शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या नुकसानीचा खासदारांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:38 IST

अवकाळीचा फटका; कर्जतमध्ये ३,९२४ हेक्टर शेतीचे नुकसान

कर्जत : अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतला. शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कर्जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे कर्जत तहसील कार्यालयात पोहोचले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, विधानसभा संघटक संतोष भोईर, रोहिदास मोरे, दशरथ भगत, मोहन ओसवाल, संतोष पाटील, सुरेश बोराडे, शिवराम बदे आदी उपस्थित होते. शासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, महसूल नायब तहसीलदार संजय भालेराव उपस्थित होते.तालुक्यात १८६ गावे आहेत, १८,०५२ हेक्टर शेतजमीन आहे, त्यापैकी पेरणी झालेले क्षेत्र ८,९९० हेक्टर होते. अवकाळी पावसामुळे कापणी करून ठेवलेले भात भिजले आणि खराब झाले. शेतात पाणी साचल्याने सपूर्ण पीक खराब झाले तर काहींवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला.जुलै व आॅगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ३,३३२ शेतकऱ्यांचे ९८२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, तर सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये १०,०४६ शेतकºयांचे २,९४२ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. तालुक्यात एकूण १३ हजार ३७८ शेतकºयांचे ३,९२४ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.तलाठी, पंचायत समिती कार्यालयातील ग्रामसेवक आणि तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहायक तीनही कार्यालयाने एकत्रित पंचनामे केले आहेत. सर्व पंचनामे पूर्ण झाले असून याबाबतची माहिती शासनाला कळवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.खासदार श्रीरंग बारणे यांनी, बाधित शेतकºयांना मदत मिळालीच पाहिजे, क्षेत्राची मर्यादा न ठेवता सरसकट नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, असे सांगितले. सर्व शेतकºयांनी पीक विमा काढला पाहिजे, यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी जनजागृती अभियान राबवावे, अशा सूचना केल्या.कर्जत तालुका आदिवासी बहूल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात अनेक आदिवासी बांधव वनविभाग किंवा शासकीय जागेत नाचणी, वरीचे पीक घेतात. त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अशा व्यक्तींना विशेष बाब म्हणून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे बारणे यांनी सांगितले.