शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मर्क्सचा प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली, ९०० स्थानिक कामगारांवर बेरोजगारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:18 IST

कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या गंभीर प्रकारानंतर (मर्क्स) बहुराष्ट्रीय कंपनीने उरण-पनवेल परिसरात सुरू असलेले तीनही प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

- मधुकर ठाकूरउरण  - कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या गंभीर प्रकारानंतर (मर्क्स) बहुराष्ट्रीय कंपनीने उरण-पनवेल परिसरात सुरू असलेले तीनही प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मर्क्सने प्रकल्प बंद केल्यास या ठिकाणी काम करणाºया सुमारे ९०० स्थानिक कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे.उरण-पनवेल येथील एपीएम (मर्क्स) कंपनीत काम करणाºया १४३ कामगारांना कंपनीने कामावरून कमी केले आहे. केंद्राने लागू केलेले डीपीडी धोरण आणि कामगार काम करीत नसल्याने तेच काम इतर कामगारांकडून जादा मोबदला मोजून कंपनीला करावे लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. डीपीडी धोरणामुळे थेट मालाची वाहतूक होत असल्याने काम कमी झाले आहे, त्यामुळे काम कमी झाल्याचे कारण देत एपीएमने (मर्क्स) उरण प्रकल्पातील ९९ आणि पनवेलमधील ४४ अशा एकूण १४३ कामगारांना कामावरून कमी केले आहे. या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात संघर्ष सुरू आहे.कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी केंद्र, राज्य सरकारचे अनेक मंत्री, कामगार प्रतिनिधी यांच्या कंपनी अधिकाºयांशी भेटीगाठी आणि चर्चा झाल्या. मात्र, चर्चेनंतरही आश्वासनाशिवाय कामगारांच्या हाती काहीएक लागले नाही. त्यानंतर भाजपाचे महेश बालदी आणि सेनेचे राजिप सदस्य विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आले. यात उरण येथे कंपनीच्या बसची तोडफोड करीत कर्मचारी आणि अधिकाºयांना मारहाण करण्यात आली. दुसºयांदा घडलेल्या या घटनेचा कंपनी व्यवस्थापनाने निषेध केला. इतक्यावर न थांबता बहुराष्ट्रीय एपीएम (मर्क्स) कंपनीने या घटनेची केंद्र सरकार, राज्य सरकार, दूतावास आणि मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली. चर्चेत कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेणे शक्य नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. त्याशिवाय कामगारांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने यापुढे दहशतीत कंपनीचे कामकाज चालविणे अवघड झाल्याचेही व्यवस्थापनाने निदर्शनास आणून दिले.कामगारांची दिशाभूलकंपनी व्यवस्थापनाने कामगारांबाबत भूमिका स्पष्ट केली असतानाही स्थानिक राजकीय पुढाºयांकडून कामगारांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना आंदोलन, मारहाण करण्यास उकसवण्यात येत आहे. वारंवार घडणाºया हल्ल्यांमुळे उरणमधील तीनही कंपन्या बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मर्क्सने तीनही प्रकल्प बंद केल्यास सुमारे ९०० स्थानिक कामगारांत कायमस्वरूपी बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड