शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:03 IST

निर्णय होईपर्यंत मागे घेण्यास नकार : पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या

नागोठणे : येथील रिलायन्सच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी तसेच ६ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या शांतता मोर्चात ३४ जणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने समितीचे राज्य संघटक राजेंद्र गायकवाड तसेच स्थानिक पदाधिकारी शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो प्रकल्पग्रस्तांचा नागोठणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सकाळी साडेअकरा वाजल्यापासून रणरणत्या उन्हात बसलेल्या प्रकल्पग्रस्तांनी ‘गुन्हे मागे घ्या, अन्यथा आम्हाला अटक करा’ असा ठाम निर्णय घेतला. मात्र सायंकाळपर्यंत पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन चालूच ठेवण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या अखत्यारीतील स्थानिक लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी सकाळी ११ वाजता एसटी बस स्थानक ते पोलीस ठाणे अशी प्रकल्पग्रस्तांची रॅली काढून पोलीस ठाण्यासमोर हात जोडो आंदोलन सुरू करण्यात आले.संघटक राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे, चेतन जाधव, सुरेश कोकाटे आदींसह शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.या आंदोलनात कोणत्याही नेत्याने राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याची कुंडली बाहेर काढू, असा इशारा राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणात दिला. रिलायन्सने आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करून आमच्या प्रकल्पग्रस्तांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या काळातील कामगारांचा पगार दोन दिवसांत दिला जाईल, असा रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शब्द दिला होता. मात्र, दोन महिने उलटूनही रिलायन्स शब्दाला जागली नसल्याची खंत गायकवाड यांनीव्यक्त केली.प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हा मागे घ्याच्जोडे मारो आंदोलनातील प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हा जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी,च्निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्यात दिवसभरात दोन वेळा पोलीस ठाण्यात चर्चा होऊनही कोणताही निर्णय घेण्यात यश आले नसल्याने सायंकाळपर्यंत आंदोलनकर्त्यांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालूच राहिले होते. यात महिलांची उपस्थितीही लक्षणीयहोती.आंदोलन ३ आॅक्टोबरपर्यंत स्थगित : आठ तास रिलायन्स प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर सव्वासात नंतर प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारी आणि रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे नेते यांच्यात ३ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता अलिबागला बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन ३ आॅक्टोबरपर्यंत स्थगित केले. याबाबतची माहिती संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड