शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:03 IST

निर्णय होईपर्यंत मागे घेण्यास नकार : पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या

नागोठणे : येथील रिलायन्सच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी तसेच ६ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या शांतता मोर्चात ३४ जणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने समितीचे राज्य संघटक राजेंद्र गायकवाड तसेच स्थानिक पदाधिकारी शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो प्रकल्पग्रस्तांचा नागोठणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सकाळी साडेअकरा वाजल्यापासून रणरणत्या उन्हात बसलेल्या प्रकल्पग्रस्तांनी ‘गुन्हे मागे घ्या, अन्यथा आम्हाला अटक करा’ असा ठाम निर्णय घेतला. मात्र सायंकाळपर्यंत पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन चालूच ठेवण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या अखत्यारीतील स्थानिक लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी सकाळी ११ वाजता एसटी बस स्थानक ते पोलीस ठाणे अशी प्रकल्पग्रस्तांची रॅली काढून पोलीस ठाण्यासमोर हात जोडो आंदोलन सुरू करण्यात आले.संघटक राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे, चेतन जाधव, सुरेश कोकाटे आदींसह शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.या आंदोलनात कोणत्याही नेत्याने राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याची कुंडली बाहेर काढू, असा इशारा राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणात दिला. रिलायन्सने आंदोलन दडपण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करून आमच्या प्रकल्पग्रस्तांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या काळातील कामगारांचा पगार दोन दिवसांत दिला जाईल, असा रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शब्द दिला होता. मात्र, दोन महिने उलटूनही रिलायन्स शब्दाला जागली नसल्याची खंत गायकवाड यांनीव्यक्त केली.प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हा मागे घ्याच्जोडे मारो आंदोलनातील प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हा जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी,च्निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्यात दिवसभरात दोन वेळा पोलीस ठाण्यात चर्चा होऊनही कोणताही निर्णय घेण्यात यश आले नसल्याने सायंकाळपर्यंत आंदोलनकर्त्यांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालूच राहिले होते. यात महिलांची उपस्थितीही लक्षणीयहोती.आंदोलन ३ आॅक्टोबरपर्यंत स्थगित : आठ तास रिलायन्स प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर सव्वासात नंतर प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारी आणि रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे नेते यांच्यात ३ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता अलिबागला बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन ३ आॅक्टोबरपर्यंत स्थगित केले. याबाबतची माहिती संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड