शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

मुरूड तालुका आणखी आठ दिवस अंधारात राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:13 IST

तालुक्यातील वीज गेल्या १२ दिवसांपासून गायब

मुरूड जंजिरा : मुरूड तालुक्यात झालेल्या वादळामुळे वीज मंडळाचे अतोनात नुकसान होऊन ६५० पेक्षा जास्त पोल निकामी तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरसुद्धा निकामी झाले असल्यामुळे तालुक्यातील वीज गेल्या १२ दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे मुरूड तालुक्यातील ७२ गावे व मुरूड शहर अंधारात आहे.अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून येथे तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु तोच न्याय मुरूड तालुक्याला देता आलेला नाही. आज गेल्या अनेक दिवसांपासून हा तालुका अंधारात आहे. त्यामुळे विविध बँका व आर्थिक संस्थांचे कामकाज ठप्प आहे. ज्या ठिकाणी वादळाचा फटका बसला नाही तेथील वीज कर्मचाऱ्यांकडून मुरूडला जास्त कुमक दिली जाईल, असे फक्त आश्वासन दिले गेले.प्रत्यक्षात मात्र ठाणे विभागातून फक्त १५ कर्मचारी आले, त्यातील पाच वयोवृद्ध असल्याने पोल खेचण्याच्या कामात ते मदत करू शकत नाहीत. त्यानंतर मात्र अद्याप तरी कर्मचारी वर्ग न आल्याने मुरूड अंधारातच असून अजून पुढील अनेक दिवस अंधारातच राहणार आहे.मुरूडचे तहसीलदारसुद्धा याचा आढावा घेत नाहीत. वीज अधिकारी सांगतील तेच ग्राह्य मानल्यामुळे वीज येण्यास खूप उशीर होत आहे. लोकप्रतिनिधी वीज मंडळास धारेवर धरत नसल्याने मुरूड तालुक्याला शंभर टक्के वीजपुरवठा होणार नाही हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे लोकांना आणखी काही काळ त्रास सहन करावा लागणार आहे.याबाबत मुरूड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी सांगितले की, पाबरे येथील मुख्य वाहिनी मजबूत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यास मुरूड उपकेंद्रातून सर्व तालुक्याला वीजपुरवठा सुरू करणे सोपे जाणार आहे. विजेचे खांब उभे करण्यासाठी स्थानिक ठेकेदार व डिव्हिजनकडून अतिरिक्त माणसे मागवण्यात आली असून लवकरात लवकर मुरूडला वीजपुरवठा होण्यासाठी आमचे अथक प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :electricityवीज