शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नेरळमध्ये नैसर्गिक नाला बंद !

By admin | Updated: February 1, 2016 01:39 IST

नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील पाडा भागात असलेला नैसर्गिक नाला त्या परिसरात जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने बंद केला आहे.

कर्जत : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील पाडा भागात असलेला नैसर्गिक नाला त्या परिसरात जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने बंद केला आहे. बंद झालेल्या नाल्यामुळे पावसाचे पाणी लोकवस्तीमध्ये घुसण्याची शक्यता आहे. घरादारात पावसाचे पाणी जाण्याच्या भीतीने पाडा ग्रामस्थ हवालदिल झाले असून त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे नैसर्गिक नाला पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. माथेरानकडे जाणारी मिनीट्रेन नेरळच्या पाडा भागातून जात असताना स्वामी कंपनीजवळ असलेल्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत असते.पूर्वीपासून वाहत असलेल्या त्या नाल्याचा मार्ग लक्षात घेऊ न रेल्वेने मिनीट्रेन मार्गावर पूल तयार केला आहे, तो पूल शंभर वर्षांपूर्वीचा आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेची मेन लाइन याच भागातून जाते. त्याठिकाणी देखील रेल्वे प्रशासनाने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पूल बांधला आहे. अशी सर्व स्थिती असताना स्वामी कंपनी परिसरात गेली काही वर्षे इमारती बांधल्या जात असून तेथील जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने नैसर्गिक नाला बंद करण्याचा घाट घातला आहे.या नैसर्गिक नाल्याला एवढे प्रचंड पाणी असते की पावसाळ्यात तो नाला कोणालाही ओलांडून जाता येत नाही. त्या नैसर्गिक नाल्यामुळे खरे तर नेरळ पाडा ग्रामस्थ पावसाच्या दिवसात निर्धास्त असतात. मात्र तेथील जमीन विकसित करीत बिल्डरने नैसर्गिक नाला बंद करण्यासाठी अनेक वेळा नाल्यात बांधकाम केले आहे. आतापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीने तब्बल दोन वेळा नैसर्गिक नाल्यात करण्यात आलेले बांधकाम तोडून टाकण्याची कार्यवाही केली आहे. मात्र आता संपूर्ण नाला आपल्या जागेत असल्याच्या अविर्भावात त्या बिल्डरने मातीचा भराव करून काटेरी कुंपण टाकण्याचे काम पूर्ण केले आहे.नैसर्गिक नाल्यात करण्यात आलेला भराव आणि त्यामुळे बंद झालेला नाला यामुळे पावसाचे पाणी परिसरात कुठेही जाऊ शकते, त्याचवेळी नाल्याच्या आसपास असलेल्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेऊन पाडा भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे धाव घेतली असून नैसर्गिक नाला पुन्हा खुला करून देण्याची मागणी केली आहे. येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी नेरळ ग्रामपंचायतीला निवेदन दिले असून नैसर्गिक नाला मोकळा करून देण्याची मागणी केली आहे. त्या निवेदनावर ग्रामस्थ भावेश दळवी, वैभव ठाकूर, सुनील चंचे, अशोक चंचे, सुनील कराळे, नीलेश शिनारे, प्रदीप जोशी, संतोष पवार आदींच्या सह्या आहेत. याच भागात नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री कोकाटे, सदस्य सन्नी चंचे यांचे वास्तव्य आहे, त्यामुळे बंद झालेला नैसर्गिक नाला लवकर खुला होईल अशी सर्व नागरिकांना खात्री आहे.(वार्ताहर)