शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मुरुड तालुक्यात गाळमुक्त धरण अभियान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:56 IST

धरणातील व तलावातील गाळ काढल्याने पावसाळ्यातील पाणी साठवणूक क्षमता वाढेल

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार या योजनेंतर्गत धरण व तलावातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मुरुड तालुक्यात आठ ठिकाणी ही कामे सुरु आहेत. महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरु केली आहे. कोरडे पडलेले तलाव, धरणातील गाळ काढून तो शेतीत टाकल्यास शेतीची पत सुधारून उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले.

धरणातील व तलावातील गाळ काढल्याने पावसाळ्यातील पाणी साठवणूक क्षमता वाढेल, आणि पाणीटंचाईवर मात करता येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. जमिनीची पाणी क्षमता वाढवण्यासाठी गाळ मुक्त धरण व गाळ युुक्त शिवार ही योजना राबवली जात असून यामध्ये जास्तीत जास्त लोकसहभागातून तालुक्यातील कामे पूर्ण करण्यात येत आहेत. गाळ काढल्यामुळे पाण्याची सिंचन क्षमता वाढणार असून मे अखेर पर्यंत पाणी उपलब्ध होऊन पाणीटंचाईवर मात करता येणार आहे. या योजनेत स्थानिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पाटील यांनी सांगितले. विहूर येथील धरण, सावरोली येथील तलाव, उसरोळी येथील तलाव, मजगाव व शीघ्रे आदी ठिकाणची गाळ काढण्याची कामे सुरु असल्याची माहिती परीक्षित पाटील यांनी दिली. धरणातील व तलावातील गाळ काढल्यानंतर तो फक्त शेतकऱ्यांनाच दिला जात आहे. उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांनी या कामात मोठा सहभाग घेतला आहे. त्यांनी विहूर व उसरोली येथील तलावातील गाळ काढून हातभार लावला आहे. हा एक उत्कृष्ट उपक्रम असून भविष्यात पाणीटंचाई भासू नाही, असे त्यांनी या वेळी सांगितले.लोकसहभाग वाढल्याने कामास गतीमुरुड तालुक्यात धरण व तलावातील गाळ काढण्याच्या कामाला जोरदार सुरुवात झाली असून लवकरच सर्व कामे पूर्ण होणार आहेत. लोक सहभाग लाभल्याने कामाची गती सुद्धा वाढली आहे. गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढणार असून यांचा मोठा फायदा शेतकरी व ग्रामस्थांना होणार आहे. गाळ काढण्यासाठी शासनाकडून जेसीबीसाठी डिझेल अनुदान दिले जाते.

टॅग्स :Raigadरायगड