शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

नेरळमध्ये नैसर्गिक नाल्यात बांधकाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:22 IST

पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळा : चिंचआळी लोकवस्तीत पाणी शिरण्याची शक्यता

नेरळ : नेरळ गावातील चिंचआळी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून, तेथील साईकृपा व्हॅली या ग्रहसंकुलातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी चक्क नैसर्गिक नाल्यात बांधकाम सुरू केले आहे. या नाल्यातील बांधकामामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण होणार असून जास्त पाऊस असेल त्या वेळी कदाचित चिंचआळीमधील रहिवाशांच्या घरात पाणी शिरू शकते.

नेरळ-माथेरान रस्त्यालगत असलेल्या चिंचआळी भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभे राहत आहेत. सध्या तेथे साईकृपा व्हॅली या ठिकाणी असलेल्या इमारतींमधील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइप टाकले जात आहेत. मात्र, त्या वेळी त्या पाइपच्या सभोवती सिमेंट काँक्रीटचे बांधकामदेखील केले जात आहे. जे बांधकाम करताना संबंधित जमीन विकासक यांनी सिमेंट बांधकाम करताना ते पुढे नाल्यात केले आहे. ते करताना माथेरानच्या डोंगरावरून वाहून आलेल्या पाण्याचा नाला हा आकाराने लहान होत आहे. पावसाळ्यात माथेरानच्या डोंगरातून वाहून येणारे पाणी या नाल्यातून दुथडी भरून वाहून जात असते. दरवर्षी महापुराची स्थिती असेल, तेव्हा त्या नाल्यातील पाणी चिंचआळी भागातील घरांमध्ये जाते. ही वस्तुस्थिती असतानाही साईकृपा व्हॅली या विकासकाने टाकलेल्या पाइपभोवती केलेल्या बांधकामामुळे नाल्याचा आकार अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे नाल्याची पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली असून, या वर्षी थोडेसे जरी पावसाचे प्रमाण वाढले तरी चिंचआळी भागातील काही घरात नाल्याचे पाणी जाऊन मोठे नुकसान होऊ शकते.

याबाबत स्थानिक रहिवासी यांनी नेरळ ग्रामपंचायत, कर्जत तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन आवाहन केले आहे. या नाल्यात झालेले बांधकाम न हटविल्यास पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली असून, नेरळ ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पावसाळा जसा जवळ येईल, तसे चिंचआळी ग्रामस्थांची झोप उडून जाणार असून ग्रामपंचायत जोवर नाल्यातील बांधकाम दूर करून नाला नैसर्गिक स्थितीत आणून ठेवत नाही, तोवर चिंचआळी ग्रामस्थांना झोप लागणार नाही.

साईकृपा व्हॅली या संकुलातून निघणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या पाइपलाइनचेनंतर नाल्यात केलेले बांधकाम दूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक नाल्यात बांधकाम करण्यापूर्वी असलेले नियम पाळले पाहिजेत, असे सूचित करण्यात आले आहे. - राजेंद्र गुडदे, ग्रामविकास अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत

आमच्या भागात पावसाळ्यात यापूर्वीदेखील पाणी यायचे, सतत पाऊस सुरू असेल तर घरातदेखील पाणी येते. त्यात आता नाल्याचा आकार कमी झाला तर मात्र नाल्याचा मार्ग बंद होऊन पाणी थेट चिंचआळीमधील घरांत पोहोचणार आहे हे धोकादायक असून शासनाने तो नाला तत्काळ बांधकाममुक्त करावा. - संजय गवळी, ग्रामस्थ, चिंचआळी