शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

पनवेलमध्ये १६२ गावांना ‘निसर्ग’चा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 00:38 IST

शासनाच्या मदतीची प्रतीक्षा : पावसाळ्याच्या तोंडावर नुकसानग्रस्त घरांच्या दुरुस्तीसाठी धावपळ

वैभव गायकर ।

पनवेल : निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र असलेल्या रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातदेखील या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे तालुक्यातील सुमारे १६२ गावे व आदिवासी वाड्यांमध्ये नुकसान झाले आहे.महसूल विभागामार्फत गावनिहाय तलाठी तसेच ग्रामसेवकांमार्फत झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. या वादळाचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. तालुक्यात एकूण १९५० घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत तर अनेक घरांची छते उडाली आहेत.ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे अस्मानी संकट कोसळल्याने अनेक ग्रामस्थ व आदिवासी बांधवांची घरांच्या दुरुस्तीची लगबग सुरू झाली आहे. लॉकडाऊनमध्ये नुकतीच मोकळीक मिळाली आहे. मात्र घरांच्या दुरुस्तीसाठी लागणारे पत्रे, कौले मिळत नसल्याने अनेक जण हवालदिल झाले आहेत. घरांची दुरुस्ती सुरू असताना पावसाला सुरुवात झाल्यास पुन्हा एकदा अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू आहेत. दोन ते तीन दिवसांत हे पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली.

पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात फार्महाउस आहेत. मुंबई उपनगरातील बड्या हस्ती तसेच धनाढ्यांचे हे फार्महाउस आहेत. या फार्महाउसनादेखील मोठा फटका बसला आहे. जवळजवळ ५०० फार्महाउसना निसर्ग वादळाचा फटका बसला आहे. अनेक फार्महाउसमधील झाडे कोसळली आहेत तर अनेक फार्महाउसची छते उडाली आहेत. शहरी भागातील मोठमोठ्या इमारतींवरील वेदर शेड (पत्रे ) जोरदार वादळामुळे उडाली आहे.तालुक्यात ३५० विजेचे खांब उन्मळून पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा दोन दिवस खंडित झाला होता. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र महावितरणचेदेखील मोठे नुकसान यामुळे झाले आहे. ५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याच्या अंतिम अहवालात नुकसान झालेल्या विविध भागांची खरी आकडेवारी समोर येईलच.१६२ गावांना निसर्ग वादळाचा फटका बसला आहे. यामध्ये आदिवासी वाड्यांचादेखील समावेश आहे. या नुकसानग्रस्त ठिकाणांचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्फत सुरू आहेत. दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील.- अमित सानप, तहसीलदार, पनवेल५०० फार्महाउसना फटका१पनवेल तालुक्यात नेरे, मालडुंगी, वाजे, कर्नाळा परिसरात मोठ्या प्रमाणात फार्महाउस आहेत. मुंबई-उपनगरातील बड्या हस्ती, धनाढ्यांचे सेकंड होम म्हणून हे फार्महाउस आहेत. या फार्महाउसनादेखील निसर्ग वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक फार्महाउसमधील झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच मोठ्या फार्महाउसेसची छते सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडाली आहेत.लवकरात लवकर मदतीची गरज२लॉकडाऊनच्या काळात मागील तीन महिन्यांपासून घरीच बसल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. अशा परिस्थितीत निसर्ग वादळाच्या फटाक्यामुळे घरे दुरुस्तीसाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्याने शासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल