शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

मोरबे धरण क्षेत्रातील शेती उद्ध्वस्त

By admin | Updated: August 8, 2016 02:35 IST

रायगड जिल्ह्यात चौकजवळील हातनोली गावातील शेतपीक नवी मुंबई महानगरपालिका धरण प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहे

अमोल पाटील, खालापूररायगड जिल्ह्यात चौकजवळील हातनोली गावातील शेतपीक नवी मुंबई महानगरपालिका धरण प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चांगलाच संकटात सापडला आहे.चौक येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १९८९ मध्ये मोरबे धरण बांधण्यात आले. त्यानंतर हे धरण नवी मुंबई महानगरपालिकेला विकण्यात आले. धरणासाठी जागा संपादित करताना चौक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात घेण्यात आल्या होत्या. यावेळी धरणग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या, १२ टक्के भूखंड देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या मागण्या अजूनही प्रलंबितच आहेत. धरणाच्या बाधित क्षेत्रापासून काही भूखंड मोकळे आहेत. त्याठिकाणी शेतकऱ्यांकडून भातपीक, भाजीपाल्यांची लागवड केली जाते. या पिकावरच बाधित शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या शेतकऱ्यांनी याठिकाणी काकडीचे पीक लावले आहे. चांगले पीक यावे म्हणून कुटुंबासह गेली दोन महिने भरपावसात मेहनत घेत आहेत. मात्र शुक्रवारी धरण प्रशासनाने काकडी पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे धरणग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. धरण क्षेत्र परिसरातील ही जमीन ओसाड पडून होती. त्यामुळे धरणग्रस्त बाधित शेतकऱ्यांनी याठिकाणी पीक घेण्यास सुरुवात केली. धरणासाठी सरकारने जमीन कवडीमोल भावाने घेतली आणि धरण बांधल्यावर उर्वरित जमीन तशीच पडून आहे. ही जमीन शेतकऱ्यांना परत करावी, इतकेच नव्हे तर काकडी पिकाच्या झालेल्या नुकसानीचीही भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमदार मनोहर भोईर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. यावेळी जि. प. सदस्य सुरेखा ठोंबरे, उपसभापती श्यामसुंदर साळवी, माजी सदस्य मोतीराम ठोंबरे आदी उपस्थित होते. धरण प्रशासन अधिकाऱ्यांचा निषेध करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत दिलासा दिला. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले.