शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

नेरळमध्ये नैसर्गिक नाल्यात बांधकाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:22 IST

पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळा : चिंचआळी लोकवस्तीत पाणी शिरण्याची शक्यता

नेरळ : नेरळ गावातील चिंचआळी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून, तेथील साईकृपा व्हॅली या ग्रहसंकुलातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी चक्क नैसर्गिक नाल्यात बांधकाम सुरू केले आहे. या नाल्यातील बांधकामामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण होणार असून जास्त पाऊस असेल त्या वेळी कदाचित चिंचआळीमधील रहिवाशांच्या घरात पाणी शिरू शकते.

नेरळ-माथेरान रस्त्यालगत असलेल्या चिंचआळी भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभे राहत आहेत. सध्या तेथे साईकृपा व्हॅली या ठिकाणी असलेल्या इमारतींमधील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइप टाकले जात आहेत. मात्र, त्या वेळी त्या पाइपच्या सभोवती सिमेंट काँक्रीटचे बांधकामदेखील केले जात आहे. जे बांधकाम करताना संबंधित जमीन विकासक यांनी सिमेंट बांधकाम करताना ते पुढे नाल्यात केले आहे. ते करताना माथेरानच्या डोंगरावरून वाहून आलेल्या पाण्याचा नाला हा आकाराने लहान होत आहे. पावसाळ्यात माथेरानच्या डोंगरातून वाहून येणारे पाणी या नाल्यातून दुथडी भरून वाहून जात असते. दरवर्षी महापुराची स्थिती असेल, तेव्हा त्या नाल्यातील पाणी चिंचआळी भागातील घरांमध्ये जाते. ही वस्तुस्थिती असतानाही साईकृपा व्हॅली या विकासकाने टाकलेल्या पाइपभोवती केलेल्या बांधकामामुळे नाल्याचा आकार अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे नाल्याची पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली असून, या वर्षी थोडेसे जरी पावसाचे प्रमाण वाढले तरी चिंचआळी भागातील काही घरात नाल्याचे पाणी जाऊन मोठे नुकसान होऊ शकते.

याबाबत स्थानिक रहिवासी यांनी नेरळ ग्रामपंचायत, कर्जत तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन आवाहन केले आहे. या नाल्यात झालेले बांधकाम न हटविल्यास पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली असून, नेरळ ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पावसाळा जसा जवळ येईल, तसे चिंचआळी ग्रामस्थांची झोप उडून जाणार असून ग्रामपंचायत जोवर नाल्यातील बांधकाम दूर करून नाला नैसर्गिक स्थितीत आणून ठेवत नाही, तोवर चिंचआळी ग्रामस्थांना झोप लागणार नाही.

साईकृपा व्हॅली या संकुलातून निघणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या पाइपलाइनचेनंतर नाल्यात केलेले बांधकाम दूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक नाल्यात बांधकाम करण्यापूर्वी असलेले नियम पाळले पाहिजेत, असे सूचित करण्यात आले आहे. - राजेंद्र गुडदे, ग्रामविकास अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत

आमच्या भागात पावसाळ्यात यापूर्वीदेखील पाणी यायचे, सतत पाऊस सुरू असेल तर घरातदेखील पाणी येते. त्यात आता नाल्याचा आकार कमी झाला तर मात्र नाल्याचा मार्ग बंद होऊन पाणी थेट चिंचआळीमधील घरांत पोहोचणार आहे हे धोकादायक असून शासनाने तो नाला तत्काळ बांधकाममुक्त करावा. - संजय गवळी, ग्रामस्थ, चिंचआळी