शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सेवा योजना : महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी बांधले १० बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 05:12 IST

युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेताना होत असते, तर हे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरु णांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे काम महाविद्यालयीन स्तरावर ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) युवा चळवळीतून होत असते.

- जयंत धुळपअलिबाग : युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेताना होत असते, तर हे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरु णांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे काम महाविद्यालयीन स्तरावर ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एनएसएस) युवा चळवळीतून होत असते. त्याद्वारे युवाशक्ती मोठे कार्य उभे करत असते, हे रायगड जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ६११ युवती आणि ४०० युवक अशा एकूण १ हजार ११ स्वयंसेवकांनी अथक कष्ट करून तब्बल दहा वनराई बंधारे बांधून सिद्ध करून दाखविले आहे. यामध्ये युवती आघाडीवर होत्या, हे विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. परिणामी, यंदाच्या राष्ट्रीय युवक दिनी या सर्व युवक -युवतींच्या मनात जलसंवर्धनाच्या राष्ट्रीय प्रयत्नात आम्हीही कमी नाही, अशी समाधानाची आणि गर्वाची भावना आहे.शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्र मापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढत आहे. त्यास युवा पिढीचा सकारात्म प्रतिसाद लाभत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत असल्याची भावना राष्ट्रीय सेवा योजनेचे रायगड जिल्हा समन्वयक डॉ. एम. एन. वाणी यांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील पाणीसमस्येवर उपाययोजना करण्याकरिता आपणही आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, अशा हेतूने जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाºयांच्या बैठकीत वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई विद्यापीठानेही वनराई बंधारे उपक्रमास प्राधान्य दिले आहे. अलिबागच्या जेएसएम कॉलेजची ५० मुले आणि ४४ मुली, अशा एकूण ४९ एनएसएस स्वयंसेवकांनी अलिबाग जवळच्या मानिभुते येथे, उरण येथील केडी उरण कॉलेजच्या २३ मुले आणि २६ मुली, अशा एकूण ४९ एनएसएस स्वयंसेवकांनी उरण तालुक्यातील पिरकोन येथे, सीकेटी कॉलेज(नवीन पनवेल)ची २५ मुले आणि ९३ मुली, अशा एकूण ११८ एनएसएस स्वयंसेवकांनी पनवेल तालुक्यातील नेरे येथील आदिवासी आश्रमशाळे जवळच्या नदीत, पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या ३२ मुले आणि ५२ मुली, अशा एकूण ८४ एनएसएस स्वयंसेवकांनी पेण तालुक्यातील वाक्रुळ येथे, मुरुडच्या वसंतराव नाईक कॉलेजच्या ३६ मुले आणि ६६ मुली, अशा एकूण १०२ एनएसएस स्वयंसेवकांनी मुरुड जवळच्या तेलवडे गावात, पाली-सुधागड येथील जे.एन.पालीवाला कॉलेजची ४६ मुले आणि १०५ मुली, अशा एकूण १५१ एनएसएस स्वयंसेवकांनी सिद्धेश्वर गावी, रोहा येथील को.ए.सो. देशमुख-ताम्हाणे कॉलेजची ५४ मुले आणि ९९ मुली, अशा एकूण १५३ एनएसएस स्वयंसेवकांनी भागिरती खार येथे, तळा येथील दत्ताजीराव तटकरे कॉलेजची ५५ मुले आणि ५१ मुली, अशा एकूण १०६ एनएसएस स्वयंसेवकांनी खैराट गावी, तळा येथीलच वेदक कॉलेजची ४६ मुले आणि ३१ मुली, अशा एकूण ७७ एनएसएस स्वयंसेवकांनी भागकोंड येथे तर किहिम-चोंढी येथील एलएसपीएम कॉलेजची ३३ मुले आणि ४४ मुली, अशा एकूण ७७ एनएसएस स्वयंसेवकांनी आवास येथे वनराई बंधारे बांधले आहेत.दहा लाख गॅलन पाणी अडविलेया सर्व दहा वनराई बंधा-यांच्या माध्यमातून सुमारे दहा लाख गॅलन पाणी अडविण्यात यश आले आहे. अडवलेले पाणी जमिनीत मुरून बंधाºयांच्या परिसरातील भूजलपातळीत येत्या काळात वाढ होणे अपेक्षित आहे, तर विहिरींच्या पातळीत यंदा लवकर घट होणार नाही, असा अंदाज स्थानिक जाणकार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.महाविद्यालयीन विश्वातील विधायक युवा चळवळडॉ. डी. एस. कोठारी शिक्षण आयोगाने शिक्षणाच्या सर्वच टप्प्यांवर विद्यार्थी समाजसेवेशी जोडला जावा, अशी शिफारस १९६४-६६च्या दरम्यान केली होती. १९६७मध्ये राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या परिषदेत एनसीसी सोबत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) असावी, हे मान्य झाले. त्यानंतर झालेल्या कुलगुरूंच्या परिषदेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वागत होऊन २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तेव्हाचे शिक्षणमंत्री व्ही. के. आर.व्ही. राव यांनी देशातील ३७ विद्यापीठांत प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. आज देशातील सर्व विद्यापीठांतील सर्व महाविद्यालये व लक्षावधी विद्यार्थी या योजनेत सहभागी झाले असून, राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन विश्वातील मोठी विधायक युवा चळवळ बनली आहे.

टॅग्स :Raigadरायगड