शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

मुरुड तालुक्यात गाळमुक्त धरण अभियान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:56 IST

धरणातील व तलावातील गाळ काढल्याने पावसाळ्यातील पाणी साठवणूक क्षमता वाढेल

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार या योजनेंतर्गत धरण व तलावातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मुरुड तालुक्यात आठ ठिकाणी ही कामे सुरु आहेत. महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरु केली आहे. कोरडे पडलेले तलाव, धरणातील गाळ काढून तो शेतीत टाकल्यास शेतीची पत सुधारून उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले.

धरणातील व तलावातील गाळ काढल्याने पावसाळ्यातील पाणी साठवणूक क्षमता वाढेल, आणि पाणीटंचाईवर मात करता येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. जमिनीची पाणी क्षमता वाढवण्यासाठी गाळ मुक्त धरण व गाळ युुक्त शिवार ही योजना राबवली जात असून यामध्ये जास्तीत जास्त लोकसहभागातून तालुक्यातील कामे पूर्ण करण्यात येत आहेत. गाळ काढल्यामुळे पाण्याची सिंचन क्षमता वाढणार असून मे अखेर पर्यंत पाणी उपलब्ध होऊन पाणीटंचाईवर मात करता येणार आहे. या योजनेत स्थानिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पाटील यांनी सांगितले. विहूर येथील धरण, सावरोली येथील तलाव, उसरोळी येथील तलाव, मजगाव व शीघ्रे आदी ठिकाणची गाळ काढण्याची कामे सुरु असल्याची माहिती परीक्षित पाटील यांनी दिली. धरणातील व तलावातील गाळ काढल्यानंतर तो फक्त शेतकऱ्यांनाच दिला जात आहे. उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी या कामात मोठा सहभाग घेतला आहे. त्यांनी विहूर व उसरोली येथील तलावातील गाळ काढून हातभार लावला आहे. हा एक उत्कृष्ट उपक्रम असून भविष्यात पाणीटंचाई भासू नाही, असे त्यांनी या वेळी सांगितले.लोकसहभाग वाढल्याने कामास गतीमुरुड तालुक्यात धरण व तलावातील गाळ काढण्याच्या कामाला जोरदार सुरुवात झाली असून लवकरच सर्व कामे पूर्ण होणार आहेत. लोक सहभाग लाभल्याने कामाची गती सुद्धा वाढली आहे. गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढणार असून यांचा मोठा फायदा शेतकरी व ग्रामस्थांना होणार आहे. गाळ काढण्यासाठी शासनाकडून जेसीबीसाठी डिझेल अनुदान दिले जाते.

टॅग्स :Raigadरायगड