शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
4
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
5
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
6
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
7
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
8
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
11
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
12
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
13
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
14
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
15
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
16
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
17
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
18
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
19
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
20
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला

धुळीत हरवला मुंबई-गोवा महामार्ग; गणेशोत्सवापूर्वी उपाययोजनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 06:21 IST

पेण ते वडखळपर्यंत महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे पेणच्या सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला गेले वर्षभर सामोरे जावे लागले आहे.

पेण : येथील खारपाडा-जिते गावापासून ते थेट वडखळ-डोलवी गावापर्यंत १९ किमी अंतरावरील टप्प्यात कडक पडत असलेल्या उन्हात महामार्गावर धुळीचे लोट वाहने चालवताना उडत आहेत. या धुळीचा वाहनचालक, प्रवासी, शालेय विद्यार्थी यांना त्रास होत आहे. यामुळे सर्दी, खोकला, श्वसनाशी संबंधित आजारात वाढ झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर धूळमिश्रित वातावरण गेले पाच, सहा दिवस सुरू आहे. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला याचे सोयरसुतक नाही. यामुळे प्रवासी, वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत असून यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.आरोग्याला बाधा आणणारे वातावरण महत्त्वाच्या अशा या मुंबई-गोवा महामार्गावर आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना महामार्गावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला याबाबत नागरिकांकडून उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे.पेण ते वडखळपर्यंत महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे पेणच्या सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला गेले वर्षभर सामोरे जावे लागले आहे. वीकेंडला होणारी वाहतूककोंडी असो, अपघात असो वा ऐन पावसाळ्यात सुरू केलेला पेण शहराच्या समोरील मातीचा भराव. रेल्वे स्थानकासमोरचा पूल, रामवाडी पूल या कामामुळे महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने जनतेला वेठीस धरले होते. या त्रासात या धुळीने भर घातल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.महामार्गावरील धुळीच्या उडणाºया लोटामुळे वाहतूक ही मंद गतीने सुरू आहे. समोरचे वाहन धुळीच्या लोटांमुळे नीट दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अशा या परिस्थितीत वाहतूक पोलीस यंत्रणा व्यस्त आहे. धुळीच्या त्रासामुळे होणारे आजार व आर्थिक भुर्दंड जनतेला सोसावा लागत आहे. यासाठी आता जनतेलाच पुढे येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागणार आहे.वाहनचालकांना करावी लागतेय कसरतकार्लेखिंड : मुंबई - गोवा महामार्गावरील रस्त्यावरील धुळीमुळे प्रवासी हैराण होत आहेत. प्रवाशांबरोबरच आजूबाजूची घरे, दुकाने आणि हॉटेल्स यांना सुद्धा हा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग असो किंवा राज्यमार्ग असो सर्व रस्त्यावरील अवस्था सध्या स्थितीला हीच आहे. चालू पावसाळ्यात मुंबई - गोवा महामार्गावर तरणखोप ते वडखोप खड्ड्यांचा विळखा पडला आहे. या खड्ड्यांतून वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे आणि त्याचबरोबर अपघात होत आहेत. यावर उपाय म्हणून खड्डे भरण्याचे काम सतत चालू आहे. चालू पावसात खड्ड्यात मातीमिश्रित खडी टाकली जाते आणि खड्डे भरले जातात, परंतु तेच खड्डे पुन्हा पुन्हा तयार होत आहेत.पावसाने विश्रांती घेतल्याने कडक ऊन पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरील मातीचे रूपांतर धुळीत झाले आहे. अवजड वाहने सतत वेगाने चालू असल्याने रस्त्यावरील धुळीचा डोंब अगदी धुक्यासारखा होत आहे. या धुळीमुळे समोरचे वाहन सुद्धा दिसत नाही. परंतु या धुळीचा त्रास सर्व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. तसेच महामार्ग किंवा रस्त्यालगतची घरे, दुकाने आणि हॉटेल्स यांना सुद्धा या धुळीला सामोरे जावे लागत आहे. या धुळीमुळे सर्वांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.