वाडी आदी भागांत जाऊन तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख हे स्वत: परिस्थितीची पाहणी करून उपाययोजना राबवत आहेत. त्यामुळे त्या भागातील रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत.

महावितरणचेदेखील या वादळात मोठे नुकसान झाले असताना या प्रसंगावर महावितरणचे कर्मचारी अधिकारी हे मात करण्यासाठी वादळ शमल्यापासून अहोरात्र मेहनत घेत आहेत. उपअभियंता योगेश साबळे आणि सूर्यकांत माने यांनी उपलब्ध मोजक्याच कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन खोपोली ते कर्जत अशी पायपीट करून ज्या ज्या ठिकाणी वीज प्रवाहात अडचण होती ती दूर करून अवघ्या ३४ तासांत कर्जत शहरात वीजपुरवठा सुरू केला. 

निसर्ग चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मी स्वत: तालुक्यातील आदिवासी भागात फिरत आहे. शक्य त्या सर्व उपाययोजना आम्ही राबवत आहोत. यासह नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश सर्व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.- विक्रम देशमुख,तहसीलदार, कर्जत

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ