शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुरूडची आदिवासी वाडी अंधारात

By admin | Updated: August 29, 2015 22:14 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण होत असतानासुद्घा काही भागात विजेची व्यवस्था पोेहोचलेली नाही. गरीब आदिवासी लोकांच्या निवेदनाकडे विद्युत मंडळाकडून वारंवार दुर्लक्ष होत

आगरदांडा : देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण होत असतानासुद्घा काही भागात विजेची व्यवस्था पोेहोचलेली नाही. गरीब आदिवासी लोकांच्या निवेदनाकडे विद्युत मंडळाकडून वारंवार दुर्लक्ष होत आहे. मुरूड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीत सुतारमाळ आदिवासी वाडी असून इथे २५ ते ३० घरे आदिवासी कुटुंबवस्ती करून राहत आहेत. सुमारे ७० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या सुतारमाळ आदिवासी वाडीला गेली अनेक वर्षे वीज मिळालेली नाही.मुरूड-वावडुंगी ग्रामपंचायत ही १९९२ ला निर्माण झाली आहे व त्याच्या अनेक वर्षांपासून ही कुटुंब या ठिकाणी राहत आहेत. रॉकेलच्या दिव्याखाली येथील लोक रात्र काढीत आहेत. पण काळोखात त्यांना प्रकाश अद्याप सापडत नाही. रात्र ही एवढी काळीकुट्ट असते हेच त्यांना माहित आहे. परंतु वीज नसल्यामुळे मुले येथील मोठ्या श्क्षिणापासून वंचित राहिले आहेत. परंतु महाराष्ट्र वीज मंडळ अजूनपर्यंत त्यांना प्रकाश देण्यास तयार नाही. याबाबत आमच्या प्रतिनिधीने वावडुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित कासार यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, २०११ पासून ग्रामपंचायतचे ठराव देवूनही सुतारमाळ आदिवासी वाडी प्रकाशमय करण्याची मागणी करत आहोत, परंतु वीज मंडळ अधिकारी, परिक्षण करून जातात, मात्र पुन्हा फिरकत नाही. वीजेसाठी सतत पाठपुरावा करीत आहे. वीज मंडळ अधिकारी लोकांच्या अनास्थेमुळे या सुतारमाळ आदिवासी वाडीला वीज मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या बाबत वीज मंडळाचे उपअभियंता लांडगे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तो होऊ शकला नाही. याबाबत लोकप्रतिनिधीनी लक्ष घालावे, अशी मागणी गा्रमस्थांकडून होत आहे. (प्रतिनिधी)