शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मर्क्सचा प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली, ९०० स्थानिक कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:18 IST

कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या गंभीर प्रकारानंतर (मर्क्स) बहुराष्ट्रीय कंपनीने उरण-पनवेल परिसरात सुरू असलेले तीनही प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

- मधुकर ठाकूरउरण  - कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या गंभीर प्रकारानंतर (मर्क्स) बहुराष्ट्रीय कंपनीने उरण-पनवेल परिसरात सुरू असलेले तीनही प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मर्क्सने प्रकल्प बंद केल्यास या ठिकाणी काम करणाºया सुमारे ९०० स्थानिक कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे.उरण-पनवेल येथील एपीएम (मर्क्स) कंपनीत काम करणाºया १४३ कामगारांना कंपनीने कामावरून कमी केले आहे. केंद्राने लागू केलेले डीपीडी धोरण आणि कामगार काम करीत नसल्याने तेच काम इतर कामगारांकडून जादा मोबदला मोजून कंपनीला करावे लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. डीपीडी धोरणामुळे थेट मालाची वाहतूक होत असल्याने काम कमी झाले आहे, त्यामुळे काम कमी झाल्याचे कारण देत एपीएमने (मर्क्स) उरण प्रकल्पातील ९९ आणि पनवेलमधील ४४ अशा एकूण १४३ कामगारांना कामावरून कमी केले आहे. या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात संघर्ष सुरू आहे.कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी केंद्र, राज्य सरकारचे अनेक मंत्री, कामगार प्रतिनिधी यांच्या कंपनी अधिकाºयांशी भेटीगाठी आणि चर्चा झाल्या. मात्र, चर्चेनंतरही आश्वासनाशिवाय कामगारांच्या हाती काहीएक लागले नाही. त्यानंतर भाजपाचे महेश बालदी आणि सेनेचे राजिप सदस्य विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आले. यात उरण येथे कंपनीच्या बसची तोडफोड करीत कर्मचारी आणि अधिकाºयांना मारहाण करण्यात आली. दुसºयांदा घडलेल्या या घटनेचा कंपनी व्यवस्थापनाने निषेध केला. इतक्यावर न थांबता बहुराष्ट्रीय एपीएम (मर्क्स) कंपनीने या घटनेची केंद्र सरकार, राज्य सरकार, दूतावास आणि मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली. चर्चेत कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेणे शक्य नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. त्याशिवाय कामगारांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने यापुढे दहशतीत कंपनीचे कामकाज चालविणे अवघड झाल्याचेही व्यवस्थापनाने निदर्शनास आणून दिले.कामगारांची दिशाभूलकंपनी व्यवस्थापनाने कामगारांबाबत भूमिका स्पष्ट केली असतानाही स्थानिक राजकीय पुढाºयांकडून कामगारांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना आंदोलन, मारहाण करण्यास उकसवण्यात येत आहे. वारंवार घडणाºया हल्ल्यांमुळे उरणमधील तीनही कंपन्या बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मर्क्सने तीनही प्रकल्प बंद केल्यास सुमारे ९०० स्थानिक कामगारांत कायमस्वरूपी बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड