शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

एलईडी फिशिंगमुळे पारंपरिक मासेमारीला धोका , कोळी बांधवांचा बोडणी येथील सभेत आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 03:06 IST

केंद्र आणि राज्य सरकारने ‘एलईडी लाइट फिशिंग’वर कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा पारंपरिक मच्छीमारी करणारे कोळी बांधव अत्यंत उग्रआंदोलन पुकारतील आणि त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असा संतप्त इशारा उरण, अलिबाग, मुरुड, रेवस-बोडणी येथील कोळी बांधवांनी बोडणी येथे झालेल्या मच्छीमार सहकारी संस्था प्रतिनिधींच्या सभेत दिला आहे.

अलिबाग : केंद्र आणि राज्य सरकारने ‘एलईडी लाइट फिशिंग’वर कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा पारंपरिक मच्छीमारी करणारे कोळी बांधव अत्यंत उग्रआंदोलन पुकारतील आणि त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असा संतप्त इशारा उरण, अलिबाग, मुरुड, रेवस-बोडणी येथील कोळी बांधवांनी बोडणी येथे झालेल्या मच्छीमार सहकारी संस्था प्रतिनिधींच्या सभेत दिला आहे. या संदर्भातील निवेदने लवकरच जिल्हाधिकाºयांना देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.मोठ्या मच्छीमारी ट्रॉलर्सच्या माध्यमातून समुद्रात मच्छीमारी करताना आता, या ट्रॉलर्सवर बसविण्यात आलेल्या मोठ्या जनरेटरच्या माध्यमातून ट्रॉलर्सच्या पाण्यातील भागाला एलईडी लाइट लावण्यात आले आहेत. हे लाइट लावल्यावर समुद्रातील छोटी-मोठी मासळी या लाइटना आकर्षित होते आणि जाळ््यात मोठ्या प्रमाणात अडकतात; परंतु या एलईडी लाइट मच्छीमारी तंत्रामुळे उरण, अलिबाग, मुरुड, रेवस, बोडणी येथील समुद्रातील माशांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. परिणामी, या परिसरात मासळीचा दुष्काळ निर्माण होऊन पारंपरिक मच्छीमार बांधवांवर उपासमारीचीच पाळी आली असल्याची परिस्थिती मल्हारी मार्तंड मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने रेवस-बोडणी येथील साईबाबा मंदिराच्या पटांगणात आयोजित सभेत विशद करण्यात आली.सभेला रेवस-बोडणी मच्छीमार संस्थेचे चेअरमन विश्वास नाखवा, व्हाइस चेअरमन बाळनाथ कोळी, महाराष्टÑ मच्छीमार कृती समितीचे सेक्रेटरी उल्हास वाटकरे, जिल्हा कार्याध्यक्ष बी. एन. कोळी, शिवदास नाखवा (करंजा), खलाशी संघटना अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे, जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी, राजेंद्र कोळी, गैनी नाखवा (बोडणी), थळ मच्छीमार सोसायटीचे चेअरमन देवेश साखरकर, वरसोली सोसायटी चेअरमन धर्मा घाटकर, सासवणे मच्छीमार सोसायटीचे चेअरमन एकनाथ नाखवा, अलिबाग, मुरुड, उरण, रेवस, बोडणी येथील कोळी बांधव उपस्थित होते.दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बोटी नांगरल्याएलईडी लाइट फिशिंगमुळे पारंपरिक मासेमारी पूर्णपणे धोक्यात आली असून, रेवस-बोडणीच्या समुद्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने येथील कोळी बांधवांनी आपल्या बोटी बंदरात नांगरून ठेवल्या आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे, याची दखल शासनाने वेळीच घेऊन याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी या सभेत कोळी बांधवांकडून करण्यात आली.

टॅग्स :fishermanमच्छीमारRaigadरायगड