शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:53 IST

कागदावरच्या नाही तर, शब्दावरच्या आश्वासनाचा स्वीकार करीत बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन कृती समितीने आपले आंदोलन स्थगित केले.

अलिबाग : कागदावरच्या नाही तर, शब्दावरच्या आश्वासनाचा स्वीकार करीत बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन कृती समितीने आपले आंदोलन स्थगित केले. प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. यासाठी पेण ते अलिबाग असा पायी प्रवास आंदोलक शेतकºयांनी केला. सिडकोकडे पुनर्वसनाची मागणी असल्याने मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठकीचे आयोजन करून प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.बाळगंगा धरणासाठी सिडकोने जमिनी संपादित केल्या आहेत. त्यामुळे सिडकोनेच आमचे पुनर्वसन करावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांची होती. सिडकोप्रमाणे पुनर्वसन झाल्यास शेतकºयांच्या जमिनीला चांगला दर मिळेल, तसेच साडेबारा टक्के जमिनीचा मोबदलाही मिळणार असल्याने शेतकरी या मागणीवर ठाम आहेत. यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन कृती समितीच्या झेंड्याखाली शेतकरी संघटित झाले. त्यांनी बुधवारपासून पेण ते अलिबाग असा पायी प्रवास सुरू केला होता. त्यांचा निघालेला मोर्चा दुपारी १२.३० च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धडकला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना तेथेच रोखले. त्यानंतर मोर्चाचे तेथेच सभेत रूपांतर झाले. सिडको बाळगंगा धरणाचे पाणी विविध उद्योजकांना विकून त्यावर गब्बर होणार आहे. धरणासाठी जमिनी पेण तालुक्यातील शेतकºयांची त्यांना या पाण्याचा काहीच उपयोग होणार नसल्याचे शेकापचे आ. सुभाष पाटील यांनी सांगितले. शेतकºयांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळत नाही आणि त्यांचे संपूर्ण पुनवर्सन होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेकापचेच आ. धैर्यशील पाटील यांनीही सिडकोसह सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा धिक्कार केला. सिडकोनेच प्रकल्पग्रस्त शेतकºयांचे पुनर्वसन करावे आणि जादा मोबदला द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा सुरू होती. त्याचवेळी जयंत पाटील यांच्यासोबत मंत्री चंद्रकांत पाटील होते. सिडकोमार्फत पुनर्वसन पाहिजे असल्याने हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे ५ ते १२ मार्च दरम्यान मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन विषय मिटवून टाकतो, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांना दिले. हे संभाषण सुरू असताना मंत्री पाटील यांच्या परवानगीने शेतकºयांसाठी ध्वनिक्षेपकावरून आंदोलकांना ऐकून दाखवले. त्यानंतर आंदोलनात सामील झालेल्या गावा-गावातील प्रमुख प्रतिनिधींसोबत धैर्यशील पाटील यांनी चर्चा केली. चर्चेनंतर आंदोलन स्थगित करत असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन भूमिका मांडली.सरकारच्या शब्दावर विश्वास - दिवेकर१मंत्र्यांच्या आश्वासनावरच आंदोलन स्थगित करायचे होते तर, याबाबत मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याची काय गरज होती, अशी कुजबुज आंदोलनाच्या ठिकाणी ऐकायला मिळाली. याबाबत शेकापचे नेते महादेव दिवेकर यांना विचारणा केली असता, कागदावर विश्वास ठेवण्यापेक्षा या सरकारच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला आहे. या आधीच्या सरकारने तीन वेळा आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. विद्यमान सरकारकडे पेण तालुक्यातील पाणीपुरवठ्यासाठी ४० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यांनी तातडीने ३० कोटी रुपये देऊ केले. पाण्याच्या मागणीवरही या सरकारने आम्हाला शब्दच दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला. त्यामुळे कागदावर विश्वास ठेवण्यापेक्षा शब्दावर विश्वास ठेवण्यात आल्याचे दिवेकर यांनी स्पष्ट केले.२जिल्हास्तरावर बाळगंगा धरणाबाबत काही प्रश्न असल्यास ते येथेच सोडवण्यात येतील. ३ मार्च रोजी आंदोलकांना बैठकीसाठी बोलावले असल्याचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बाळगंगा धरणाच्या प्रश्नाबाबत जिल्हास्तरावर महिन्याला बैठक घेण्यात येऊन आढावा घेण्यात येत आहे. त्या उपरही जिल्हास्तरावरील काही प्रश्न असतील तर, ते सोडवण्यासाठी मी तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.