शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

मोरबे धरण क्षेत्रातील शेती उद्ध्वस्त

By admin | Updated: August 8, 2016 02:35 IST

रायगड जिल्ह्यात चौकजवळील हातनोली गावातील शेतपीक नवी मुंबई महानगरपालिका धरण प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहे

अमोल पाटील, खालापूररायगड जिल्ह्यात चौकजवळील हातनोली गावातील शेतपीक नवी मुंबई महानगरपालिका धरण प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चांगलाच संकटात सापडला आहे.चौक येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १९८९ मध्ये मोरबे धरण बांधण्यात आले. त्यानंतर हे धरण नवी मुंबई महानगरपालिकेला विकण्यात आले. धरणासाठी जागा संपादित करताना चौक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात घेण्यात आल्या होत्या. यावेळी धरणग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या, १२ टक्के भूखंड देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या मागण्या अजूनही प्रलंबितच आहेत. धरणाच्या बाधित क्षेत्रापासून काही भूखंड मोकळे आहेत. त्याठिकाणी शेतकऱ्यांकडून भातपीक, भाजीपाल्यांची लागवड केली जाते. या पिकावरच बाधित शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या शेतकऱ्यांनी याठिकाणी काकडीचे पीक लावले आहे. चांगले पीक यावे म्हणून कुटुंबासह गेली दोन महिने भरपावसात मेहनत घेत आहेत. मात्र शुक्रवारी धरण प्रशासनाने काकडी पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे धरणग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. धरण क्षेत्र परिसरातील ही जमीन ओसाड पडून होती. त्यामुळे धरणग्रस्त बाधित शेतकऱ्यांनी याठिकाणी पीक घेण्यास सुरुवात केली. धरणासाठी सरकारने जमीन कवडीमोल भावाने घेतली आणि धरण बांधल्यावर उर्वरित जमीन तशीच पडून आहे. ही जमीन शेतकऱ्यांना परत करावी, इतकेच नव्हे तर काकडी पिकाच्या झालेल्या नुकसानीचीही भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमदार मनोहर भोईर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. यावेळी जि. प. सदस्य सुरेखा ठोंबरे, उपसभापती श्यामसुंदर साळवी, माजी सदस्य मोतीराम ठोंबरे आदी उपस्थित होते. धरण प्रशासन अधिकाऱ्यांचा निषेध करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत दिलासा दिला. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले.