शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

मुरुडमध्ये वीज ग्राहकांकडे साडेसहा कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:51 IST

महावितरण कर्मचाऱ्यांची वसुलीसाठी ग्राहकांच्या घरोघरी पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणाऱ्या मुरुड तालुक्यात २५ हजार ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे तालुक्यात सध्या ६ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. निव्वळ खासगी ग्राहकांचे नाही, तर सरकारी बिलांची थकबाकीही वाढली आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या महावितरणपुढे कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

मुरुड तालुक्यात सर्वाधिक २० हजार घरगुती ग्राहक असून, त्याची १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी, व्यावसायिक २ हजार ५०० ग्राहक असून, त्याची ५० लाख रुपये थकबाकी, इतर ग्राहकांची १ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी मार्चपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीची रक्कम वाढली आहे. महावितरणकडून वेळोवेळी आवाहन करूनही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने थकबाकीचे आकडे वाढले आहेत. महावितरणची मुरुड तालुक्यातील वीज ग्राहकांकडे ६ कोटी ५० लाख रुपये थकबाकी असल्याने महावितरणने वसुली मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यत ३ कोटी ३५ लाख रुपये वसुली झाले असून, ३ कोटी १५ लाख रुपये थकीत आहेत असल्याचे महावितरणचे उपकार्य अभियंता - सचिन येरेकर यांनी सांगितले. कोरोनामुळे एक वर्षे लॉकडाऊन होता. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायासह सर्वसामान्यांना घरात बसून पोट भरावे लागले. शासनाने कोरोना काळातील विजबिले काही प्रमाणात माफ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ग्राहकांनी विजबील माफ होण्याची वाट पाहत बसल्याने वीज ग्राहकांकडे वर्षापासूनची विजबीले थकीत राहून गेली आहेत. दरम्यान, शासनाने वीजबिले माफ होणार नसल्याची घोषणा केल्यानंतर थकीत वीजबिलधारकांचे वीजबिल भरण्याचे शासनाने आदेश दिले.

आतापर्यंत ५०० वीज कनेक्शन तोडण्यात आलेnबील एकाच वेळी भरणे ग्राहकांना अशक्य असल्याने हप्त्यांमध्ये भरण्याची ग्राहकांना सवलत महावितरणतर्फे देण्यात आली होती. कोरोना काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अखंडित वीजपुरवठा ठेवला होता. nग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहान करूनही वीजबिल भरली जात नसल्याने, महावितरणाचे ७० कर्मचारी रोजच्या रोज वसुलीसाठी घरोघरी जाऊन ग्राहकांना वीजबिल भरण्यास विनवणी करीत आहेत. घरी गेल्यानंतर वीजबिल भरले नाही, तर त्याना पुन्हा त्यांना वेळ दिली जात आहे. nवेळ देऊनही थोडेफार वीजबिल भरणा न केल्याने आतापर्यंत नाईलाजाने ५०० वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. तालुक्यातील वीज ग्राहकांनी लवकरात लवकर वीजबिल भरून महावितरणाला सहकार्य करा, असे आवाहन मुरुड उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड