शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नेरळमध्ये नैसर्गिक नाला बंद !

By admin | Updated: February 1, 2016 01:39 IST

नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील पाडा भागात असलेला नैसर्गिक नाला त्या परिसरात जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने बंद केला आहे.

कर्जत : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील पाडा भागात असलेला नैसर्गिक नाला त्या परिसरात जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने बंद केला आहे. बंद झालेल्या नाल्यामुळे पावसाचे पाणी लोकवस्तीमध्ये घुसण्याची शक्यता आहे. घरादारात पावसाचे पाणी जाण्याच्या भीतीने पाडा ग्रामस्थ हवालदिल झाले असून त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे नैसर्गिक नाला पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. माथेरानकडे जाणारी मिनीट्रेन नेरळच्या पाडा भागातून जात असताना स्वामी कंपनीजवळ असलेल्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत असते.पूर्वीपासून वाहत असलेल्या त्या नाल्याचा मार्ग लक्षात घेऊ न रेल्वेने मिनीट्रेन मार्गावर पूल तयार केला आहे, तो पूल शंभर वर्षांपूर्वीचा आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेची मेन लाइन याच भागातून जाते. त्याठिकाणी देखील रेल्वे प्रशासनाने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पूल बांधला आहे. अशी सर्व स्थिती असताना स्वामी कंपनी परिसरात गेली काही वर्षे इमारती बांधल्या जात असून तेथील जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने नैसर्गिक नाला बंद करण्याचा घाट घातला आहे.या नैसर्गिक नाल्याला एवढे प्रचंड पाणी असते की पावसाळ्यात तो नाला कोणालाही ओलांडून जाता येत नाही. त्या नैसर्गिक नाल्यामुळे खरे तर नेरळ पाडा ग्रामस्थ पावसाच्या दिवसात निर्धास्त असतात. मात्र तेथील जमीन विकसित करीत बिल्डरने नैसर्गिक नाला बंद करण्यासाठी अनेक वेळा नाल्यात बांधकाम केले आहे. आतापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीने तब्बल दोन वेळा नैसर्गिक नाल्यात करण्यात आलेले बांधकाम तोडून टाकण्याची कार्यवाही केली आहे. मात्र आता संपूर्ण नाला आपल्या जागेत असल्याच्या अविर्भावात त्या बिल्डरने मातीचा भराव करून काटेरी कुंपण टाकण्याचे काम पूर्ण केले आहे.नैसर्गिक नाल्यात करण्यात आलेला भराव आणि त्यामुळे बंद झालेला नाला यामुळे पावसाचे पाणी परिसरात कुठेही जाऊ शकते, त्याचवेळी नाल्याच्या आसपास असलेल्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेऊन पाडा भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे धाव घेतली असून नैसर्गिक नाला पुन्हा खुला करून देण्याची मागणी केली आहे. येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी नेरळ ग्रामपंचायतीला निवेदन दिले असून नैसर्गिक नाला मोकळा करून देण्याची मागणी केली आहे. त्या निवेदनावर ग्रामस्थ भावेश दळवी, वैभव ठाकूर, सुनील चंचे, अशोक चंचे, सुनील कराळे, नीलेश शिनारे, प्रदीप जोशी, संतोष पवार आदींच्या सह्या आहेत. याच भागात नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री कोकाटे, सदस्य सन्नी चंचे यांचे वास्तव्य आहे, त्यामुळे बंद झालेला नैसर्गिक नाला लवकर खुला होईल अशी सर्व नागरिकांना खात्री आहे.(वार्ताहर)