शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

मोरबे धरण क्षेत्रातील शेती उद्ध्वस्त

By admin | Updated: August 8, 2016 02:35 IST

रायगड जिल्ह्यात चौकजवळील हातनोली गावातील शेतपीक नवी मुंबई महानगरपालिका धरण प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहे

अमोल पाटील, खालापूररायगड जिल्ह्यात चौकजवळील हातनोली गावातील शेतपीक नवी मुंबई महानगरपालिका धरण प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चांगलाच संकटात सापडला आहे.चौक येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १९८९ मध्ये मोरबे धरण बांधण्यात आले. त्यानंतर हे धरण नवी मुंबई महानगरपालिकेला विकण्यात आले. धरणासाठी जागा संपादित करताना चौक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात घेण्यात आल्या होत्या. यावेळी धरणग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या, १२ टक्के भूखंड देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या मागण्या अजूनही प्रलंबितच आहेत. धरणाच्या बाधित क्षेत्रापासून काही भूखंड मोकळे आहेत. त्याठिकाणी शेतकऱ्यांकडून भातपीक, भाजीपाल्यांची लागवड केली जाते. या पिकावरच बाधित शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या शेतकऱ्यांनी याठिकाणी काकडीचे पीक लावले आहे. चांगले पीक यावे म्हणून कुटुंबासह गेली दोन महिने भरपावसात मेहनत घेत आहेत. मात्र शुक्रवारी धरण प्रशासनाने काकडी पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे धरणग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. धरण क्षेत्र परिसरातील ही जमीन ओसाड पडून होती. त्यामुळे धरणग्रस्त बाधित शेतकऱ्यांनी याठिकाणी पीक घेण्यास सुरुवात केली. धरणासाठी सरकारने जमीन कवडीमोल भावाने घेतली आणि धरण बांधल्यावर उर्वरित जमीन तशीच पडून आहे. ही जमीन शेतकऱ्यांना परत करावी, इतकेच नव्हे तर काकडी पिकाच्या झालेल्या नुकसानीचीही भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमदार मनोहर भोईर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. यावेळी जि. प. सदस्य सुरेखा ठोंबरे, उपसभापती श्यामसुंदर साळवी, माजी सदस्य मोतीराम ठोंबरे आदी उपस्थित होते. धरण प्रशासन अधिकाऱ्यांचा निषेध करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत दिलासा दिला. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले.