शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

नेरळमध्ये नैसर्गिक नाल्यात बांधकाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:22 IST

पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळा : चिंचआळी लोकवस्तीत पाणी शिरण्याची शक्यता

नेरळ : नेरळ गावातील चिंचआळी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून, तेथील साईकृपा व्हॅली या ग्रहसंकुलातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी चक्क नैसर्गिक नाल्यात बांधकाम सुरू केले आहे. या नाल्यातील बांधकामामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण होणार असून जास्त पाऊस असेल त्या वेळी कदाचित चिंचआळीमधील रहिवाशांच्या घरात पाणी शिरू शकते.

नेरळ-माथेरान रस्त्यालगत असलेल्या चिंचआळी भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभे राहत आहेत. सध्या तेथे साईकृपा व्हॅली या ठिकाणी असलेल्या इमारतींमधील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइप टाकले जात आहेत. मात्र, त्या वेळी त्या पाइपच्या सभोवती सिमेंट काँक्रीटचे बांधकामदेखील केले जात आहे. जे बांधकाम करताना संबंधित जमीन विकासक यांनी सिमेंट बांधकाम करताना ते पुढे नाल्यात केले आहे. ते करताना माथेरानच्या डोंगरावरून वाहून आलेल्या पाण्याचा नाला हा आकाराने लहान होत आहे. पावसाळ्यात माथेरानच्या डोंगरातून वाहून येणारे पाणी या नाल्यातून दुथडी भरून वाहून जात असते. दरवर्षी महापुराची स्थिती असेल, तेव्हा त्या नाल्यातील पाणी चिंचआळी भागातील घरांमध्ये जाते. ही वस्तुस्थिती असतानाही साईकृपा व्हॅली या विकासकाने टाकलेल्या पाइपभोवती केलेल्या बांधकामामुळे नाल्याचा आकार अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे नाल्याची पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली असून, या वर्षी थोडेसे जरी पावसाचे प्रमाण वाढले तरी चिंचआळी भागातील काही घरात नाल्याचे पाणी जाऊन मोठे नुकसान होऊ शकते.

याबाबत स्थानिक रहिवासी यांनी नेरळ ग्रामपंचायत, कर्जत तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन आवाहन केले आहे. या नाल्यात झालेले बांधकाम न हटविल्यास पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली असून, नेरळ ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पावसाळा जसा जवळ येईल, तसे चिंचआळी ग्रामस्थांची झोप उडून जाणार असून ग्रामपंचायत जोवर नाल्यातील बांधकाम दूर करून नाला नैसर्गिक स्थितीत आणून ठेवत नाही, तोवर चिंचआळी ग्रामस्थांना झोप लागणार नाही.

साईकृपा व्हॅली या संकुलातून निघणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या पाइपलाइनचेनंतर नाल्यात केलेले बांधकाम दूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक नाल्यात बांधकाम करण्यापूर्वी असलेले नियम पाळले पाहिजेत, असे सूचित करण्यात आले आहे. - राजेंद्र गुडदे, ग्रामविकास अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत

आमच्या भागात पावसाळ्यात यापूर्वीदेखील पाणी यायचे, सतत पाऊस सुरू असेल तर घरातदेखील पाणी येते. त्यात आता नाल्याचा आकार कमी झाला तर मात्र नाल्याचा मार्ग बंद होऊन पाणी थेट चिंचआळीमधील घरांत पोहोचणार आहे हे धोकादायक असून शासनाने तो नाला तत्काळ बांधकाममुक्त करावा. - संजय गवळी, ग्रामस्थ, चिंचआळी