शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:03 IST

निर्णय होईपर्यंत मागे घेण्यास नकार : पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या

नागोठणे : येथील रिलायन्सच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी तसेच ६ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या शांतता मोर्चात ३४ जणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने समितीचे राज्य संघटक राजेंद्र गायकवाड तसेच स्थानिक पदाधिकारी शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो प्रकल्पग्रस्तांचा नागोठणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सकाळी साडेअकरा वाजल्यापासून रणरणत्या उन्हात बसलेल्या प्रकल्पग्रस्तांनी ‘गुन्हे मागे घ्या, अन्यथा आम्हाला अटक करा’ असा ठाम निर्णय घेतला. मात्र सायंकाळपर्यंत पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन चालूच ठेवण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या अखत्यारीतील स्थानिक लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी सकाळी ११ वाजता एसटी बस स्थानक ते पोलीस ठाणे अशी प्रकल्पग्रस्तांची रॅली काढून पोलीस ठाण्यासमोर हात जोडो आंदोलन सुरू करण्यात आले.संघटक राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे, चेतन जाधव, सुरेश कोकाटे आदींसह शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.या आंदोलनात कोणत्याही नेत्याने राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याची कुंडली बाहेर काढू, असा इशारा राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणात दिला. रिलायन्सने आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करून आमच्या प्रकल्पग्रस्तांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या काळातील कामगारांचा पगार दोन दिवसांत दिला जाईल, असा रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शब्द दिला होता. मात्र, दोन महिने उलटूनही रिलायन्स शब्दाला जागली नसल्याची खंत गायकवाड यांनीव्यक्त केली.प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हा मागे घ्याच्जोडे मारो आंदोलनातील प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हा जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी,च्निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्यात दिवसभरात दोन वेळा पोलीस ठाण्यात चर्चा होऊनही कोणताही निर्णय घेण्यात यश आले नसल्याने सायंकाळपर्यंत आंदोलनकर्त्यांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालूच राहिले होते. यात महिलांची उपस्थितीही लक्षणीयहोती.आंदोलन ३ आॅक्टोबरपर्यंत स्थगित : आठ तास रिलायन्स प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर सव्वासात नंतर प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारी आणि रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे नेते यांच्यात ३ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता अलिबागला बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन ३ आॅक्टोबरपर्यंत स्थगित केले. याबाबतची माहिती संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड