शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
3
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
4
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
5
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
6
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
7
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
8
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
9
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
10
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
11
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
12
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
13
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
14
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
15
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
16
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
17
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
18
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
19
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
20
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये वीज ग्राहकांकडे साडेसहा कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:51 IST

महावितरण कर्मचाऱ्यांची वसुलीसाठी ग्राहकांच्या घरोघरी पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणाऱ्या मुरुड तालुक्यात २५ हजार ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे तालुक्यात सध्या ६ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. निव्वळ खासगी ग्राहकांचे नाही, तर सरकारी बिलांची थकबाकीही वाढली आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या महावितरणपुढे कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मुरुड तालुक्यात सर्वाधिक २० हजार घरगुती ग्राहक असून, त्याची १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी, व्यावसायिक २ हजार ५०० ग्राहक असून, त्याची ५० लाख रुपये थकबाकी, इतर ग्राहकांची १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी मार्चपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढली आहे. महावितरणकडून वेळोवेळी आवाहन करूनही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने थकबाकीचे आकडे वाढले आहेत. महावितरणची मुरुड तालुक्यातील वीज ग्राहकांकडे ६ कोटी ५० लाख रुपये थकबाकी असल्याने महावितरणने वसुली मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यत ३ कोटी ३५ लाख रुपये वसुली झाले असून, ३ कोटी १५ लाख रुपये थकीत आहेत असल्याचे महावितरणचे उपकार्य अभियंता - सचिन येरेकर यांनी सांगितले. कोरोनामुळे एक वर्षे लॉकडाऊन होता. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायासह सर्वसामान्यांना घरात बसून पोट भरावे लागले. शासनाने कोरोना काळातील विजबिले काही प्रमाणात माफ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ग्राहकांनी विजबील माफ होण्याची वाट पाहत बसल्याने वीज ग्राहकांकडे वर्षापासूनची विजबीले थकीत राहून गेली आहेत. दरम्यान, शासनाने वीजबिले माफ होणार नसल्याची घोषणा केल्यानंतर थकीत वीजबिलधारकांचे वीजबिल भरण्याचे शासनाने आदेश दिले.

आतापर्यंत ५०० वीज कनेक्शन तोडण्यात आलेnबील एकाच वेळी भरणे ग्राहकांना अशक्य असल्याने हप्त्यांमध्ये भरण्याची ग्राहकांना सवलत महावितरणतर्फे देण्यात आली होती. कोरोना काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अखंडित वीजपुरवठा ठेवला होता. nग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहान करूनही वीजबिल भरली जात नसल्याने, महावितरणाचे ७० कर्मचारी रोजच्या रोज वसुलीसाठी घरोघरी जाऊन ग्राहकांना वीजबिल भरण्यास विनवणी करीत आहेत. घरी गेल्यानंतर वीजबिल भरले नाही, तर त्याना पुन्हा त्यांना वेळ दिली जात आहे. nवेळ देऊनही थोडेफार वीजबिल भरणा न केल्याने आतापर्यंत नाईलाजाने ५०० वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. तालुक्यातील वीज ग्राहकांनी लवकरात लवकर वीजबिल भरून महावितरणाला सहकार्य करा, असे आवाहन मुरुड उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड