शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

शेतीच्या नुकसानीचा खासदारांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:38 IST

अवकाळीचा फटका; कर्जतमध्ये ३,९२४ हेक्टर शेतीचे नुकसान

कर्जत : अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतला. शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कर्जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे कर्जत तहसील कार्यालयात पोहोचले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, विधानसभा संघटक संतोष भोईर, रोहिदास मोरे, दशरथ भगत, मोहन ओसवाल, संतोष पाटील, सुरेश बोराडे, शिवराम बदे आदी उपस्थित होते. शासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, महसूल नायब तहसीलदार संजय भालेराव उपस्थित होते.तालुक्यात १८६ गावे आहेत, १८,०५२ हेक्टर शेतजमीन आहे, त्यापैकी पेरणी झालेले क्षेत्र ८,९९० हेक्टर होते. अवकाळी पावसामुळे कापणी करून ठेवलेले भात भिजले आणि खराब झाले. शेतात पाणी साचल्याने सपूर्ण पीक खराब झाले तर काहींवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला.जुलै व आॅगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ३,३३२ शेतकऱ्यांचे ९८२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, तर सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये १०,०४६ शेतकºयांचे २,९४२ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. तालुक्यात एकूण १३ हजार ३७८ शेतकºयांचे ३,९२४ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.तलाठी, पंचायत समिती कार्यालयातील ग्रामसेवक आणि तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहायक तीनही कार्यालयाने एकत्रित पंचनामे केले आहेत. सर्व पंचनामे पूर्ण झाले असून याबाबतची माहिती शासनाला कळवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.खासदार श्रीरंग बारणे यांनी, बाधित शेतकºयांना मदत मिळालीच पाहिजे, क्षेत्राची मर्यादा न ठेवता सरसकट नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, असे सांगितले. सर्व शेतकºयांनी पीक विमा काढला पाहिजे, यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी जनजागृती अभियान राबवावे, अशा सूचना केल्या.कर्जत तालुका आदिवासी बहूल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात अनेक आदिवासी बांधव वनविभाग किंवा शासकीय जागेत नाचणी, वरीचे पीक घेतात. त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अशा व्यक्तींना विशेष बाब म्हणून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे बारणे यांनी सांगितले.